शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

..आता गावासाठी एकत्र या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2021 12:52 IST

औंध : खटाव तालुक्यात व विशेषतः औंध परिसरातील अनेक गावांनी पानी फाैंडेशनमध्ये मोठ्या हिरीरीने सहभागी होऊन आपली गावे पाण्याच्याबाबतीत ...

औंध : खटाव तालुक्यात व विशेषतः औंध परिसरातील अनेक गावांनी पानी फाैंडेशनमध्ये मोठ्या हिरीरीने सहभागी होऊन आपली गावे पाण्याच्याबाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी एकजूट दाखविली. मात्र त्यानंतर आता पुन्हा एकदा ‘स्पर्धेसाठी नव्हे, तर गावासाठी’ अशी एकजूट करून पाणी, वृक्षारोपण तसेच त्यावेळी केलेल्या कामांची देखभाल-दुरुस्ती होणे आवश्यक आहे. कारण काही बंधाऱ्यात, ओढ्यात झाडे-झुडपे व गाळ साठून राहिला आहे. त्यामुळे या कामांवर वरवर हात फिरला तरी त्याचा उपयोग जलसंधारणासाठी होऊ शकतो.

सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत खटाव तालुक्यातील गावेच्या गावे सहभागी झाली. त्यामध्ये उत्स्फूर्तपणे काम केले. यापैकी औंध परिसरातील भोसरे, जायगाव, खबालवाडी, गणेशवाडी, गोपूज या गावांनी कौतुकास्पद कामगिरी केली, तर उर्वरित सहभागी गावांना काम केलेला फायदा दिसून आला. पानी फाैंडेशनच्या कामांमुळे ज्या खटाव तालुक्यात डिसेंबर जानेवारीपासून टँकर लागत होता, त्यांना एप्रिल-मे उजाडला तरी टँकरची आवश्यकता भासली नव्हती.

आजअखेर त्या कामांचा फायदा मिळत आहे. मात्र केलेल्या कामांची देखभाल दुरुस्ती झाली, तर पुन्हा एकदा शेती पाण्यासाठी गावे स्वयंपूर्ण बनण्यास अडचण येणार नाही. अनेक गावांत बंधारे झाले आहेत, त्या बंधाऱ्याची आताची स्थिती काय आहे. ओढा खोलीकरण, रुंदीकरण, डीपसीसीटी, सलग समतल चरी, बांधबंदिस्ती आदी झालेल्या कामांचे सर्वेक्षण होऊन प्रत्येक गावांनी पाण्याचा आराखडा बनविण्याची पुन्हा गरज आहे. कारण रब्बी हंगामात वरुणराजाने दिलेली ओढ व विहिरी, कूपनलिका यांची खालावलेली पाणी पातळी याचा विचार करता, पुन्हा एकदा गावांनी एकजूट होऊन लक्ष घालणे गरजेचे बनले आहे.

पानी फाैंडेशनच्या कामानंतर आता पुन्हा गावांनी पाणी आणि वृक्ष यावर काम करणे गरजेचे आहे. तीन वर्षांपर्यंत मागील कामाचा फायदा मिळतो. आता यापुढे अधिकचा फायदा हवा असल्यास पुन्हा झालेल्या कामांची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी जलक्रांतीची चळवळ आपल्या हितासाठी गावोगावी सुरू व्हावी, यासाठी सेवाभावी संस्था, मोठमोठ्या कंपनी यांच्या सीएसआर फंडातून कामे होण्यासाठी गावकऱ्यांचा पुढाकार आवश्यक आहे - अतुल पवार, स्वयंसेवक पानी फाैंडेशन

टॅग्स :Satara areaसातारा परिसर