शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्याबद्दल बातमी आली की, माझा मोबाईल...", उमर नबीबद्दल जहूर इलाहीमुळे पोलिसांच्या हाती मोठा पुरावा
2
राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये वाघ व बिबट्यांची दहशत; बिबट्यांच्या मुक्त संचारामागे कारणे काय?
3
'भारताने माझ्या आईचे प्राण वाचवले, त्यांना बांगलादेशच्या स्वाधीन करणार नाहीत'; शेख हसीना यांच्या मुलाने व्यक्त केला विश्वास
4
ICC ODI Batting Ranking : 'नवा गडी नव राज्य!' रोहित शर्माला मागे टाकत डॅरिल मिचेलनं रचला इतिहास
5
"मदरसे-मशिदीतून दहशतवादी बाहेर पडतात..."; योगी सरकारमधील मंत्र्याचं वादग्रस्त विधान, AMU वरही उपस्थित केला सवाल
6
Jalgaon Crime: 'चोर पऱ्या' बोलला अन्...; रेल्वे रुळावर मृतदेह सापडलेल्या हर्षलची हत्याच; सगळा घटनाक्रम आला समोर
7
महागड्या क्रिम्सना बाय-बाय, Skinimalism सोपा उपाय; ३ स्टेपमध्ये मेकअपशिवाय ग्लोइंग स्किन
8
'मला नीट झोप येत नाहीये...', बिहार निवडणुकीत 'जन सुराज'च्या पराभवावर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया
9
जगातील टॉप हाय-स्ट्रीट रँकिंगमध्ये भारताचा दबदबा! ही बाजारपेठ सर्वात महागडी, तर सर्वाधिक भाडे कुठे?
10
आता बँक FD विसरा! पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये मिळतंय ८.२०% पर्यंत व्याज; गॅरंटीड रिटर्नवाले प्लान्स पाहा
11
सिद्धू मूसेवाला ते बाबा सिद्दीकी हत्या अन् सलमान खान..; अनमोल बिश्नोईची संपूर्ण क्राइम कुंडली
12
Jara Hatke: सिम कार्डचे एक टोक तिरपे का असते? ९९ % लोकांना माहीत नाही कारण!
13
किमान ५ इमारतीच्या गटाचे ‘मिनी क्लस्टर’ लवकरच; मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याला यश
14
"मला शिव्या दिल्या तर फरक नाही, पण संघावर आल्यावर मी..."; पिट्या भाईने सांगितले मनसे सोडण्याचे कारण
15
घरमालक-भाडेकरू वादावर अखेर ब्रेक! 'नवीन भाडे करार २०२५' लागू; 'हा' नियम मोडल्यास ५ हजार दंड!
16
Vastu Tips: घड्याळ दोन-तीन मिनिटं पुढे लावणे शुभ? पाहा वास्तू शास्त्र काय सांगते... 
17
धर्म आणि जातीवर ऐश्वर्या राय बच्चनचं वक्तव्य, पंतप्रधान मोदींच्या पाया पडत घेतले आशीर्वाद
18
गँगस्टर अनमोल बिश्नोईला अमेरिकेने हाकलले, विमानातून उतरताच एनआयएने ताब्यात घेतले  
19
छत्तीसगडमध्ये दोन अल्पवयीन मुलांना ATSकडून अटक; 'ब्रेनवॉश' करून ISISमध्ये सुरू होती भरती
20
स्लीपर वंदे भारत अन् बुलेट ट्रेन कधीपासून सुरू होणार? अश्विनी वैष्णव यांनी तारखाच सांगितल्या
Daily Top 2Weekly Top 5

जिहे-कठापूरसाठी बदलला रेल्वेमार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:30 IST

सातारा : खटाव-माण तालुक्यांसाठी नवसंजीवनी ठरणारी जिहे-कठापूर उपसा जलसिंचन योजना अनेक छोट्या मोठ्या अडचणींमुळे रखडत होती. कधी जल आयोगाची ...

