शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
2
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
3
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
4
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
5
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
6
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
7
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
8
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
9
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
10
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
11
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
12
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
13
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
14
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
15
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
16
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
17
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
18
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
19
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
20
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश

नारळ पावला; पण खापर फुटलं..!

By admin | Updated: December 22, 2016 23:21 IST

जनशक्ती’चा कलह चव्हाट्यावर : कऱ्हाडमध्ये ‘राज’कीय भूकंप की पेल्यातील वादळ

कऱ्हाड : काही दिवसांपूर्वीच झालेल्या कऱ्हाड पालिकेच्या निवडणुकीत सत्तांतराचा ‘नारळ’ फुटला आणि ‘लोकशाही’ला ‘जनशक्ती’चा चमत्कारही दिसला; पण प्रचारादरम्यान व्यासपीठावरून ‘सिंह’गर्जना करणाऱ्या एका नेत्याचाच पराभव झाल्याने त्याचे ‘खापर’ही त्या नेत्यांनी स्वकीयांवरच फोडले. परिणामी जनशक्ती आघाडीत सुरू झालेला कलह थांबता थांबेनासा झालाय. एकाच आघाडीच्या नावाने दोन स्वतंत्र नोंदणी अर्ज जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल झाल्याने हा कलह आता चव्हाट्यावर आलाय. कऱ्हाडातील हे बदलते राजकीय वारे अजून कोण-कोणते रंग बदलणार? कृष्णा-कोयनेच्या प्रीतिसंगमावर राजकीय भूकंप होणार की पेल्यातील वादळ पेल्यातच संपणार, याकडे कऱ्हाडकरांचे लक्ष लागून राहिले आहे.गेल्या महिन्यात कऱ्हाड पालिकेची निवडणूक झाली. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या गावच्या या निवडणुकीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले होते. मुख्यमंत्री असतानाच कऱ्हाडच्या निवडणुकीतील स्वकीयांचा पराभव पचवलेल्या पृथ्वीबाबांनी यंदाच्या निवडणुकीत मात्र, स्वत: लक्ष घातले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली जाधव, यादव, पाटील यांनी जनशक्ती आघाडी मैदानात उतरविली. निकालाअंती त्यांना नगराध्यक्षपदाने हुलकावणी दिली; पण सोळा जागा जिंकत जनशक्तीलाच स्पष्ट बहुमत मिळाले.नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचा पराभव जनशक्तीने लगेच पचविला. मात्र, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव यांचा प्रभागात झालेला पराभव अजूनही त्यांच्या कार्यकर्त्यांना पचता पचेनासा झालाय. दस्तुरखुद्द राजेंद्र यादव यांनी पराभवानंतर ‘माझा पराभव विरोधकांमुळे नव्हे तर काही स्वकीयांमुळेच झाला आहे,’ असा घणाघात केला. त्या गद्दारांना आमचे नेते काय धडा शिकविणार यावर आपण आपली पुढील राजकीय दिशा ठरविणार असल्याचे पत्रकार परिषदेत त्यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे कऱ्हाडातील राजकीय समीकरणे नजीकच्या काळात काय काय वळणे घेणार, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती.