शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

..आता गावासाठी एकत्र या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2021 12:52 IST

औंध : खटाव तालुक्यात व विशेषतः औंध परिसरातील अनेक गावांनी पानी फाैंडेशनमध्ये मोठ्या हिरीरीने सहभागी होऊन आपली गावे पाण्याच्याबाबतीत ...

औंध : खटाव तालुक्यात व विशेषतः औंध परिसरातील अनेक गावांनी पानी फाैंडेशनमध्ये मोठ्या हिरीरीने सहभागी होऊन आपली गावे पाण्याच्याबाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी एकजूट दाखविली. मात्र त्यानंतर आता पुन्हा एकदा ‘स्पर्धेसाठी नव्हे, तर गावासाठी’ अशी एकजूट करून पाणी, वृक्षारोपण तसेच त्यावेळी केलेल्या कामांची देखभाल-दुरुस्ती होणे आवश्यक आहे. कारण काही बंधाऱ्यात, ओढ्यात झाडे-झुडपे व गाळ साठून राहिला आहे. त्यामुळे या कामांवर वरवर हात फिरला तरी त्याचा उपयोग जलसंधारणासाठी होऊ शकतो.

सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत खटाव तालुक्यातील गावेच्या गावे सहभागी झाली. त्यामध्ये उत्स्फूर्तपणे काम केले. यापैकी औंध परिसरातील भोसरे, जायगाव, खबालवाडी, गणेशवाडी, गोपूज या गावांनी कौतुकास्पद कामगिरी केली, तर उर्वरित सहभागी गावांना काम केलेला फायदा दिसून आला. पानी फाैंडेशनच्या कामांमुळे ज्या खटाव तालुक्यात डिसेंबर जानेवारीपासून टँकर लागत होता, त्यांना एप्रिल-मे उजाडला तरी टँकरची आवश्यकता भासली नव्हती.

आजअखेर त्या कामांचा फायदा मिळत आहे. मात्र केलेल्या कामांची देखभाल दुरुस्ती झाली, तर पुन्हा एकदा शेती पाण्यासाठी गावे स्वयंपूर्ण बनण्यास अडचण येणार नाही. अनेक गावांत बंधारे झाले आहेत, त्या बंधाऱ्याची आताची स्थिती काय आहे. ओढा खोलीकरण, रुंदीकरण, डीपसीसीटी, सलग समतल चरी, बांधबंदिस्ती आदी झालेल्या कामांचे सर्वेक्षण होऊन प्रत्येक गावांनी पाण्याचा आराखडा बनविण्याची पुन्हा गरज आहे. कारण रब्बी हंगामात वरुणराजाने दिलेली ओढ व विहिरी, कूपनलिका यांची खालावलेली पाणी पातळी याचा विचार करता, पुन्हा एकदा गावांनी एकजूट होऊन लक्ष घालणे गरजेचे बनले आहे.

पानी फाैंडेशनच्या कामानंतर आता पुन्हा गावांनी पाणी आणि वृक्ष यावर काम करणे गरजेचे आहे. तीन वर्षांपर्यंत मागील कामाचा फायदा मिळतो. आता यापुढे अधिकचा फायदा हवा असल्यास पुन्हा झालेल्या कामांची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी जलक्रांतीची चळवळ आपल्या हितासाठी गावोगावी सुरू व्हावी, यासाठी सेवाभावी संस्था, मोठमोठ्या कंपनी यांच्या सीएसआर फंडातून कामे होण्यासाठी गावकऱ्यांचा पुढाकार आवश्यक आहे - अतुल पवार, स्वयंसेवक पानी फाैंडेशन

टॅग्स :Satara areaसातारा परिसर