शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

‘सीओं’बाबत मुख्यमंत्र्यांचे आश्वासन!

By admin | Updated: June 19, 2017 00:50 IST

लवकरच बदली : उपोषण मागे; कऱ्हाड पालिकेच्या नगराध्यक्षांची माहिती

कऱ्हाड : कऱ्हाड पालिकेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी सुरू केलेले उपोषण अखेर सातव्या दिवशी रविवारी मागे घेण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, भाजपचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले यांची फोनवरून चर्चा झाली. त्यावेळी मुख्याधिकाऱ्यांच्या बदलीबाबत मुख्यमंत्र्यांनी लवकरच निर्णय घेऊ, असे आश्वासन दिल्याची माहिती नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांनी उपोषणकर्त्यांना दिली. त्यामुळे उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेत संप मिटल्याचे जाहीर केले.यावेळी नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, तहसीलदार राजेंद्र शेळके, निवासी नायब तहसीलदार अजित कुऱ्हाडे, सर्व नगरसेवक, पालिका अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.येथील पालिकेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्याविरोधात गत सात दिवसांपासून कर्मचाऱ्यांनी उपोषण तसेच काम बंद आंदोलन सुरू केले होते. तसेच नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकही मुख्याधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी करीत होते. संपाचा आजचा सातवा दिवस असताना दुपारी अचानक नगराध्यक्षा रोहिणी शिंदे यांच्यासह सर्व नगरसेवकांची कमराबंद चर्चा झाली. त्यानंतर सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सर्वजण उपोषणस्थळी दाखल झाले. उपोषणकर्त्यांशी बोलताना नगराध्यक्षा रोहिणी शिंदे म्हणाल्या, ‘मुख्याधिकाऱ्यांच्या कारभाराबाबत भाजपाचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली. मीसुद्धा मुख्यमंत्र्यांशी फोनवरून बोलले. मुख्याधिकारी औंधकर यांच्याकडून पालिका कर्मचाऱ्यांना दिला जाणारा त्रास, अनेक मार्गाने केलेला भ्रष्टाचार याची माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात आली. या चर्चेदरम्यान मुख्याधिकाऱ्यांच्या बदलीबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी उपोषण व आंदोलन मागे घ्यावे. नगराध्यक्षांनी विनंती केल्यानंतर कर्मचाऱ्यांनीही त्यास सकारात्मक प्रतिसाद देत उपोषण मागे घेत असल्याचे जाहीर केले. नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, तहसीलदार राजेंद्र शेळके, उपनगराध्यक्ष जयवंत पाटील, विक्रम पावसकर यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांना सरबत देऊन उपोषण मागे घेण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. कर्मचाऱ्यांनीही व्यक्त केल्या भावना !गेली सात दिवस सुरू असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या उपोषणाचा शेवट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतर गोड झाल्याने अनेकांना यावेळी अश्रू अनावर झाले. त्यांनी उपोषण सोडताना उशिरा का होईना शासनाने मागण्यांची दखल घेतली, असे सांगत आपल्या भावना व्यक्त केल्या.