शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती शाहू महाराजांचे संशोधन केंद्र साताऱ्यात व्हावे, डॉ. भारत पाटणकरांनी केली मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2021 19:52 IST

या मागणीची पूर्तता शासनाने न केल्यास श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला दिला.

सातारा : शंभूपुत्र आणि संपूर्ण भारतभर मराठा साम्राज्याची पताका फडकविणारे चौथे छत्रपती शाहू महाराज यांचेही भव्य स्मारक पुणे येथे शनिवारवाडा आणि साताऱ्यात संशोधन केंद्र व्हावे, अशी मागणी श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत केली. या मागणीची पूर्तता शासनाने न केल्यास श्रमिक मुक्ती दलाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला दिला.डॉ. पाटणकर पुढे म्हणाले, पैठण धर्मपीठाच्या विरोधामुळे छत्रपती शिवरायांना वेदोक्त आणि पुराणोक्त असा दोन वेळा राज्याभिषेक करावा लागला. जाती व्यवस्थेला व वतनदारीला रयतेच्या हितासाठी विरोध हे शिवरायांचे पुत्र छत्रपती संभाजीराजे यांनी अंमलात आणले. महाराणी येसूबाई यांना संभाजीराजांनी श्री सखी राज्ञी जयती अशी स्वतंत्र अधिकाराची मोहोर दिली. त्यांची ही कृती स्त्री मुक्तीचा आवाज बुलंद करणारी होती.धर्मरक्षणासाठी औरंगजेबाच्या विरोधात बलिदान देणाऱ्या छत्रपती शंभूराजे यांचे विचार, कार्यशैली यांना व्यक्त करणारे त्यांचे वढू तुळापूर येथील स्मारक त्यांच्या कर्तृत्वाला साजेसे असेच करावे. या स्मारकाचा नियोजित आराखडा केल्याबद्दल डॉ. पाटणकर यांनी राज्य शासनाचे अभिनंदन केले.छत्रपती संभाजीपुत्र छत्रपती शाहू महाराज यांची कामगिरी गौरवास्पद आहे. सतत ४२ वर्षे मराठा साम्राज्याची पताका भारतभर फडकावणाऱ्या शाहू महाराजांचे स्मारक शनिवारवाडा पुणे व सातारा येथे व्हावे, याशिवाय शाहू महाराजांच्या राजकीय कारभाराचे आणि कार्यशैलीचा वस्तुनिष्ठ अभ्यास करणारे संशोधन केंद्र उभारण्यात यावे, अशी मागणी डॉ. भारत पाटणकर यांनी केली. छत्रपती शाहू आणि स्वराज्य रक्षक सम्राज्ञी ताराराणी यांच्या माहुली येथील समाधी विपन्नावस्थेत असल्याबद्दल पाटणकर यांनी खंत व्यक्त केली. या ऐतिहासिक स्मारक आणि संशोधन केंद्राचे निवेदन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आम्ही देणार आहोत असे पाटणकर यांनी स्पष्ट करत मागणी दुर्लक्षित झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला .

टॅग्स :Satara areaसातारा परिसरShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपती