शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
3
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
4
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
5
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
6
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
7
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
8
अलिबाग: खांदेरीवर ‘मंकला’, ‘वाघबकरी’ खेळांचे अवशेष; शोधमोहिमेत सापडले मंकलाचे १० पट
9
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
10
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
11
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
12
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
13
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
14
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
15
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
16
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
17
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
18
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
19
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
20
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही

कास बंगला बनलाय दुर्लक्षाचा भूत बंगला!

By admin | Updated: December 29, 2016 22:24 IST

पालिकेचे दुर्लक्ष : तलावात फोडल्या जातायंत काचा

पेट्री : सातारा जिल्ह्यातील कास तलाव आणि कास पठार हे प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. सातारा पालिकेच्या दुर्लक्षामुळे या तलावाशेजारील कास बंगल्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे हा कास बंगला आहे की भूत बंगला, असा प्रश्न पर्यटकांना पडत आहे. कास तलाव आणि कास पठार पर्यटकांचे खास आकर्षण आहे. त्यामुळे शहराच्या पश्चिमेला नजर वळताच कास तलाव आणि पठार पाहण्याचा बेत पक्का केला जातो. या ठिकाणी प्रत्येक ऋतूत पर्यटकांची सतत वर्दळ सुरू असते.सातारा जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील पर्यटक आपल्या कुटुंबासमवेत खास करून या परिसरात पर्यटन करण्यास प्रथम पसंती देतात. परंतु तलावाशेजारीच बसून मद्याचे पेग रिचवणारे काचेच्या बाटल्या तेथेच फोडतात. त्यामुळे कास तलाव भविष्यात ‘काच तलाव’ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काचा, प्लास्टिक पिशव्या, जेवणाच्या डिशेस, ग्लास व कागदाच्या बोळ्यांनी कास परिसर अस्वच्छ झाला आहे. पश्चिम घाट हे २०१२ मध्ये जागतिक नैसर्गिक वारसा स्थळ म्हणून नामांकन प्राप्त झालेले ठिकाण आहे. परंतु या अस्वच्छ तसेच घाणीच्या साम्राज्यामुळे कित्येक पर्यटक या परिसरात फिरण्यास ना पसंती दर्शविताना दिसत आहेत. (वार्ताहर)बंगल्यात चुलीचा धूर...कास तलावाशेजारीच सातारा पालिकेच्या मालकीचा बंगला आहे. परंतु हा बंगला डागडुजीच्या संदर्भात कित्येक वर्षे दुर्लक्षित राहिलेला असून, त्याच्या दयनीय अवस्थेतूनच कास बंगल्याला वाली कोण?, असा प्रश्न समोर येताना दिसत आहे. दारे, खिडक्या मोडल्याने बंगल्याची दुरवस्था झाली आहे. बंगला कुलूपबंद नसल्याने दिवसा पर्यटक व रात्रीच्या वेळी भटक्या कुत्र्यांचा वावर पाहायला मिळतो. सतत उघड्या दारांमुळे बंगल्यात चुली मांडून बिनधास्त संगीताच्या तालावर पार्ट्या झोडतानाचे चित्र दिसत आहे. चुलीच्या धुराने एक वेगळाच बेरंग बंगल्याला आलेला दिसून येत आहे. तरीही प्रशासनाचे या बाबीकडे अजून लक्ष नाही. कित्येक प्रेमीयुगुले आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत चक्क बंगल्याच्या प्रत्येक भिंतीवर आपापल्या निशाणी कोरताना दिसत आहेत. सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाच्या स्वागतासाठी तरुणाई कास पठार परिसरात सज्ज झालेली दिसून येते. दरम्यान, थर्टी फस्ट साजरा करण्यासाठी बऱ्याच तरुणाईने पार्ट्या करण्याचे बेत आखलेले असून, कोणतेही विध्वंसक कृत्य घडू नये यासाठी प्रशासनाने लक्ष केंद्रित करणे आवश्यक असल्याचे पर्यावरणप्रेमींतून बोलले जात आहे. दरम्यान, पठारावर फिरायला येणाऱ्यांकडून वणवे लागू नये, यासाठी संयुक्त वनव्यवस्थापन समिती, वनविभागाचे कर्मचारी तळ ठोकून आहेत. भांडी पाण्यात धुवत असल्याने पाण्यातील जीवांना धोका पोहोचत आहे.