शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
4
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
5
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
6
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
7
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
8
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
9
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
10
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
11
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
13
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
14
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
15
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
16
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
17
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
18
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!
19
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
20
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य

केंद्र व राज्य सरकारने जनतेच्या हिताचे निर्णय घ्यावेत : सुरेश माने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क फलटण : ‘शेतकरी, विद्यार्थी, अनुसूचित जाती-जमाती, अल्पसंख्याक, भटके विमुक्त, ओबीसी अशा सर्व समाज घटकांबरोबरच राज्यातील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

फलटण : ‘शेतकरी, विद्यार्थी, अनुसूचित जाती-जमाती, अल्पसंख्याक, भटके विमुक्त, ओबीसी अशा सर्व समाज घटकांबरोबरच राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या हिताचे अनेक निर्णय प्रलंबित असून, ते केंद्र व राज्य सरकारने तातडीने घ्यावेत,’ अशी मागणी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. डॉ. सुरेश माने यांनी पत्रकार परिषदेत केली.

सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांकडे लक्ष वेधण्यासाठी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्यावतीने ५० दिवसीय राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा काढण्यात आली असून, या यात्रेचे आगमन रविवारी (दि. ७) फलटण शहरात झाले. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राज्यात समतोल विकासासाठी विशेष मागास जिल्हे, तालुक्यातील विकासाकरिता पुरेसा निधी व पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात, केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी किसान कोर्ट किंवा शेतकरी लवादांची निर्मिती करावी, सरकारी नोकर भरतीतील कंत्राटी पद्धत बंद करून तातडीने नोकर भरती करावी, राज्यातील सर्व विद्यार्थी वसतिगृहांचे आधुनिकीकरण करावे, खासगी क्षेत्रात नोकरीमध्ये आरक्षण लागू करावे, राज्यातील मुस्लिमांना मागासलेपणाच्या आधारावर शिक्षण व नोकरीत आरक्षण द्यावे, आदी प्रमुख मागण्यांसाठी ही जनसंघर्ष यात्रा काढण्यात आल्याचे सांगून आगामी काळात केंद्र सरकारच्या नागरिकत्व धोरण व एन. आर. सी.विरोधात पक्षाच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे यावेळी अ‍ॅड. डॉ. सुरेश माने यांनी सांगितले.