शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

उदयनराजेंनी चिथावणीखोर वक्तव्य करू नये -चंद्रकांत खंडाईत : देशाच्या सर्वोच्च सभागृहात भूमिका स्पष्ट करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2018 01:02 IST

सातारा : कोरेगाव भीमा घटनेसंदर्भात सर्वोच्च सभागृहात लोकप्रतिनिधींनी भूमिका मांडून दंगलखोर तसेच संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांच्यावरील कारवाईबाबत चर्चा केली.

ठळक मुद्देलोकप्रतिनिधी या नात्याने सामाजिक सलोखा राखण्याचा प्रयत्न करायला हवाकोरेगाव भीमा प्रकरणात तसेच सामाजिक सलोखा राखण्याचा प्रयत्न करावा.

सातारा : कोरेगाव भीमा घटनेसंदर्भात सर्वोच्च सभागृहात लोकप्रतिनिधींनी भूमिका मांडून दंगलखोर तसेच संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांच्यावरील कारवाईबाबत चर्चा केली. त्यावेळी गप्प बसलेले साताºयाचे लोकप्रतिनिधी बाहेर मात्र चिथावणीखोर वक्तव्ये करतात. खासदार उदयनराजे भोसले यांनी संसदेत भूमिका मांडावी,’ अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत यांनी केली.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात खंडाईत यांनी म्हटले आहे की, खासदार उदयनराजे भोसले यांनी खरे तर वढू या गावी जाऊन छत्रपती संभाजीराजे यांचा अखेरचा इतिहास समजून घ्यावा. त्यासाठी ज्यांनी बलिदान दिले त्या शूरवीरांनाही समजून घ्यावे. नंतर ही दंगल कोणत्या विचाराने घडवण्यात आली याचा विचार करूनच संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांची महती लोकांना सांगावी. ज्या विचारसरणीने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचेही विद्रूपीकरण केले. त्यांचे समर्थन आपण केले. २१ व्या शतकात वंचितांना न्याय मिळावा म्हणून निर्माण केलेल्या अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टलाही विरोध केला. त्यामुळे आपणही मनुस्मृतीच्या व्यवस्थेला बळी पडलेला आहात. यावरूनच कोणाची लायकी काय आहे, हे जनतेला समजून येईल.

खंडाईत यांनी पुढे म्हटले आहे की, साताºयाचे लोकप्रतिनिधी खासदार उदयनराजे भोसले यांनी मी जातपात मानत नाही, असे गुळगुळीत शब्द वापरून नंतर ३५ टक्के बाहेर पडले तर काय? आणि बाकीचे किती टक्के आहेत, असे चिथावणीखोर वक्तव्ये केली. याचा भारिप बहुजन महासंघ व समविचारी पक्षांच्या वतीने तीव्र निषेध आहे. लोकशाहीत लोकप्रतिनिधींनी एका समूहाला जवळ आणि एका समूहाला दूर सारून पक्षपातीपणाची भूमिका बजावू नये. तसेच त्यांनी लोकप्रतिनिधी या नात्याने सामाजिक सलोखा राखण्याचा प्रयत्न करायला हवा. त्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी तेड निर्माण करण्याचा प्रयत्नकेला जात आहे. हे चुकीचे आहे. भीमा कोरेगाव प्रकरणात तसेच सामाजिक सलोखा राखण्याचा प्रयत्न करावा. निवेदनावर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत, सिद्धार्थ खरात, विशाल भोसले, गणेश भिसे, जयवंत कांबळे उपस्थित होते.सामाजिक सलोखा राखावा‘लोकशाहीत लोकप्रतिनिधींनी एका समूहाला जवळ आणि एका समूहाला दूर सारून पक्षपातीपणाची भूमिका बजावू नये. तसेच त्यांनी लोकप्रतिनिधी या नात्याने सामाजिक सलोखा राखण्याचा प्रयत्न करायला हवा. तसेच सामाजिक सलोखा राखण्याचा प्रयत्न करावा,’ असे आवाहनही चंद्रकांत खंडाईत यांनी पत्रकार परिषदेत केले.