शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

दररोज दुपारनंतर वातावरणात बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:40 IST

कऱ्हाड : शहर व तालुक्यात गत आठ दिवसांपासून दुपारनंतर वातावरणात बदल होत आहे. दुपारी चारनंतर आकाशात ढग जमा होऊन ...

कऱ्हाड : शहर व तालुक्यात गत आठ दिवसांपासून दुपारनंतर वातावरणात बदल होत आहे. दुपारी चारनंतर आकाशात ढग जमा होऊन पावसाची चिन्हे निर्माण होत आहेत. सोसाट्याचा वारा, वीज व त्यानंतर जोरदार पाऊस असे वातावरण निर्माण होत आहे. रात्री उशिरापर्यंत पाऊस पडून हवेत गारवा निर्माण होत आहे. पावसामुळे दिवसभर जाणवणारा कडक उष्मा रात्री जाणवत नसून वातावरण थंड राहत आहे.

विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

कऱ्हाड : शहरामध्ये विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांकडून चौकशी करून कारवाई करण्यात येत आहे. विनाकारण फिरणाऱ्यांची वाहने पोलिसांनी जप्त केली असून, वाहतूक शाखेत ती लावण्यात आली आहेत. नागरिकांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशाराही पोलिसांकडून देण्यात आला आहे.

यशवंतनगरमध्ये दहा चालकांवर कारवाई

कऱ्हाड : कऱ्हाड ते मसूर रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांवर तळबीड पोलिसांनी यशवंतनगर परिसरात कारवाई केली. पोलीस अधिकारी महेश शिंदे, एच. आर. घेवर, मोहिते, ए. टी. कुंभार यांनी दहा वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे सध्या लॉकडाऊन सुरू आहे. या काळात विनाकारण फिरू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, तरीही विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.

अंतर्गत रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग

कऱ्हाड : येथील अंतर्गत पेठांमधील चौकात कचऱ्याचे ढीग साचत आहेत. पालिकेची घंटागाडी सकाळी एकदाच येऊन गेल्यानंतर दिवसभर नागरिक चौकातील रस्त्याकडेला कचरा टाकत असून, त्यातून ढीग साचत आहे. याचा प्रवाशांना नाहक त्रास होत आहे. पालिकेने याबाबत योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी रहिवाशांमधून होत आहे. पालिकेची घंटागाडी सकाळी व संध्याकाळी अंतर्गत पेठांमध्ये पाठविण्यात यावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.

गावोगावच्या फ्युजबॉक्सची दुर्दशा

तांबवे : कऱ्हाड ते पाटण मार्गावर रस्त्याकडेला अनेक ठिकाणी असलेले फ्युजबॉक्स उघडे पडलेले आहेत. काही ठिकाणी हे बॉक्स अक्षरश: जमिनीला टेकले आहेत; तर काही ठिकाणी फ्युजाही गायब झाल्या असून, तारांवर खेळ सुरू आहे. त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला असून, वीज वितरणने धोकादायक फ्युजबॉक्स हटविण्याची मागणी होत आहे.

कोळे विभागात मोकाट श्वानांचा उपद्रव वाढला

कुसूर : कोळे (ता. कऱ्हाड) परिसरात मोकाट श्वानांच्या उपद्रवात वाढ झाली असल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहेत. या मोकाट श्वानांनी परिसरातील काही गावांमध्ये १० दिवसांत अनेक पाळीव जनावरांवर हल्ले केले आहेत. होणारे नुकसान टाळण्यासाठी ग्रामपंचायतीने तत्काळ या श्वानांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

पाटण मार्गावरील बसथांबे उद्ध्वस्त

मल्हारपेठ : कऱ्हाड-नवा रस्ता दरम्यान मार्गावर एकही झाड शिल्लक राहिलेले नाही. उभे असणारे बसथांबेही भुईसपाट झाले आहेत. कऱ्हाड-पाटण या ३४ किलोमीटर अंतरातील अनेक थांबे जमीनदोस्त करण्यात आले आहेत. या मार्गावर बसथांबे उभारण्याची मागणी होत आहे.