शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
2
“PM केअर फंडातून राज्याचा शेतकरी कर्जमुक्त करा”: राऊत, ठाकरे गट बळीराजासाठी रस्त्यावर उतरणार
3
झोमॅटोद्वारे हॉटेल मालकाने २१,००० रुपयांच्या १०७ ऑर्डर बनवून दिल्या, हातात किती शिल्लक राहिले... तुम्हीच पहा...
4
'सर्व दोष माझ्यावर टाकण्यात आले, तर...'; सोनम वांगचुक यांनी परदेशी निधीवर स्पष्टच सांगितले
5
सोने-चांदीच्या दरात आज मोठी उलथापालथ; Gold झालं स्वस्त, पण चांदी अवाक्याच्या बाहेर
6
"पाकिस्तानचा संघ एवढा भारी आहे की..."; IND vs PAK FINAL आधी कर्णधार सलमानने भारताला डिवचले
7
VIRAL :'सोनार बनवणार नाही, चोर चोरणार नाही'! ट्रेनमध्ये विक्रेत्याचा शायराना अंदाज; तरुणाची स्टाईल पाहून पब्लिक झाली फॅन!
8
३० वर्षांनी केंद्र त्रिकोण राजयोग: ८ राशींना वक्री शनि करेल मालामाल, बक्कळ पैसा; चौपट लाभ!
9
Tariffs on Furniture: ट्रम्प यांचा फर्निचर उद्योगावरही 'टॅरिफ घाव'; कोणत्या भारतीय कंपन्यांना बसणार फटका?
10
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
11
४ लाख कोटी स्वाहा! TATA च्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांना दिला मोठा झटका, आणखी खाली जाऊ शकते किंमत?
12
भारतीय हवाई दलात इतिहास घडवणारे 'MiG-21' झाले निवृत; पाकिस्तानचा थरकाप उडवणाऱ्या विमानाला शेवटचा सॅल्यूट!
13
Jalebi Recipe: रसरशीत जिलेबी करण्यासाठी शेफने सांगितली खास टीप; १० मिनिटांत होईल तयार 
14
टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अ‍ॅक्च्युएटर फॉल्टी
15
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
16
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा ११ कोटी रुपयांच्या १० किलो सोन्याच्या 'दुबई ड्रेस'चे खास फोटो
17
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
18
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
19
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
20
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?

नारळ पावला; पण खापर फुटलं..!

