शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
2
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
3
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
4
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
5
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
6
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
7
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
8
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
9
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
10
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
11
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतरही टीम इंडियाने सेलिब्रेशन का नाही केलं? कारण...
12
FD मध्ये पैसे गुंतवताय? 'या' ६ बँका देत आहेत सर्वाधिक व्याज, लगेच तपासा यादी!
13
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
14
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
15
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
16
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
17
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
18
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
19
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
20
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब

बालगृहात हरवले बालपण

By admin | Updated: June 7, 2014 00:04 IST

सातारा जिल्ह्यात ३३ बालगृहे : अनाथ, निराधार बालकांची संख्या वाढली

मोहन मस्कर-पाटील ल्ल साताराजिल्ह्यात अनाथ, निराधार त्याचबरोबर निराश्रित बालकांची संख्या वाढू लागली असून, दोन हजारांहून अधिक जणांचे बालपण बालगृहात हरवले आहे. पालकांचे दुर्लक्ष आणि कुटुंबांपासून दुरावलेपण त्यास कारणीभूत आहे. विशेष म्हणजे खंडाळा आणि वाई तालुका वगळता जिल्ह्यात इतर नऊ तालुक्यांत ३३ बालगृहे आहेत. खंडाळा आणि वाई तालुका वगळता बालपण हरवलेल्या बालकांच्या संरक्षणाची आणि त्यांना आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात येतात की नाही याची जबाबदारी जिल्हा महिला व बालविकास विभागाकडे दिली आहे.बालगृहात कोणती बालके असावीत, यासाठी ‘बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २००० आणि २००६’ या कायद्यांतर्गत काही नियम निश्चित केले आहेत. बालगृहात असलेली बालके ‘काळजी व संरक्षणाची गरज’ असलेली असतात. अनाथ, निराधार, निराश्रित, आई-वडील आहेत; पण काही कारणांमुळे त्यांचा सांभाळ करू शकत नाहीत. बाल भिक्षेकरी, हरवलेली मुले, असाध्य आजारग्रस्त पालकांची मुले, कुमारी मातांची मुले बालगृहात ठेवली जातात.सातारा जिल्ह्यात ३३ बालगृहे तर प्रत्येकी एक निरीक्षण गृह, आधारगृह आणि शिशुगृह आहे. सातारा येथील आधारगृहात एचआयव्हीसंसर्गित बालके आहेत. या सर्वांची जबाबदारी महिला व बालविकास विभागाची आहे. सातारा शहर व आजूबाजूला बाल भिक्षेकरी नियमित दिसतात. मात्र, शासनाच्या लेखी कोणीही बालभिक्षेकरी नाही. बालगृहातून अनेकदा मुले निघून जातात; मात्र त्यांचा शोध घेतला असता ती त्यांच्याच घरी आढळून येतात, अशी माहिती आहे.बालकामगारांच्या प्रश्नांबाबतही सातारा येथील सहायक कामगार आयुक्त कार्यालय गंभीर नसल्याचा दावा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रोहिणी ढवळे यांचा आहे. त्यांच्या मते खासगी आस्थापना तसेच हॉटेलमध्ये छापासत्र होत नाही. ‘बाल न्याय अधिनियमा’नुसार ‘रिमांड होम’, ‘बालगुन्हेगार’ हे शब्द उच्चारण्यास बंदी आहे. त्याऐवजी अनुक्रमे ‘निरीक्षण गृह’, ‘विधीसंघर्षग्रस्त’ हे शब्द दिले आहेत. जिल्हा परीविक्षा व अनुरक्षण संघटनेकडे सातारच्या निरीक्षणगृहाची जबाबदारी असून, जिल्हाधिकारी अध्यक्ष आहेत. येथून गेल्या वर्षी पळालेला एक मुलगा अजूनही सापडला नाही.