खरंतर पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविताना सुरुवातीपासूनच काही कुरबुरी सुरू झाल्या होत्या. त्यामुळेच पृथ्वीबाबांनाही आपला पक्षीय चिन्हावर लढण्याचा आग्रह सोडावा लागला. मग पुढे उमेदवार निश्चित करतानाही याचे किती, त्याचे किती अन् माझे किती? याचे समीकरण व्यवस्थित न मांडल्याने पृथ्वीबाबांचे गणित कऱ्हाडच्या राजकारणात पुरते फसल्याचे आता नागरिकच बोलू लागले आहेत. कारण पृथ्वीबाबांच्या नेतृत्वाखाली सोळा नगरसेवक निवडून आले असले तरी विजयानंतर यातील किती नगरसेवक पृथ्वीराज चव्हाणांना स्वत:हून भेटायला गेले. हा संशोधनाचाच भाग आहे.वास्तविक, ‘लोकशाही’च्या कारभाराला कंटाळलेल्या कऱ्हाडकरांनी सत्तांतराचा निर्णय अगोदरच घेतला होता. पृथ्वीबाबांनी मुख्यमंत्री असताना दिलेला निधी अन् त्यांचा स्वच्छ चेहरा पालिका निवडणुकीत जनशक्तीच्या कामी आला, हेही नाकारता येणार नाही. शिवाय विस्कटलेली जुनी जनशक्ती आघाडी या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकवटल्याने एकीचं ‘बळ’ही निकालात दिसून आलं; पणं आज सत्तेचं फळ चाखताना अनेकांची तोंडे अनेक दिशेला का?, असा प्रश्न कऱ्हाडकरांना पडला आहे.निकालानंतर एकीकडे फटाक्याची आतषबाजी अन् गुलालाची उधळण सुरू असतानाच यादवांच्या पराभवाचा धक्का त्यांच्यासह नेत्यांनाही बसला. पण त्यानंतर राज्याचं नेतृत्व हाकलेल्या पृथ्वीबाबांना एकामागोमाग एक भूकंपाचे जणू धक्केच दिले जात आहेत. यादवांनी पराभवाचे खापर स्वकीयांवरच फोडले. जनशक्तीचे विजयी नगरसेवक चव्हाणांना भेटायलाही गेले नाहीत. नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार व चव्हाणांची पत्रकार परिषद त्यांना रद्द करावी लागली. त्यामुळे पालिकेत नेमकी कोणत्या नेत्याची सत्ता आली आहे, याचे उत्तर कोणालाच उलगडले नाही. दररोज होणाऱ्या भूकंपांचा केंद्रबिंदू इकडेतिकडे सरकू लागला आहे. अन् त्याचाच एक भाग म्हणून जनशक्ती आघाडीच्या नावानेच दोन स्वतंत्र अर्ज नोंदणीसाठी दाखल झाल्याने सारा कलह चव्हाट्यावर आला आहे. आता या कलहाचा शेवट काय होणार, हे पाहण्यासाठी थोडे थांबावेच लागणार आहे. (प्रतिनिधी)म्हणे... ‘गड’ आला; पण ‘सिंह’गेला !खासदार उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक म्हणून राजेंद्र यादव यांची ओळख आहे. त्यांचा कऱ्हाड शहर व परिसरात चांगला लोकसंग्रह आहे. कऱ्हाड पालिका निवडणुकीत त्यांनी महत्त्वाची भूमिकाही बजावली; पण त्यांच्या पराभवामुळे ‘गड’ आला; पण ‘सिंह’ गेला, अशी धारणा कार्यकर्त्यांची झाली असून, कार्यकर्त्यांचा संताप संपता संपेनासा झालाय....आता न्यायालयीन लढाई की सामोपचार ?...आता न्यायालयीन लढाई की सामोपचार ?‘जनशक्ती’ आघाडीच्या नगरसेविका स्मिता हुलवान यांनी त्यांच्यासह बारा नगरसेवकांची जनशक्ती आघाडी रजिस्टर व्हावी म्हणून अर्ज दाखल केला आहे. तर हुलवानांना वगळून १५ नगरसेवकांनी जनशक्ती आघाडीची नोंदणी व्हावी म्हणून स्वतंत्र अर्ज दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्र लोकल अ‍ॅथॉरिटी डिस्क्वालिफिकेशन अ‍ॅक्टखाली आता नक्की कोणाला नोंदणी मिळणार, हे पाहावे लागणार आहे. हा वाद सामोपचाराने की न्यायालयीन लढाईनेच मिटणार, हे पाहावे लागणार आहे. स्वीकृत नगरसेवक कोण-कोण ?‘जनशक्ती’ आघाडीकडून सध्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी राजेंद्र यादव, दिलीप जाधव अन् अतुल शिंदे यांची नावे चर्चेत आहेत. सोळा जणांची आघाडी एकसंध राहिली तर या आघाडीला संख्याबळाच्या निकषावर दोन सदस्य स्वीकृत मिळू शकतात; पण जर का बारा जणांच्या आघाडीला नोंदणी मिळाली तर जनशक्तीला फक्त एकच स्वीकृत नगरसेवक मिळू शकतो. याचा विचार कोण करणार.अपक्ष इंगवलेंचा जनशक्तीला पाठिंबाप्रभाग क्रमांक तेरामधून अपक्ष म्हणून कश्मीरा इंगवले यांनी गुरुवारी माजी नगराध्यक्ष जयवंतराव पाटील यांच्या उपस्थितीत जनशक्ती आघाडीला जाहीर पाठिंबा दिला. यावेळी संपतराव इंगवले, अ‍ॅड. विजय पाटील, ललित राजापुरे, संतोष इंगवले, दिलीप पाटील आदींची उपस्थिती होती. त्यामुळे आणखी काही अपक्ष नगरसेवकही जनशक्तीलाच पसंती देतील, अशी चर्चाही सुरू आहे.