शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

चक्क रस्त्याने चालायची सवयच मोडली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:44 IST

प्रगती जाधव-पाटील सातारा : साहित्य खरेदी असो की अंतरावर असणाऱ्या शेजाऱ्यांकडे जाणे असो, गाडी काढली की भुर्रर्र ही पध्दत ...

प्रगती जाधव-पाटील

सातारा : साहित्य खरेदी असो की अंतरावर असणाऱ्या शेजाऱ्यांकडे जाणे असो, गाडी काढली की भुर्रर्र ही पध्दत सर्रास पाहायला मिळते. परिणामी रस्त्याच्या चढ-उतारांनी चालणे, खड्डा चुकवून पुढे पाय टाकणे याची सवयच आता मोडली आहे. परिणामी कधी चालायची वेळ आलीच तर रस्त्यावर चालण्याचा अंदाज नसल्याने ठेचकळत चालावे लागतेय, त्यामुळे गुडघ्याला दुखापत सहन करावी लागत आहे.

सातारा शहर छोटे असले तरीही उपनगरांमध्ये याचा विस्तार वाढू लागला आहे. शहराच्या गर्दीत राहण्यापेक्षा उपनगरांत स्वयंभूपणे राहण्याची मानसिकता वाढली. राहायला घर मिळाले तरी मूलभूत गरजांसाठी शहरात यावे लागत असल्याने घरात अतिरिक्त गाडीची गरज भासली. ही गाडी ताब्यात मिळाल्यानंतर पायी चालण्याचे प्रमाण कमी कमी आणि अलिकडे तर नाहीसे व्हायला लागले. रस्त्याने चालणारे कोणीतरी येतंय म्हणून किंवा रिक्षा मिळत नाही म्हणून चालत असल्याचे पाहायला मिळते.

चालण्याचा सराव संपुष्टात आल्याने चढाने किती ताकद वापरावी आणि उताराने किती ऊर्जा वाचवावी, याची गोळाबेरीज करण्याचा सराव चिमुकल्यांना नाही. त्यामुळे ते चढण, उतरण आणि सपाटीवर एकाच पध्दतीने चालतात. त्यामुळे थोडे चालले तरी त्यांना दम लागतो आणि घरातले मोठे त्यांची काळजी म्हणून आपण पुन्हा गाडीवर जाऊ असे सुचवतात. महिन्यातून एकदा गाडी बंद आणि आठवड्याची मंडई चालत आणणे ही शिस्त अवलंबणे आवश्यक आहे.

चौकट :

का मोडली सवय

हल्ली प्रत्येक घरात एक दुचाकी आणि चारचाकी आहे. मंडईत जाणे असो की किराणा आणणं असो, छोटी गाडी काढली की झालं ही कुटुंबाची मानसिकता झाली आहे. पायी भाजी आणायला जाणाऱ्यांची संख्याही कमी आहे. पालिकेने उभ्या केलेल्या मंडईच्या पार्किंगवरून याचा अंदाज सहज लावता येतो. अपार्टमेंटमध्ये वरच्या मजल्यावर राहणारे तर पिशवी खाली सोडून त्यात साहित्य भरून ती वर खेचतात. शारीरिक कष्ट करण्याचा आळस हे सवय मोडण्यासाठी कारणीभूत आहे.

काय आहेत उपाय

एक किलोमीटर परिसरात असलेल्या कामासाठी गाडीचा वापर टाळा

एकटे बाहेर पडण्यापेक्षा सोबतीने जावा

छोट्या-छोट्या अंतरावरील कामे पायी जाऊन करा

साहित्य खरेदी करताना एकदम ओझे आणण्यापेक्षा टप्प्या-टप्प्याने आणा

चालणे हे सवयीचे करून घ्या

यासाठी तरी मुलांना पायी चालवा!

रस्त्याने चालत जाताना शारीरिक हालचाल होते. त्याबरोबरच चालत फिरण्याने परिसराची ओळख, महत्त्वपूर्ण खुणा लक्षात राहतात. दुसरं म्हणजे ज्या भागात आपण राहतो तो परिसर, त्यातील गल्ली-बोळ माहीत असतील, तर एखाद्या बाका प्रसंगाला सामोरे जाताना फार अडचण होत नाही. कित्येकदा गल्लीशेजारी असणारी महत्त्वाची दुकाने, ठिकाणे याची माहिती नसल्याने मुलांना एकटे फिरताना आपले घर शोधणेही अवघड जाते. पायी फिरताना मुलांना ठळक खुणा आणि परिसराची माहिती होते.

या कारणांनीच होतेय चालणे

ज्येष्ठ : व्यायाम म्हणून सकाळ-संध्याकाळ

महिला : किराणा किंवा रिक्षा मिळेपर्यंत

पुरूष : गाडी लाऊन घरापर्यंत किंवा शतपावली

तरुणाई : गल्लीतील मित्र-मैत्रिणींच्या घरी

बालके : खेळून घरी परतताना

कोण किती चालतं

ज्येष्ठ : ३५

महिला : २७

पुरुष : १७

तरुणाई : १३

बालके : ८

कोट :

पायाच्या स्नायूंचा पुरेपूर वापर होताना दिसत नाही. नियमित उठ-बस करणे एवढ्यापुरतेच ही क्रिया मर्यादित राहतेय. दिवसभरातून किमान १५ मिनिटे सलग चालण्याचा व्यायाम असणे आवश्यक आहे. यामुळे गुडघ्यांचे दुखणे बळावत नाही. चालण्याचा सराव नसल्याने ठेच लागून पडण्यानेही गुडघ्याला दुखापत होते.

- डॉ. प्रमोद जगताप, अस्थिरोगतज्ज्ञ, सातारा