शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

जुन्या वायरिंगमुळं पेटतायत गाड्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 23:18 IST

सातारा : प्रवासी वाहतूक करणाºया भरधाव वाहनांमधून धूर येऊ लागतो अन् काही क्षणात केवळ सांगडा उरतो. फलटण तालुक्यात गेल्या महिन्यात स्कूलबस अन् कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी जळालेल्या एसटीमुळे काळजात धस्स होतं. या दुर्घटनांना चालकांचा निष्काळजीपणाही जबाबदार आहे. वेळच्या वेळी वाहनांची काळजी न घेतल्याने दुर्घटना घडत आहेत.बदलत्या जीवनशैलीमुळं घरटी वाहनांची संख्या वाढत ...

सातारा : प्रवासी वाहतूक करणाºया भरधाव वाहनांमधून धूर येऊ लागतो अन् काही क्षणात केवळ सांगडा उरतो. फलटण तालुक्यात गेल्या महिन्यात स्कूलबस अन् कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी जळालेल्या एसटीमुळे काळजात धस्स होतं. या दुर्घटनांना चालकांचा निष्काळजीपणाही जबाबदार आहे. वेळच्या वेळी वाहनांची काळजी न घेतल्याने दुर्घटना घडत आहेत.बदलत्या जीवनशैलीमुळं घरटी वाहनांची संख्या वाढत आहे. घरात जेवढी माणसं तेवढीच दुचाकी वाहनं अन् एखादी कार येत आहे. आधुनिक काळात ही काळाची गरजही आहे; पण प्रत्येकजण नोकरी व्यावसायात गुंतून गेला असल्याने त्याला वाहनांची देखभाल करायला वेळच मिळत नाही. त्यातून तो एक-एक दिवस पुढे ढकलतो अन् अपघातांना सामोरे जावे लागते.सातारा जिल्ह्यासाठी वाहनांनी पेट घेणे नवीन नाही. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर गाड्यांनी पेट घेण्याच्या घटना वारंवार घडतात. खंबाटकी घाट, पसरणी घाटातही यापूर्वी अनेकदा वाहनांनी पेट घेतले आहेत. कारने पेट घेतल्यानंतर रस्ता अन् वाहनाचे इंजिन यांच्यातील अंतर कमी असल्याने, तसेच रस्ता तापलेला असतो अशी कारणे दिली जातात; पण या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी रस्ता तापल्याने गाडी पेटतात, हे मानायला फारसे तयार नाही.फलटण शहरात गेल्या महिन्यात विद्यार्थी वाहतूक करणाºया बसनेही पेट घेतला होता. गाडीतून येत असलेला धूर चालकाच्या वेळीच लक्षात आल्याने त्याने तातडीने मुलांना सुरक्षित ठिकाणी नेले. त्यानंतर पूर्ण वाहन जळून खाक झाले. चालकाच्या वेळीच निदर्शना आले नसते तर मोठा अनर्थ झाला असता.अत्याधुनिक सुविधा; पण धोकाही तेवढाचवाहनांच्या तंत्रज्ञानात कमालीचा बदल होत आहे. वाहनांचा वेग वाढावा, प्रदूषण कमीत कमी व्हावे म्हणून नवीन वाहनांमध्ये आधुनिक सुविधा पुरवल्या जातात. टर्बो चार्जर आले आहेत. सरासरी ८० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त उष्ण हवा घेतली जाते. त्याचवेळी गळती लागल्याने पेट घेण्याच्या घटना घडतात.नियमित देखभाल हाच पर्यायप्रवासी वाहतूक करणारे वाहन असो व मालवाहू. प्रत्येकाची नियमित काळजी, देखभाल करणे हाच एकमेव पर्याय आहे. यामध्ये डिझेल, आॅईलची गळती रोखणे, वायरिंगला कोटिंग करणे, शक्य असल्यास त्यावर पुन्हा पॅकिंग केल्यास वायरमुळे अपघात घडण्याचे प्रमाण कमी होईल.