शहरं
Join us  
Trending Stories
1
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
2
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
3
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
4
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
5
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
6
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
7
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
8
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
10
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
11
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
12
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
13
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
14
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
15
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
16
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
17
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
18
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
19
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
20
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  

...तर मुख्यमंत्री लढणार !

By admin | Updated: July 13, 2014 23:02 IST

संकेत : कार्यकर्त्यांनी आग्रह केल्यास कऱ्हाड दक्षिण मतदारसंघातून उमेदवारी

कऱ्हाड : ‘आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे नेतृत्व मीच करणार आहे, असे ठामपणे सांगत असतानाच कार्यकर्त्यांचा आग्रह झाल्यास कऱ्हाड दक्षिणेतून स्वत: उभे राहण्याबाबत विचार करू,’ असे मत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले़ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज, रविवारी कऱ्हाड दौऱ्यावर असताना त्यांनी जखिणवाडी येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार आनंदराव पाटील, जयकुमार गोरे, मदनराव मोहिते, डॉ़ इंंद्रजित मोहिते, जयवंत जगताप, धोंडिराम जाधव, शिवराज मोरे, आदींची उपस्थिती होती़ मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, सध्या विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे़ माझ्या नेतृत्वाखालीच त्या लढविणार आहोत़ राष्ट्रवादी अन्् आम्ही एकत्रितच लढू़ लोकसभा निवडणुकीचा अनुभव लक्षात घेऊन आम्ही आमच्यातही काही बदल करवून घेणार आहोत़ उमेदवार निवडीचा पहिला अन् महत्त्वाचा टप्पा डोळ्यांसमोर आहे़ युतीचा कारभार जनतेने यापूर्वी अनुभवला आहे. म्हणून तर त्यांनी सलग पंधरा वर्षे आघाडीच्या हातात सत्ता दिली आहे. या निवडणुकीतही तसेच होईल. आपली कऱ्हाड दक्षिणेवरील स्वारीची तयारी सुरु आहे का? असे छेडले असता, ‘तसे काही नाही, कार्यकर्त्यांशी सुसंवाद साधायचा होता म्हणून आलोय, असे ते म्हणाले; पण काल, शनिवारी जिल्हा काँग्रसने पक्ष निरीक्षकांकडे तुम्ही दक्षिणेतून लढावे, असा ठराव केलाय अन् कार्यकर्त्यांचीही अपेक्षा आहे, यावर ‘कार्यकर्त्यांच्या अपेक्षांचा जरूर विचार करू,’ असे उत्तर देत त्यांनी दक्षिणेतून लढण्याचे संकेतच दिले आहेत़ मुख्यमंत्री बदलाच्या बातम्या पेरणाऱ्यांचा शोध लागला का? असे विचारताच ‘काहींची नावे कळालीत. काहींची कळतील,’ असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)प्रथमच सोडले मौनकऱ्हाड दक्षिणच्या उमेदवारीबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज प्रथमच मौन सोडले. यापूर्वी पत्रकारांनी दक्षिणेवरील स्वारीबाबत त्यांना अनेकदा छेडले; पण त्याचे उत्तर देणे मुख्यमंत्र्यांनी खुबीने टाळले. गत आठवड्यात मुख्यमंत्री चव्हाण कऱ्हाड दौऱ्यावर होते, त्यावेळी पत्रकार परिषदेपूर्वीच संपर्कमंत्र्यांनी ‘स्थानिक काही विचारू नका,’ असे अगोदरच सांगितले होते. आज मात्र पत्रकारांनी प्रश्नांची सरबत्ती करताच त्यांना दक्षिणच्या उमेदवारीबाबत आपले मौन सोडावे लागले अन् त्यांनी दक्षिणेतून लढण्याचे संकेतही दिले. भविष्यात छोटे-छोटे जिल्हे ‘कऱ्हाड जिल्ह्याचा प्रश्न बारामतीकरांमुळे अडलाय का?’ असे विचारताच ‘तसे काही नाही. ठाणेची लोकसंख्या मोठी होती. त्याचे विभाजन गरजेचे होते म्हणून तो पहिल्यांदा निर्णय घेतलाय. १ आॅगस्टला त्याची अधिकृत घोषणा होईल. १५ आॅगस्टपासून त्यांचा स्वतंत्र कारभार सुरू होईल; पण भविष्यात छोटे-छोटे जिल्हे करावेच लागणार आहे,’ असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.