सातारा : खटाव-माण तालुक्यांसाठी नवसंजीवनी ठरणारी जिहे-कठापूर उपसा जलसिंचन योजना अनेक छोट्या मोठ्या अडचणींमुळे रखडत होती. कधी जल आयोगाची परवानगी नाही, तर कधी रेल्वे विभागाची परवानगी न मिळण्यामुळे काम पूर्ण होत नव्हते. अखेर या योजनेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरू ‘गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार जिहे कठापूर उपसा सिंचन योजना’ असे नाव देण्यात आले आणि चक्क अडचणीतील परवानग्याही मिळत गेल्या. आत्तापर्यंतच्या इतिहासातील सर्वांत महत्त्वाची घटना म्हणजे रेल्वेचा ट्रॅक उचलून बाजूला करण्यात आला. केवळ योजनेचे नाव बदलल्याने झालेला हा बदल सर्वांसाठीच आश्चर्यकारक असला तरी दुष्काळी भागातील लोकांसाठी लाभदायकच आहे.

माण-खटावमधील दुष्काळी भागातून शेतकऱ्यांचे कित्येक वर्षांचे स्वप्न साकार होताना दिसत असून, अनेक वर्षांपासून चर्चेत असलेली जिहे कठापूर उपसा जलसिंचन योजना तिचे नामकरण ‘गुरुवर्य लक्ष्मणरावजी इनामदार उपसा जलसिंचन योजना’ असे करण्यात आले आणि या योजनेचे महत्त्व वाढले. सध्या या योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असल्याची माहिती लक्ष्मणराव इनामदार लोककल्याण चॅरिटेबल ट्रस्ट खटाव यांच्यावतीने देण्यात आली आहे. जिहे कठापूर येथील (बॅरेज ) बंधाऱ्याचे काम १०० टक्के पूर्ण झाले असून या योजनेच्या पंप हाऊसचे कामसुद्धा पूर्णत्वास गेले आहे. जिहे कठापूर ते नेर धरण संपूर्ण २३ किलोमीटर पाईपलाईन वर्धनगड घाट बोगद्यासह १०० टक्के पूर्ण झाली आहे. या योजनेस आवश्यक असणारा ४० केव्हीचा विद्युत पुरवठा प्राधान्याने मंजूर करण्यात येऊन तोही अंतिम टप्प्यात आहे. पाईपलाईन टेस्टिंग पूर्ण झाले असून त्या संदर्भातील अडचणी निराकरण करण्यात आल्या आहेत.

रेल्वे क्रॉसिंगच्या अडचणीमुळे लोहमार्गाखालून पाईपलाईन टाकणे अडचणीचे ठरत होते. पुणे-मिरज लोहमार्ग बंद करून क्रॉसिंग करता येत नव्हते. त्यासाठी विशेष परवानगीची गरज होती. अखेर लक्ष्मणराव इनामदार लोककल्याण चॅरिटेबल ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी नेहमीप्रमाणे पुढाकार घेऊन रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या मंत्रालयात केलेल्या पाठपुराव्यामुळे या कामाला मंजुरी मिळाली आणि १ जून ते १५ जून या कालावधीत आवश्यकतेप्रमाणे लोहमार्ग बंद करून काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे या प्रकल्पातील शेवटची अडचणही दूर झाली आहे. त्यासाठी संपूर्ण ट्रॅकच उचलून बाजूला करण्यात आला आहे. अत्यंत अवघड असे हे काम; पण मनात आणले तर काय होऊ शकते याचे प्रत्यंतर यातून मिळते. गेली ५० वर्षे या भागात पाणी येणार म्हणून वाट पाहणाऱ्या जनतेसाठी आता पाणी येण्याच्या आशा पल्लवित झाल्या असून येरळा नदी लवकरच वाहती होईल, असा विश्वास आहे.

फोटो ०३रेल्वे ट्रॅक

जिहे-कठापूर योजनेच्या पूर्ततेसाठी गोगावलेवाडीजवळ पर्यायी व्यवस्था करण्यात आली असून रेल्वे ट्रॅक उचलूनच बाजूला ठेवण्यात आला आहे. (छाया : केशव जाधव)