शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

Satara News: रावसाहेब काहो चाललात... जरा थांबाना!, तहसीलदारांसाठी जनतेची आर्त आळवणी 

By दीपक शिंदे | Updated: June 19, 2023 13:33 IST

तीन-तीन पिढ्या बांधावरील रस्त्यासाठी भाऊबंदकीचे अनेक वाद चुटकीसरशी सोडवून जनमाणसात तहसीलदार जमदाडे यांनी अढळस्थान निर्माण केले

शेखर जाधववडूज: ‘प्रेम द्यावे भरभरून, मात्र नेहमीच आमची फाटकी झोळी’ अशी काहीशी अवस्था खटाव तालुक्यातील सर्वसामान्य जनतेची झाली आहे. त्याला कारण ही तसे आहे. अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेले तहसीलदार किरण जमदाडे यांचा कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वीच बदलीचे वारे तालुक्यातील काेनाकोपऱ्यात पोहोचले. सर्वसामान्य नागरिकांसह लोकप्रतिनिधींमधूनही आवाज निघू लागला की, ‘रावसाहेब काहो चाललात, जरा थांबाना.’वडूज शहरातील तहसील कार्यालय हे जनतेला आणि कित्येक वर्षे कागदोपत्री अडकलेल्यांना न्याय मिळेल, असे देवालय वाटते. जरी काही तांत्रिक कारणांमुळे काम झाले नाही तरी शाब्दिक सल्ल्याने समाधान नक्कीच मिळते, ही प्रचिती सर्वस्तरातील लोकांना आली आहे. हवेहवेसे वाटणारे तहसीलदार किरण जमदाडे यांची बदली हा शब्द कानावर पडताच चुकीचं घडतंय ही भावनाही व्यक्त केल्या जात आहेत.महसुली कामांची चुणूक, आंदोलने-मोर्चाला सामोरे जाण्याची हातोटी, समन्वय साधण्याचे अप्रतिम कसब, गोरगरीब जनतेसाठी चाेवीस तास एकच ध्यास घेऊन कार्यरत राहणारे जमदाडेसाहेब यांचा कार्यकाल पूर्ण होऊन एक वर्षे जादा कार्यकाल द्यावा, यासाठी जनता आग्रही असल्याचे वास्तव समोर येत आहे. जिल्ह्यातील अकरा तालुक्यातील महसुली कामकाजात अव्वलस्थानी असलेला खटाव तालुका यासाठी अहोरात्र मेहनत घेणारे तहसीलदार म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. यापूर्वीदेखील महसुली विभागात कार्यरत असणारे अनेकांना तालुक्यातील जनता किती संयमी व आदर करणारी आहे. याची अनुभूती देणारे अनेक सेवानिवृत्त अधिकारी या भूमीबद्दल गौरवोद्गार करताना आढळतात.

भाऊबंदकीचे वाद चुटकीसरशी बाजूला

तीन-तीन पिढ्या बांधावरील रस्त्यासाठी भाऊबंदकीचे अनेक वाद चुटकीसरशी सोडवून जनमाणसात जमदाडे यांनी अढळस्थान निर्माण केले. मात्र, शासनाच्या अततायीपणामुळे दुष्काळी भागातील लोकांशी जोडलेल्या नाळेची होत असलेली तूट सर्वसामान्य माणसाला पचनी पडत नाही हे त्रिवार सत्य आहे. संबंधित प्रशासनाने तालुक्यातील जनतेची आर्त आळवणी आणि महसुली कामाचा लेखाजोखा तपासूनच निर्णय घ्यावा, अशी चर्चा तालुक्यात सुरू झाली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर