शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

जिहे-कठापूरसाठी बदलला रेल्वेमार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:30 IST

सातारा : खटाव-माण तालुक्यांसाठी नवसंजीवनी ठरणारी जिहे-कठापूर उपसा जलसिंचन योजना अनेक छोट्या मोठ्या अडचणींमुळे रखडत होती. कधी जल आयोगाची ...

सातारा : खटाव-माण तालुक्यांसाठी नवसंजीवनी ठरणारी जिहे-कठापूर उपसा जलसिंचन योजना अनेक छोट्या मोठ्या अडचणींमुळे रखडत होती. कधी जल आयोगाची परवानगी नाही, तर कधी रेल्वे विभागाची परवानगी न मिळण्यामुळे काम पूर्ण होत नव्हते. अखेर या योजनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरू ‘गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार जिहे कठापूर उपसा सिंचन योजना’ असे नाव देण्यात आले आणि चक्क अडचणीतील परवानग्याही मिळत गेल्या. आत्तापर्यंतच्या इतिहासातील सर्वांत महत्त्वाची घटना म्हणजे रेल्वेचा ट्रॅक उचलून बाजूला करण्यात आला. केवळ योजनेचे नाव बदलल्याने झालेला हा बदल सर्वांसाठीच आश्चर्यकारक असला तरी दुष्काळी भागातील लोकांसाठी लाभदायकच आहे.

माण-खटावमधील दुष्काळी भागातून शेतकऱ्यांचे कित्येक वर्षांचे स्वप्न साकार होताना दिसत असून, अनेक वर्षांपासून चर्चेत असलेली जिहे कठापूर उपसा जलसिंचन योजना तिचे नामकरण ‘गुरुवर्य लक्ष्मणरावजी इनामदार उपसा जलसिंचन योजना’ असे करण्यात आले आणि या योजनेचे महत्त्व वाढले. सध्या या योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असल्याची माहिती लक्ष्मणराव इनामदार लोककल्याण चॅरिटेबल ट्रस्ट खटाव यांच्यावतीने देण्यात आली आहे. जिहे कठापूर येथील (बॅरेज ) बंधाऱ्याचे काम १०० टक्के पूर्ण झाले असून या योजनेच्या पंप हाऊसचे कामसुद्धा पूर्णत्वास गेले आहे. जिहे कठापूर ते नेर धरण संपूर्ण २३ किलोमीटर पाईपलाईन वर्धनगड घाट बोगद्यासह १०० टक्के पूर्ण झाली आहे. या योजनेस आवश्यक असणारा ४० केव्हीचा विद्युत पुरवठा प्राधान्याने मंजूर करण्यात येऊन तोही अंतिम टप्प्यात आहे. पाईपलाईन टेस्टिंग पूर्ण झाले असून त्या संदर्भातील अडचणी निराकरण करण्यात आल्या आहेत.

रेल्वे क्रॉसिंगच्या अडचणीमुळे लोहमार्गाखालून पाईपलाईन टाकणे अडचणीचे ठरत होते. पुणे-मिरज लोहमार्ग बंद करून क्रॉसिंग करता येत नव्हते. त्यासाठी विशेष परवानगीची गरज होती. अखेर लक्ष्मणराव इनामदार लोककल्याण चॅरिटेबल ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी नेहमीप्रमाणे पुढाकार घेऊन रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या मंत्रालयात केलेल्या पाठपुराव्यामुळे या कामाला मंजुरी मिळाली आणि १ जून ते १५ जून या कालावधीत आवश्यकतेप्रमाणे लोहमार्ग बंद करून काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे या प्रकल्पातील शेवटची अडचणही दूर झाली आहे. त्यासाठी संपूर्ण ट्रॅकच उचलून बाजूला करण्यात आला आहे. अत्यंत अवघड असे हे काम; पण मनात आणले तर काय होऊ शकते याचे प्रत्यंतर यातून मिळते. गेली ५० वर्षे या भागात पाणी येणार म्हणून वाट पाहणाऱ्या जनतेसाठी आता पाणी येण्याच्या आशा पल्लवित झाल्या असून येरळा नदी लवकरच वाहती होईल, असा विश्वास आहे.

फोटो ०३रेल्वे ट्रॅक

जिहे-कठापूर योजनेच्या पूर्ततेसाठी गोगावलेवाडीजवळ पर्यायी व्यवस्था करण्यात आली असून रेल्वे ट्रॅक उचलूनच बाजूला ठेवण्यात आला आहे. (छाया : केशव जाधव)