शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
4
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
5
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
6
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
7
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
8
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
9
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
10
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
11
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
12
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
13
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
14
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
15
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
16
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
17
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
18
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
19
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
20
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

बालगृहात हरवले बालपण

By admin | Updated: June 7, 2014 00:04 IST

सातारा जिल्ह्यात ३३ बालगृहे : अनाथ, निराधार बालकांची संख्या वाढली

मोहन मस्कर-पाटील ल्ल साताराजिल्ह्यात अनाथ, निराधार त्याचबरोबर निराश्रित बालकांची संख्या वाढू लागली असून, दोन हजारांहून अधिक जणांचे बालपण बालगृहात हरवले आहे. पालकांचे दुर्लक्ष आणि कुटुंबांपासून दुरावलेपण त्यास कारणीभूत आहे. विशेष म्हणजे खंडाळा आणि वाई तालुका वगळता जिल्ह्यात इतर नऊ तालुक्यांत ३३ बालगृहे आहेत. खंडाळा आणि वाई तालुका वगळता बालपण हरवलेल्या बालकांच्या संरक्षणाची आणि त्यांना आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात येतात की नाही याची जबाबदारी जिल्हा महिला व बालविकास विभागाकडे दिली आहे.बालगृहात कोणती बालके असावीत, यासाठी ‘बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २००० आणि २००६’ या कायद्यांतर्गत काही नियम निश्चित केले आहेत. बालगृहात असलेली बालके ‘काळजी व संरक्षणाची गरज’ असलेली असतात. अनाथ, निराधार, निराश्रित, आई-वडील आहेत; पण काही कारणांमुळे त्यांचा सांभाळ करू शकत नाहीत. बाल भिक्षेकरी, हरवलेली मुले, असाध्य आजारग्रस्त पालकांची मुले, कुमारी मातांची मुले बालगृहात ठेवली जातात.सातारा जिल्ह्यात ३३ बालगृहे तर प्रत्येकी एक निरीक्षण गृह, आधारगृह आणि शिशुगृह आहे. सातारा येथील आधारगृहात एचआयव्हीसंसर्गित बालके आहेत. या सर्वांची जबाबदारी महिला व बालविकास विभागाची आहे. सातारा शहर व आजूबाजूला बाल भिक्षेकरी नियमित दिसतात. मात्र, शासनाच्या लेखी कोणीही बालभिक्षेकरी नाही. बालगृहातून अनेकदा मुले निघून जातात; मात्र त्यांचा शोध घेतला असता ती त्यांच्याच घरी आढळून येतात, अशी माहिती आहे.बालकामगारांच्या प्रश्नांबाबतही सातारा येथील सहायक कामगार आयुक्त कार्यालय गंभीर नसल्याचा दावा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रोहिणी ढवळे यांचा आहे. त्यांच्या मते खासगी आस्थापना तसेच हॉटेलमध्ये छापासत्र होत नाही. ‘बाल न्याय अधिनियमा’नुसार ‘रिमांड होम’, ‘बालगुन्हेगार’ हे शब्द उच्चारण्यास बंदी आहे. त्याऐवजी अनुक्रमे ‘निरीक्षण गृह’, ‘विधीसंघर्षग्रस्त’ हे शब्द दिले आहेत. जिल्हा परीविक्षा व अनुरक्षण संघटनेकडे सातारच्या निरीक्षणगृहाची जबाबदारी असून, जिल्हाधिकारी अध्यक्ष आहेत. येथून गेल्या वर्षी पळालेला एक मुलगा अजूनही सापडला नाही.