शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

चित्रा वाघ यांचे बेताल वक्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:43 IST

सातारा : जिल्ह्यातील पोलीस प्रामाणिकपणे काम करत आहेत. चित्रा वाघ यांचे आरोप बिनबुडाचे असून, अपुऱ्या माहितीच्या आधारे त्या बेताल ...

सातारा : जिल्ह्यातील पोलीस प्रामाणिकपणे काम करत आहेत. चित्रा वाघ यांचे आरोप बिनबुडाचे असून, अपुऱ्या माहितीच्या आधारे त्या बेताल वक्तव्य करत आहेत. प्रत्येक घटनेची शहानिशा करूनच त्यांनी आरोप करावेत, अशी टीका गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत केली.

राज्याचे गृह राज्यमंत्री देसाई यांच्याच जिल्ह्यात महिलांवरील अत्याचार वाढत असल्याची टीका दोन दिवसांपूर्वी भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केली होती. यावर देसाई यांनी त्याला प्रत्युत्तर देत आरोप फेटाळून लावत घटनेतील संशयितांना अटक केल्याचे सांगितले. गृहराज्यमंत्री देसाई म्हणाले,‘‘चित्रा वाघ यांना जिल्ह्यात घडलेल्या घटनांची पुरेशी माहिती नसून त्यांनी सविस्तर माहिती घेऊन बोलावे. मागील काही दिवसात चाफळ, तांबवे, महाबळेश्वर, झिरपवाडी येथे झालेल्या घटनेतील एकूण सात जणांनादेखील अटक करण्यात आली आहे. तसेच, तांबवे येथील प्रकरणात कुटुंबीयांची भेट घेतली असून संशयितांना कडक शासन करण्यात येईल. या प्रकरणात कुटुंबीयांना तातडीची मदतही करण्यात आली आहे. सातारा तालुक्यातील एका घटनेत गट शिक्षणाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. चाफळमधील चाकू हल्ल्यातील सूत्रधारांना अटक करण्यात आली आहे.’’

दरम्यान, चित्रा वाघ या बेजबाबदार वक्तव्य करत असून, त्यांनी वस्तुस्थितीची माहिती घेतली पाहिजे. केवळ ऐकीव माहितीच्या आधारे त्या आरोप करत असून, त्यांनी प्रत्येक प्रकरणाची माहिती घ्यावी. राज्यभरात कुठेही महिलांवर अत्याचार झाल्यास तत्काळ कारवाई केली जात असल्याने वाघ यांनी बेताल वक्तव्य करणे सोडून द्यावे.