शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
7
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
8
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
9
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
10
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
11
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
12
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
13
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
14
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
15
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
16
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
17
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
18
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
19
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

मुख्यमंत्र्यांनी घेतला जनता दरबार!

By admin | Updated: July 13, 2014 22:52 IST

विकासकामांचा आढावा : ७५ गावांच्या शिष्टमंडळाशी थेट संवाद

मलकापूर : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जखिणवाडी (ता़ कऱ्हाड) येथे कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा जनता दरबार घेतला. प्रत्येक गावात सुरू असलेल्या विकासकामाबाबत व भविष्यातील अवश्यक कामांबाबत ७५ गावांच्या शिष्टमंडळांशी त्यांनी थेट संवाद साधला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज विविध कार्यक्रमानिमित्त कऱ्हाड दौऱ्यावर आले होते़ जखिणवाडी ते आगाशिव पर्यटनस्थळांतर्गत डोंगरपायथ्यापर्यंतच्या १ कोटी १० लाख निधीतून रस्त्याचे खडीकरण, डांबरीकरण व सुशोभीकरण कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला़ यावेळी आमदार जयकुमार गोरे, आनंदराव पाटील, मदनराव मोहिते, डॉ इंद्रजित मोहिते, मनोहर शिंदे, जखिणवाडीचे सरपंच नरेंद्र नांगरे-पाटील, रामचंद्र पाटील, शामराव नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी रामास्वामी एन. यांची प्रमुख उपस्थिती होती. दुपारी एक वाजता जखिणवाडीचे सरपंच नरेंद्र पाटील यांच्या घरी मुख्यमंत्र्यांच्या जनता दरबाराची व्यवस्था करण्यात आली होती. या दरबारात मुख्यमंत्र्यांचे सर्व स्वीय सहायक उपस्थित होते. मुख्यमंत्रिपद सांभाळल्यापासून कऱ्हाड दक्षिणेतील प्रत्येक गावात किती निधी दिला व तो कोणत्या कामांसाठी दिला, ती कामे कुठपर्यंत आली, याबाबत प्रत्येक गावाच्या शिष्टमंडळाशी मुख्यमंत्री चव्हाण यांनी थेट संवाद साधला. रखडलेल्या कामातील अडचणीबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर प्रत्येक गावात भविष्यातील आवश्यक कामांबाबत निवेदने स्वीकारून त्यावर चर्चा करीत मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना कामाच्या सूचना केल्या. (प्रतिनिधी)