शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

दोन्ही राजेंच्या मावळ्यांचा शहर हद्दवाढीला विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 23:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : सातारा शहराच्या हद्दवाढीला खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मावळ्यांनीच विरोध केला आहे. मंगळवारी पंचायत समितीच्या मासिक सभेत हद्दवाढीला विरोध करणारा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. गटविकास अधिकाºयांच्या अभिप्रायासह हा ठराव जिल्हा परिषदेला सादर करण्यात येणार आहे.पंचायत समितीची मासिक सभा मंगळवारी सभापती मिलिंद कदम ...

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : सातारा शहराच्या हद्दवाढीला खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मावळ्यांनीच विरोध केला आहे. मंगळवारी पंचायत समितीच्या मासिक सभेत हद्दवाढीला विरोध करणारा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. गटविकास अधिकाºयांच्या अभिप्रायासह हा ठराव जिल्हा परिषदेला सादर करण्यात येणार आहे.पंचायत समितीची मासिक सभा मंगळवारी सभापती मिलिंद कदम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी गटविकास अधिकारी अमिता गावडे यांची उपस्थिती होती. शाहूपुरी, खेड, विलासपूर, आदी गावांचा हद्दवाढीनंतर साताराशहरात समावेश होणार आहे. सभेच्या सुरुवातीलाच हद्दवाढीचा विषय निघाला. खासदार उदयनराजे गटाचे सदस्य संजय पाटील यांनी शाहूपुरी गावचा हद्दवाढीत समावेश करू नये, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. सातारा शहरातील नागरिकांनाच सुविधा मिळत नाहीत. आमच्या ग्रामपंचायती विकासासाठी सक्षम आहेत. ग्रामसभेने हद्दवाढीला विरोध करणारा ठराव मंजूर केला आहे.तसेच जिल्हाधिकाºयांकडे हरकतही नोंदविली आहे. सातारा नगरपालिका नागरिकांना योग्य सुविधा देऊ शकत नाही. शाहूपुरी ग्रामपंचायत हद्दीत स्वतंत्र पोलीस ठाणे, गावासाठी स्वतंत्र पोस्ट आॅफिस, आदी सुविधा असून, शाहूपुरीसाठी स्वतंत्र २४ बाय ७ पाणीपुरवठा योजनादेखील थोड्याच कालावधीत सुरू होणार आहे. साताºयातील एका सेवाभावी संस्थेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच शाहूपुरी ग्रामपंचायतीचा नगरपालिका हद्दवाढीत समावेश होऊ नये व ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर व्हावे, यासंदर्भात शाहूपुरीतील ग्रामस्थांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे शाहूपुरीला स्वतंत्र नगरपंचायतीचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी केली आहे, असे पाटील यांनी स्पष्ट केले.हाच मुद्दा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटाचे सदस्य आशुतोष चव्हाण यांनीही उचलून धरला. खेड, विलासपूर व लगतचा त्रिशंकू भाग यांचा समावेश शहराच्या हद्दीत होऊ नये, अशी ग्रामस्थांची इच्छा आहे. तसेच खेड आणि विलासपूर या दोन्ही ग्रामपंचायतींची मिळून नगरपंचायत स्थापन करण्यात यावी, असा ठराव यावेळी मांडला. या दोन्ही ठरावांना सभेत सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.तालुक्यात ३० ते ३५ अंगणवाड्यांना शासनाने मंजुरी दिली आहे; पण जागाच उपलब्ध नसल्याने अडचण निर्माण झाली असून, हा विषय गांभीर्याने घेणे आवश्यक असल्याचे मत सभापती मिलिंद कदम यांनी व्यक्त केले. जागा उपलब्ध झाल्यास इमारत उभारणी करून विद्यार्थ्यांची सोय त्या ठिकाणी करता येणार आहे.यावेळी झालेल्या अरविंद जाधव, राहुल शिंदे, हणमंत गुरव, दयानंद उघडे, विजया गुरव यांनी सहभाग घेतला. शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी बहुतांश सदस्यांनी केली. जिल्हा परिषदेचे अधिकारीही या बैठकीला उपस्थित राहत नसल्याची तक्रार यावेळी सभापतींकडे करण्यात आली. त्यामुळे इथून पुढच्या सभांना सर्व शासकीय कार्यालयांतील अधिकारी उपस्थित राहण्याबाबत नोटीस काढावी, अशा सूचना सभापती मिलिंद कदम यांनी प्रशाासनाला केल्या.