शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

शेतकऱ्यांना भावतोय सेंद्रिय शेतीचा पर्याय

By admin | Updated: October 27, 2014 23:44 IST

पाण्याच्या अतिरिक्त वापराने जमिनी धोक्यात

सातारा : मागील पाच दशकांमध्ये रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. गोधनाबरोबरच नैसर्गिक साधन संपत्तीच्या रक्षणासाठी व पर्यावरण संतुलनासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळण्याची गरज आहे. पाण्याचा अतिरिक्त वापर व रासायनिक खतांचा भरमसाठ वापर शेतीला अधोगतीकडे नेत असल्याचे जाणकार शेतकऱ्यांच्या लक्षात आले असून, अनेक शेतकरी आता सेंद्रिय शेतीकडे वळू लागले आहेत. पाश्चात्य संस्कृतीचे मोठे दुष्परिणाम शेतीमध्ये दिसू लागले आहेत. रासायनिक शेती, खतांच्या अतिरिक्त वापरामुळे अनेक ठिकाणी जमिनी क्षारपड झाल्या आहेत. त्यासाठी जागरुकपणे शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे. गोधामासारखे प्रकल्प देशात जागोजागी व्हायला हवे आहेत. ज्यामध्ये गाई अथवा म्हशींचे पालन करायला हवे.साधारणपणे गावागावांतून असे प्रकल्प उभे राहिले, तर याद्वारे गांडूळ खतनिर्मिती, शेण खतनिर्मिती, गोमूत्रनिर्मिती होणार असून, त्याद्वारे व्यापारी शेती करणेही शक्य होणार आहे. असे उपक्रम राबविले तर शेतीचीही भरभराट व्हायला वेळ लागणार नाही. तसेच काही कमर्शिअल स्वरूपातही उपक्रम राबविता येतील. ज्याचा शेतकऱ्यांना फायदा होऊन त्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यास मदत होईल.आज बागायती क्षेत्रातील बहुतांशी जमिनी क्षारपड होऊ लागल्या असून, पाणी व रासायनिक खतांच्या अतिवापराने त्यातून अन्नधान्याचे उत्पादनही कमी प्रमाणात येऊ लागले आहे. अशावेळी जमिनींचा पोत वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी आतापासूनच पावले उचलायला हवीत, असे झाले तरच आपण भविष्यात येणारे संकट टाळू शकू,अन्यथा शेतकऱ्यांच्या भावी पिढ्या त्यांना माफ करणार नाहीत.अन्नधान्यांमध्ये रासायनिक खते व कीटकनाशकांचे प्रमाण वाढायला लागले असून, त्याचे दुष्परिणाम मानवाच्या शरीरावर दिसू लागले आहेत.काही दिवसांत तयार होणाऱ्या पालेभाज्या तसेच फळांवर कीटकनाशकांचा वापर यांचा अतिरेकी वापर टाळायला हवा. तरच जमिनी सुस्थितीत राहिल. यासाठी सेंद्रिय शेतीची कास शेतकऱ्यांनी धरायला हवी, असे शेतीक्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. सेंद्रिय शेतीतील उत्पादनांमुळे पालेभाज्यांतील सत्व व्यवस्थित मिळत असल्याने आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते, असे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. (प्रतिनिधी)