शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

साखरेला योग्य भाव मिळावा म्हणून केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:39 IST

पाटण : ‘शेतकऱ्यांच्या उसाला एफआरपीप्रमाणे योग्य दर मिळावा म्हणून केंद्र सरकार धोरण ठरविते. मात्र, त्याचप्रमाणे राज्यातील सहकारी ...

पाटण : ‘शेतकऱ्यांच्या उसाला एफआरपीप्रमाणे योग्य दर मिळावा म्हणून केंद्र सरकार धोरण ठरविते. मात्र, त्याचप्रमाणे राज्यातील सहकारी साखर कारखान्यात तयार होणाऱ्या साखरेलाही योग्य दर मिळाला पाहिजे. देशातील साखर उद्योगाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारनेच मदत करणे गरजेचे आहे,’ असे मत गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी व्यक्त केले.

लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार दूरदृश्यप्रणालीद्वारे ऑनलाईन पार पडली.

यावेळी ते बोलत होते. यावेळी मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, यशराज देसाई, जयराज देसाई, चेअरमन अशोकराव पाटील, व्हाईस चेअरमन राजाराम पाटील, माजी चेअरमन डॉ. दिलीपराव चव्हाण, आनंदराव चव्हाण, सोमनाथ खामकर, गजानन जाधव, शशिकांत निकम, संपतराव सत्रे, पांडुरंग नलवडे, बाळासाहेब शेजवळ, राजेंद्र गुरव, बशीर खोंदू, भरत साळुंखे, विजय पवार, संतोष गिरी, सुरेश पानस्कर, प्रकाशराव जाधव उपस्थित होते. सभेला शिवदौलत बँकेच्या तारळे, पाटण व ढेबेवाडी या शाखांमधून सभासद शेतकरी ऑनलाईन उपस्थित राहिले.

देसाई म्हणाले, ‘सध्या सर्वच क्षेत्रात स्पर्धा असल्याने सहकारी साखर क्षेत्रात ही मोठी स्पर्धा आहे. स्पर्धेत टिकण्यासाठी राज्यातील इतर मोठ्या कारखान्यांच्या तुलनेत देसाई कारखाना लहान असतानाही इतर कारखान्यांबरोबर एफआरपीप्रमाणे देसाई कारखान्याने शेतकऱ्यांना दर दिला आहे.

कोणताही कारखाना कधीही मुद्दाम एफआरपीचे हप्ते रखडत ठेवत नाही. केंद्र सरकारचे साखर धोरणच राज्यातील सहकारी साखर कारखानदारीसाठी योग्य नाही. परिणामी राज्यातील साखर कारखानदारी अडचणीत आली आहे.

प्रतिकूल परिस्थितीमध्येही देसाई कारखान्याची चांगली वाटचाल सुरू आहे. १२५० मेट्रिक टन क्षमतेचा कारखाना संपूर्ण एफआरपीप्रमाणे शेतकऱ्यांना उसाचा दर देतो. हे एकमेव उदाहरण आहे. १२५० मेट्रिक टन क्षमतेचे अनेक कारखाने डबघाईला आले, लिलावात निघाले. खर्चामध्ये काटकसर करत जादा उत्पादन करून एफआरपी देण्याचा प्रयत्न केला.’

चौकट

...तर त्यांचे सभासदत्व रद्द होणार..!

जे ऊस उत्पादक सभासद शेतकरी कारखान्याची सवलतीची साखर घेऊन, कारखान्याचे इतर सर्व लाभ घेऊनही आपल्या क्षेत्रात पिकलेला शंभर टक्के ऊस देसाई कारखान्याला घालत नसतील अथवा त्यांच्या शंभर टक्के पिकलेल्या उसापैकी थोडा जरी ऊस बाहेर गेला, तरी त्या सभासदाला संचालक मंडळ खुलासा मागतील.