By admin | Updated: December 22, 2016 23:21 IST

जनशक्ती’चा कलह चव्हाट्यावर : कऱ्हाडमध्ये ‘राज’कीय भूकंप की पेल्यातील वादळ

कऱ्हाड : काही दिवसांपूर्वीच झालेल्या कऱ्हाड पालिकेच्या निवडणुकीत सत्तांतराचा ‘नारळ’ फुटला आणि ‘लोकशाही’ला ‘जनशक्ती’चा चमत्कारही दिसला; पण प्रचारादरम्यान व्यासपीठावरून ‘सिंह’गर्जना करणाऱ्या एका नेत्याचाच पराभव झाल्याने त्याचे ‘खापर’ही त्या नेत्यांनी स्वकीयांवरच फोडले. परिणामी जनशक्ती आघाडीत सुरू झालेला कलह थांबता थांबेनासा झालाय. एकाच आघाडीच्या नावाने दोन स्वतंत्र नोंदणी अर्ज जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल झाल्याने हा कलह आता चव्हाट्यावर आलाय. कऱ्हाडातील हे बदलते राजकीय वारे अजून कोण-कोणते रंग बदलणार? कृष्णा-कोयनेच्या प्रीतिसंगमावर राजकीय भूकंप होणार की पेल्यातील वादळ पेल्यातच संपणार, याकडे कऱ्हाडकरांचे लक्ष लागून राहिले आहे.गेल्या महिन्यात कऱ्हाड पालिकेची निवडणूक झाली. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या गावच्या या निवडणुकीकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले होते. मुख्यमंत्री असतानाच कऱ्हाडच्या निवडणुकीतील स्वकीयांचा पराभव पचवलेल्या पृथ्वीबाबांनी यंदाच्या निवडणुकीत मात्र, स्वत: लक्ष घातले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली जाधव, यादव, पाटील यांनी जनशक्ती आघाडी मैदानात उतरविली. निकालाअंती त्यांना नगराध्यक्षपदाने हुलकावणी दिली; पण सोळा जागा जिंकत जनशक्तीलाच स्पष्ट बहुमत मिळाले.नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचा पराभव जनशक्तीने लगेच पचविला. मात्र, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव यांचा प्रभागात झालेला पराभव अजूनही त्यांच्या कार्यकर्त्यांना पचता पचेनासा झालाय. दस्तुरखुद्द राजेंद्र यादव यांनी पराभवानंतर ‘माझा पराभव विरोधकांमुळे नव्हे तर काही स्वकीयांमुळेच झाला आहे,’ असा घणाघात केला. त्या गद्दारांना आमचे नेते काय धडा शिकविणार यावर आपण आपली पुढील राजकीय दिशा ठरविणार असल्याचे पत्रकार परिषदेत त्यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे कऱ्हाडातील राजकीय समीकरणे नजीकच्या काळात काय काय वळणे घेणार, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती.खरंतर पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविताना सुरुवातीपासूनच काही कुरबुरी सुरू झाल्या होत्या. त्यामुळेच पृथ्वीबाबांनाही आपला पक्षीय चिन्हावर लढण्याचा आग्रह सोडावा लागला. मग पुढे उमेदवार निश्चित करतानाही याचे किती, त्याचे किती अन् माझे किती? याचे समीकरण व्यवस्थित न मांडल्याने पृथ्वीबाबांचे गणित कऱ्हाडच्या राजकारणात पुरते फसल्याचे आता नागरिकच बोलू लागले आहेत. कारण पृथ्वीबाबांच्या नेतृत्वाखाली सोळा नगरसेवक निवडून आले असले तरी विजयानंतर यातील किती नगरसेवक पृथ्वीराज चव्हाणांना स्वत:हून भेटायला गेले. हा संशोधनाचाच भाग आहे.वास्तविक, ‘लोकशाही’च्या कारभाराला कंटाळलेल्या कऱ्हाडकरांनी सत्तांतराचा निर्णय अगोदरच घेतला होता. पृथ्वीबाबांनी मुख्यमंत्री असताना दिलेला निधी अन् त्यांचा स्वच्छ चेहरा पालिका निवडणुकीत जनशक्तीच्या कामी आला, हेही नाकारता येणार नाही. शिवाय विस्कटलेली जुनी जनशक्ती आघाडी या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकवटल्याने एकीचं ‘बळ’ही निकालात दिसून आलं; पणं आज सत्तेचं फळ चाखताना अनेकांची तोंडे अनेक दिशेला का?, असा प्रश्न कऱ्हाडकरांना पडला आहे.निकालानंतर एकीकडे फटाक्याची आतषबाजी अन् गुलालाची उधळण सुरू असतानाच यादवांच्या पराभवाचा धक्का त्यांच्यासह नेत्यांनाही बसला. पण त्यानंतर राज्याचं नेतृत्व हाकलेल्या पृथ्वीबाबांना एकामागोमाग एक भूकंपाचे जणू धक्केच दिले जात आहेत. यादवांनी पराभवाचे खापर स्वकीयांवरच फोडले. जनशक्तीचे विजयी नगरसेवक चव्हाणांना भेटायलाही गेले नाहीत. नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार व चव्हाणांची पत्रकार परिषद त्यांना रद्द करावी लागली. त्यामुळे पालिकेत नेमकी कोणत्या नेत्याची सत्ता आली आहे, याचे उत्तर कोणालाच उलगडले नाही. दररोज होणाऱ्या भूकंपांचा केंद्रबिंदू इकडेतिकडे सरकू लागला आहे. अन् त्याचाच एक भाग म्हणून जनशक्ती आघाडीच्या नावानेच दोन स्वतंत्र अर्ज नोंदणीसाठी दाखल झाल्याने सारा कलह चव्हाट्यावर आला आहे. आता या कलहाचा शेवट काय होणार, हे पाहण्यासाठी थोडे थांबावेच लागणार आहे. (प्रतिनिधी)म्हणे... ‘गड’ आला; पण ‘सिंह’गेला !खासदार उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक म्हणून राजेंद्र यादव यांची ओळख आहे. त्यांचा कऱ्हाड शहर व परिसरात चांगला लोकसंग्रह आहे. कऱ्हाड पालिका निवडणुकीत त्यांनी महत्त्वाची भूमिकाही बजावली; पण त्यांच्या पराभवामुळे ‘गड’ आला; पण ‘सिंह’ गेला, अशी धारणा कार्यकर्त्यांची झाली असून, कार्यकर्त्यांचा संताप संपता संपेनासा झालाय....आता न्यायालयीन लढाई की सामोपचार ?...आता न्यायालयीन लढाई की सामोपचार ?‘जनशक्ती’ आघाडीच्या नगरसेविका स्मिता हुलवान यांनी त्यांच्यासह बारा नगरसेवकांची जनशक्ती आघाडी रजिस्टर व्हावी म्हणून अर्ज दाखल केला आहे. तर हुलवानांना वगळून १५ नगरसेवकांनी जनशक्ती आघाडीची नोंदणी व्हावी म्हणून स्वतंत्र अर्ज दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्र लोकल अ‍ॅथॉरिटी डिस्क्वालिफिकेशन अ‍ॅक्टखाली आता नक्की कोणाला नोंदणी मिळणार, हे पाहावे लागणार आहे. हा वाद सामोपचाराने की न्यायालयीन लढाईनेच मिटणार, हे पाहावे लागणार आहे. स्वीकृत नगरसेवक कोण-कोण ?‘जनशक्ती’ आघाडीकडून सध्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी राजेंद्र यादव, दिलीप जाधव अन् अतुल शिंदे यांची नावे चर्चेत आहेत. सोळा जणांची आघाडी एकसंध राहिली तर या आघाडीला संख्याबळाच्या निकषावर दोन सदस्य स्वीकृत मिळू शकतात; पण जर का बारा जणांच्या आघाडीला नोंदणी मिळाली तर जनशक्तीला फक्त एकच स्वीकृत नगरसेवक मिळू शकतो. याचा विचार कोण करणार.अपक्ष इंगवलेंचा जनशक्तीला पाठिंबाप्रभाग क्रमांक तेरामधून अपक्ष म्हणून कश्मीरा इंगवले यांनी गुरुवारी माजी नगराध्यक्ष जयवंतराव पाटील यांच्या उपस्थितीत जनशक्ती आघाडीला जाहीर पाठिंबा दिला. यावेळी संपतराव इंगवले, अ‍ॅड. विजय पाटील, ललित राजापुरे, संतोष इंगवले, दिलीप पाटील आदींची उपस्थिती होती. त्यामुळे आणखी काही अपक्ष नगरसेवकही जनशक्तीलाच पसंती देतील, अशी चर्चाही सुरू आहे.