शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

जुन्या वायरिंगमुळं पेटतायत गाड्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 23:18 IST

सातारा : प्रवासी वाहतूक करणाºया भरधाव वाहनांमधून धूर येऊ लागतो अन् काही क्षणात केवळ सांगडा उरतो. फलटण तालुक्यात गेल्या महिन्यात स्कूलबस अन् कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी जळालेल्या एसटीमुळे काळजात धस्स होतं. या दुर्घटनांना चालकांचा निष्काळजीपणाही जबाबदार आहे. वेळच्या वेळी वाहनांची काळजी न घेतल्याने दुर्घटना घडत आहेत.बदलत्या जीवनशैलीमुळं घरटी वाहनांची संख्या वाढत ...

सातारा : प्रवासी वाहतूक करणाºया भरधाव वाहनांमधून धूर येऊ लागतो अन् काही क्षणात केवळ सांगडा उरतो. फलटण तालुक्यात गेल्या महिन्यात स्कूलबस अन् कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी जळालेल्या एसटीमुळे काळजात धस्स होतं. या दुर्घटनांना चालकांचा निष्काळजीपणाही जबाबदार आहे. वेळच्या वेळी वाहनांची काळजी न घेतल्याने दुर्घटना घडत आहेत.बदलत्या जीवनशैलीमुळं घरटी वाहनांची संख्या वाढत आहे. घरात जेवढी माणसं तेवढीच दुचाकी वाहनं अन् एखादी कार येत आहे. आधुनिक काळात ही काळाची गरजही आहे; पण प्रत्येकजण नोकरी व्यावसायात गुंतून गेला असल्याने त्याला वाहनांची देखभाल करायला वेळच मिळत नाही. त्यातून तो एक-एक दिवस पुढे ढकलतो अन् अपघातांना सामोरे जावे लागते.सातारा जिल्ह्यासाठी वाहनांनी पेट घेणे नवीन नाही. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर गाड्यांनी पेट घेण्याच्या घटना वारंवार घडतात. खंबाटकी घाट, पसरणी घाटातही यापूर्वी अनेकदा वाहनांनी पेट घेतले आहेत. कारने पेट घेतल्यानंतर रस्ता अन् वाहनाचे इंजिन यांच्यातील अंतर कमी असल्याने, तसेच रस्ता तापलेला असतो अशी कारणे दिली जातात; पण या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी रस्ता तापल्याने गाडी पेटतात, हे मानायला फारसे तयार नाही.फलटण शहरात गेल्या महिन्यात विद्यार्थी वाहतूक करणाºया बसनेही पेट घेतला होता. गाडीतून येत असलेला धूर चालकाच्या वेळीच लक्षात आल्याने त्याने तातडीने मुलांना सुरक्षित ठिकाणी नेले. त्यानंतर पूर्ण वाहन जळून खाक झाले. चालकाच्या वेळीच निदर्शना आले नसते तर मोठा अनर्थ झाला असता.अत्याधुनिक सुविधा; पण धोकाही तेवढाचवाहनांच्या तंत्रज्ञानात कमालीचा बदल होत आहे. वाहनांचा वेग वाढावा, प्रदूषण कमीत कमी व्हावे म्हणून नवीन वाहनांमध्ये आधुनिक सुविधा पुरवल्या जातात. टर्बो चार्जर आले आहेत. सरासरी ८० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त उष्ण हवा घेतली जाते. त्याचवेळी गळती लागल्याने पेट घेण्याच्या घटना घडतात.नियमित देखभाल हाच पर्यायप्रवासी वाहतूक करणारे वाहन असो व मालवाहू. प्रत्येकाची नियमित काळजी, देखभाल करणे हाच एकमेव पर्याय आहे. यामध्ये डिझेल, आॅईलची गळती रोखणे, वायरिंगला कोटिंग करणे, शक्य असल्यास त्यावर पुन्हा पॅकिंग केल्यास वायरमुळे अपघात घडण्याचे प्रमाण कमी होईल.