शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कास बंगला बनलाय दुर्लक्षाचा भूत बंगला!

By admin | Updated: December 29, 2016 22:24 IST

पालिकेचे दुर्लक्ष : तलावात फोडल्या जातायंत काचा

पेट्री : सातारा जिल्ह्यातील कास तलाव आणि कास पठार हे प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. सातारा पालिकेच्या दुर्लक्षामुळे या तलावाशेजारील कास बंगल्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे हा कास बंगला आहे की भूत बंगला, असा प्रश्न पर्यटकांना पडत आहे. कास तलाव आणि कास पठार पर्यटकांचे खास आकर्षण आहे. त्यामुळे शहराच्या पश्चिमेला नजर वळताच कास तलाव आणि पठार पाहण्याचा बेत पक्का केला जातो. या ठिकाणी प्रत्येक ऋतूत पर्यटकांची सतत वर्दळ सुरू असते.सातारा जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील पर्यटक आपल्या कुटुंबासमवेत खास करून या परिसरात पर्यटन करण्यास प्रथम पसंती देतात. परंतु तलावाशेजारीच बसून मद्याचे पेग रिचवणारे काचेच्या बाटल्या तेथेच फोडतात. त्यामुळे कास तलाव भविष्यात ‘काच तलाव’ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काचा, प्लास्टिक पिशव्या, जेवणाच्या डिशेस, ग्लास व कागदाच्या बोळ्यांनी कास परिसर अस्वच्छ झाला आहे. पश्चिम घाट हे २०१२ मध्ये जागतिक नैसर्गिक वारसा स्थळ म्हणून नामांकन प्राप्त झालेले ठिकाण आहे. परंतु या अस्वच्छ तसेच घाणीच्या साम्राज्यामुळे कित्येक पर्यटक या परिसरात फिरण्यास ना पसंती दर्शविताना दिसत आहेत. (वार्ताहर)बंगल्यात चुलीचा धूर...कास तलावाशेजारीच सातारा पालिकेच्या मालकीचा बंगला आहे. परंतु हा बंगला डागडुजीच्या संदर्भात कित्येक वर्षे दुर्लक्षित राहिलेला असून, त्याच्या दयनीय अवस्थेतूनच कास बंगल्याला वाली कोण?, असा प्रश्न समोर येताना दिसत आहे. दारे, खिडक्या मोडल्याने बंगल्याची दुरवस्था झाली आहे. बंगला कुलूपबंद नसल्याने दिवसा पर्यटक व रात्रीच्या वेळी भटक्या कुत्र्यांचा वावर पाहायला मिळतो. सतत उघड्या दारांमुळे बंगल्यात चुली मांडून बिनधास्त संगीताच्या तालावर पार्ट्या झोडतानाचे चित्र दिसत आहे. चुलीच्या धुराने एक वेगळाच बेरंग बंगल्याला आलेला दिसून येत आहे. तरीही प्रशासनाचे या बाबीकडे अजून लक्ष नाही. कित्येक प्रेमीयुगुले आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत चक्क बंगल्याच्या प्रत्येक भिंतीवर आपापल्या निशाणी कोरताना दिसत आहेत. सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तरुणाई कास पठार परिसरात सज्ज झालेली दिसून येते. दरम्यान, थर्टी फस्ट साजरा करण्यासाठी बऱ्याच तरुणाईने पार्ट्या करण्याचे बेत आखलेले असून, कोणतेही विध्वंसक कृत्य घडू नये यासाठी प्रशासनाने लक्ष केंद्रित करणे आवश्यक असल्याचे पर्यावरणप्रेमींतून बोलले जात आहे. दरम्यान, पठारावर फिरायला येणाऱ्यांकडून वणवे लागू नये, यासाठी संयुक्त वनव्यवस्थापन समिती, वनविभागाचे कर्मचारी तळ ठोकून आहेत. भांडी पाण्यात धुवत असल्याने पाण्यातील जीवांना धोका पोहोचत आहे.