शहरं
Join us  
Trending Stories
1
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
2
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
3
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
4
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
5
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
6
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
7
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
8
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
9
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
10
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश
11
गिल, जैस्वालने गाळला घाम, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय फलंदाजांचा कसून सराव, दीड तास केली फलंदाजी
12
कृतज्ञता... सर्वांत मोठा दागिना !
13
महामुंबईसाठी पद्मश्री पुरस्कार विजेत्यांचा जाहीरनामा
14
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
15
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
16
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
17
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
18
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
19
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
20
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा

शेतकऱ्यांना भावतोय सेंद्रिय शेतीचा पर्याय

By admin | Updated: October 27, 2014 23:44 IST

पाण्याच्या अतिरिक्त वापराने जमिनी धोक्यात

सातारा : मागील पाच दशकांमध्ये रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. गोधनाबरोबरच नैसर्गिक साधन संपत्तीच्या रक्षणासाठी व पर्यावरण संतुलनासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळण्याची गरज आहे. पाण्याचा अतिरिक्त वापर व रासायनिक खतांचा भरमसाठ वापर शेतीला अधोगतीकडे नेत असल्याचे जाणकार शेतकऱ्यांच्या लक्षात आले असून, अनेक शेतकरी आता सेंद्रिय शेतीकडे वळू लागले आहेत. पाश्चात्य संस्कृतीचे मोठे दुष्परिणाम शेतीमध्ये दिसू लागले आहेत. रासायनिक शेती, खतांच्या अतिरिक्त वापरामुळे अनेक ठिकाणी जमिनी क्षारपड झाल्या आहेत. त्यासाठी जागरुकपणे शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे. गोधामासारखे प्रकल्प देशात जागोजागी व्हायला हवे आहेत. ज्यामध्ये गाई अथवा म्हशींचे पालन करायला हवे.साधारणपणे गावागावांतून असे प्रकल्प उभे राहिले, तर याद्वारे गांडूळ खतनिर्मिती, शेण खतनिर्मिती, गोमूत्रनिर्मिती होणार असून, त्याद्वारे व्यापारी शेती करणेही शक्य होणार आहे. असे उपक्रम राबविले तर शेतीचीही भरभराट व्हायला वेळ लागणार नाही. तसेच काही कमर्शिअल स्वरूपातही उपक्रम राबविता येतील. ज्याचा शेतकऱ्यांना फायदा होऊन त्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यास मदत होईल.आज बागायती क्षेत्रातील बहुतांशी जमिनी क्षारपड होऊ लागल्या असून, पाणी व रासायनिक खतांच्या अतिवापराने त्यातून अन्नधान्याचे उत्पादनही कमी प्रमाणात येऊ लागले आहे. अशावेळी जमिनींचा पोत वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी आतापासूनच पावले उचलायला हवीत, असे झाले तरच आपण भविष्यात येणारे संकट टाळू शकू,अन्यथा शेतकऱ्यांच्या भावी पिढ्या त्यांना माफ करणार नाहीत.अन्नधान्यांमध्ये रासायनिक खते व कीटकनाशकांचे प्रमाण वाढायला लागले असून, त्याचे दुष्परिणाम मानवाच्या शरीरावर दिसू लागले आहेत.काही दिवसांत तयार होणाऱ्या पालेभाज्या तसेच फळांवर कीटकनाशकांचा वापर यांचा अतिरेकी वापर टाळायला हवा. तरच जमिनी सुस्थितीत राहिल. यासाठी सेंद्रिय शेतीची कास शेतकऱ्यांनी धरायला हवी, असे शेतीक्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. सेंद्रिय शेतीतील उत्पादनांमुळे पालेभाज्यांतील सत्व व्यवस्थित मिळत असल्याने आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते, असे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. (प्रतिनिधी)