शहरं
Join us  
Trending Stories
1
Viral Video: प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी ३ ट्रेन आल्या अन्...; बर्दवान स्थानकावर चेंगराचेंगरीसदृश स्थिती, ७ जण जखमी
2
भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक विजय! हीलीच्या सेंच्युरीनंतर पेरीनं सिक्सर मारत संपवली मॅच
3
'अश्लील फोटो, मेसेज अन्...', भाजप आमदार शिवाजी पाटलांना 'हनी ट्रॅप'मध्ये अडकवण्याचा प्रयत्न; सख्ख्या बहीण-भावाला अटक
4
Bihar Election 2025: एनडीएचं जागावाटप झालं, पण कोणाला करावी लागली तडजोड? २०२० मध्ये कोणी किती जागा लढवल्या होत्या?
5
नागपूर पोलीस ॲक्शन मोडवर! घरफोडीच्या गुन्ह्यांत तब्बल ५७ टक्के घट, २१७ ढाबे-हॉटेलवर कारवाई
6
"जे हुंडा घेतील ते नामर्द, बायको लक्ष्मी म्हणून घरात आणायची आणि..."; मकरंद अनासपुरेंचे परखड भाष्य
7
Thane: सराईत सोनसाखळी चोरट्यास ठाण्यात अटक; अडीच लाखांचे दागिने हस्तगत!
8
बदली रद्द करण्यासाठी पोलिसाचा 'जुगाड'; बनावट कागदपत्रे जोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल
9
Jemimah Rodrigues Flying Catch : जबरदस्त! जेमीनं हवेत झेपावत टिपला वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम झेल
10
"माझ्या आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातही..." ठाकरे बंधूंच्या भेटीवर रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य
11
ऐतिहासिक भागीदारी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्मृती मानधना- प्रतीका रावल यांनी रचला विक्रम
12
NDA चे जागावाटप ठरले! BJP-JDU प्रत्येकी 101 जागांवर लढणार; चिराग अन् माझींंच्या पक्षाला किती जागा?
13
बाबासाहेबांचे आर्थिक, सामाजिक समानतेचे स्वप्न पूर्ण होईल: सरन्यायाधीश भूषण गवई
14
सांगलीकर स्मृतीची बॅट चांगलीच तळपली; एक्स्प्रेस वेगानं ५००० धावा करत 'चारचौघीं'वर पडली भारी!
15
Nagpur: दिवाळीच्या गर्दीत नागपूर रेल्वेस्थानक हाउसफुल, आरपीएफ- जीआरपीची गस्त वाढली, गुन्हेगारांवर नजर!
16
"अमेरिकेची भूमिका दुटप्पी, आम्हीही..."; ट्रम्प यांच्या १०० टक्के टॅरिफच्या धमकीला चीनचे उत्तर
17
IND vs AUS : स्मृती-प्रतीकाची तुफान फटकेबाजी; टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर उभारली विक्रमी धावसंख्या
18
संतापजनक! प्रेमानंद महाराजांची भेट करुन देण्याच्या बहाण्याने हॉटेलमध्ये महिलेवर अत्याचार, मथुरा येथे आरोपीला अटक
19
Viral Video: तिकीट न काढता मेट्रोतून प्रवास करण्याचा जुगाड, व्हिडीओ पाहून डोक्याला माराल हात!
20
Thane Video: पतीला मारहाण करत शिवीगाळ, मनसे पदाधिकारी असलेल्या पत्नीने परप्रांतीय महिलेच्या लगावली कानशिलात; ठाण्यातील घटना

कारखानदारांच्या अडचणीला केंद्र सरकार जबाबदार

By admin | Updated: January 13, 2015 00:18 IST

जयंत पाटील : निर्यात धोरणाअभावी एफआरपी अशक्य

सांगली : केंद्र सरकारने साखर निर्यात धोरण जाहीर न केल्यानेच एफआरपीची रक्कम देणे कारखान्यांना शक्य होत नाही. वास्तविक, यापूर्वीच केंद्र सरकारने साखर निर्यातीचा निर्णय घेणे अपेक्षित होते. परंतु, तसे न झाल्याने सध्या तरी कारखानदारांपुढे निर्माण झालेल्या अडचणीला केंद्र सरकारच जबाबदार आहे, असा आरोप माजी अर्थमंत्री आ. जयंत पाटील यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केला.धरणग्रस्तांच्या प्रश्नासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्याकरिता आ. पाटील सांगलीत आले होते. चर्चा सकारात्मक झाल्याचे सांगून आ. पाटील म्हणाले की, जागतिक बाजारपेठेत साखरेचे दर कोसळले आहेत. साहजिकच उत्पादन खर्चापेक्षा साखरेच्या किमती कमी झाल्या आहेत. यामुळेच कारखान्यांना एफआरपीप्रमाणे दर देणे अवघड झाले आहे. कोल्हापूर येथील काही कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे दर देण्याचे केवळ जाहीर केले आहे. केंद्र सरकारची आतापर्यंतची वाटचाल पाहता, त्यांचे धोरण शेतकरीहिताचे वाटत नाही. आॅक्टोबर महिन्यातच बदलती परिस्थिती पाहून साखर निर्यात करण्याची भूमिका सरकारने घेणे अपेक्षित होते. अजूनही वेळ गेलेली नाही. सरकारने त्वरित निर्यात धोरण जाहीर करावे. आमच्या काळात अशीच परिस्थिती उद्भवली असता, कृषिमंत्री शरद पवार यांनी केवळ निर्यात धोरण जाहीर केल्याने साखरेचे दर १०० रुपयांनी वाढले होते.सध्याच्या सरकारमध्ये शरद पवारांसारखे शेतकरीहिताचे मंत्री नसल्यामुळेच निश्चित धोरण जाहीर करण्यास उशीर झाला असावा. एफआरपीचा प्रश्न सुटायचा असेल, तर साखरेचे दर वाढविणे हाच त्यावरील प्रमुख उपाय आहे, असेही आ. पाटील यांनी सांगितले. ‘स्वाभिमानी’वर बोलू  इच्छित नाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेबाबत आ. पाटील म्हणाले की, वारंवार आंदोलने करून शेती प्रश्नावर संघटनेच्या नेत्यांचे ज्ञान वाढलेले आहे. शेतकरी हितासाठी संघटनेने सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला असला तरी, त्या विषयी मी अधिक काही बोलू इच्छित नाही.