शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

शेतकऱ्यांना भावतोय सेंद्रिय शेतीचा पर्याय

By admin | Updated: October 27, 2014 23:44 IST

पाण्याच्या अतिरिक्त वापराने जमिनी धोक्यात

सातारा : मागील पाच दशकांमध्ये रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. गोधनाबरोबरच नैसर्गिक साधन संपत्तीच्या रक्षणासाठी व पर्यावरण संतुलनासाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळण्याची गरज आहे. पाण्याचा अतिरिक्त वापर व रासायनिक खतांचा भरमसाठ वापर शेतीला अधोगतीकडे नेत असल्याचे जाणकार शेतकऱ्यांच्या लक्षात आले असून, अनेक शेतकरी आता सेंद्रिय शेतीकडे वळू लागले आहेत. पाश्चात्य संस्कृतीचे मोठे दुष्परिणाम शेतीमध्ये दिसू लागले आहेत. रासायनिक शेती, खतांच्या अतिरिक्त वापरामुळे अनेक ठिकाणी जमिनी क्षारपड झाल्या आहेत. त्यासाठी जागरुकपणे शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे. गोधामासारखे प्रकल्प देशात जागोजागी व्हायला हवे आहेत. ज्यामध्ये गाई अथवा म्हशींचे पालन करायला हवे.साधारणपणे गावागावांतून असे प्रकल्प उभे राहिले, तर याद्वारे गांडूळ खतनिर्मिती, शेण खतनिर्मिती, गोमूत्रनिर्मिती होणार असून, त्याद्वारे व्यापारी शेती करणेही शक्य होणार आहे. असे उपक्रम राबविले तर शेतीचीही भरभराट व्हायला वेळ लागणार नाही. तसेच काही कमर्शिअल स्वरूपातही उपक्रम राबविता येतील. ज्याचा शेतकऱ्यांना फायदा होऊन त्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यास मदत होईल.आज बागायती क्षेत्रातील बहुतांशी जमिनी क्षारपड होऊ लागल्या असून, पाणी व रासायनिक खतांच्या अतिवापराने त्यातून अन्नधान्याचे उत्पादनही कमी प्रमाणात येऊ लागले आहे. अशावेळी जमिनींचा पोत वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी आतापासूनच पावले उचलायला हवीत, असे झाले तरच आपण भविष्यात येणारे संकट टाळू शकू,अन्यथा शेतकऱ्यांच्या भावी पिढ्या त्यांना माफ करणार नाहीत.अन्नधान्यांमध्ये रासायनिक खते व कीटकनाशकांचे प्रमाण वाढायला लागले असून, त्याचे दुष्परिणाम मानवाच्या शरीरावर दिसू लागले आहेत.काही दिवसांत तयार होणाऱ्या पालेभाज्या तसेच फळांवर कीटकनाशकांचा वापर यांचा अतिरेकी वापर टाळायला हवा. तरच जमिनी सुस्थितीत राहिल. यासाठी सेंद्रिय शेतीची कास शेतकऱ्यांनी धरायला हवी, असे शेतीक्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. सेंद्रिय शेतीतील उत्पादनांमुळे पालेभाज्यांतील सत्व व्यवस्थित मिळत असल्याने आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते, असे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. (प्रतिनिधी)