शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

जुन्या वायरिंगमुळं पेटतायत गाड्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 23:18 IST

सातारा : प्रवासी वाहतूक करणाºया भरधाव वाहनांमधून धूर येऊ लागतो अन् काही क्षणात केवळ सांगडा उरतो. फलटण तालुक्यात गेल्या महिन्यात स्कूलबस अन् कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी जळालेल्या एसटीमुळे काळजात धस्स होतं. या दुर्घटनांना चालकांचा निष्काळजीपणाही जबाबदार आहे. वेळच्या वेळी वाहनांची काळजी न घेतल्याने दुर्घटना घडत आहेत.बदलत्या जीवनशैलीमुळं घरटी वाहनांची संख्या वाढत ...

सातारा : प्रवासी वाहतूक करणाºया भरधाव वाहनांमधून धूर येऊ लागतो अन् काही क्षणात केवळ सांगडा उरतो. फलटण तालुक्यात गेल्या महिन्यात स्कूलबस अन् कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी जळालेल्या एसटीमुळे काळजात धस्स होतं. या दुर्घटनांना चालकांचा निष्काळजीपणाही जबाबदार आहे. वेळच्या वेळी वाहनांची काळजी न घेतल्याने दुर्घटना घडत आहेत.बदलत्या जीवनशैलीमुळं घरटी वाहनांची संख्या वाढत आहे. घरात जेवढी माणसं तेवढीच दुचाकी वाहनं अन् एखादी कार येत आहे. आधुनिक काळात ही काळाची गरजही आहे; पण प्रत्येकजण नोकरी व्यावसायात गुंतून गेला असल्याने त्याला वाहनांची देखभाल करायला वेळच मिळत नाही. त्यातून तो एक-एक दिवस पुढे ढकलतो अन् अपघातांना सामोरे जावे लागते.सातारा जिल्ह्यासाठी वाहनांनी पेट घेणे नवीन नाही. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर गाड्यांनी पेट घेण्याच्या घटना वारंवार घडतात. खंबाटकी घाट, पसरणी घाटातही यापूर्वी अनेकदा वाहनांनी पेट घेतले आहेत. कारने पेट घेतल्यानंतर रस्ता अन् वाहनाचे इंजिन यांच्यातील अंतर कमी असल्याने, तसेच रस्ता तापलेला असतो अशी कारणे दिली जातात; पण या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी रस्ता तापल्याने गाडी पेटतात, हे मानायला फारसे तयार नाही.फलटण शहरात गेल्या महिन्यात विद्यार्थी वाहतूक करणाºया बसनेही पेट घेतला होता. गाडीतून येत असलेला धूर चालकाच्या वेळीच लक्षात आल्याने त्याने तातडीने मुलांना सुरक्षित ठिकाणी नेले. त्यानंतर पूर्ण वाहन जळून खाक झाले. चालकाच्या वेळीच निदर्शना आले नसते तर मोठा अनर्थ झाला असता.अत्याधुनिक सुविधा; पण धोकाही तेवढाचवाहनांच्या तंत्रज्ञानात कमालीचा बदल होत आहे. वाहनांचा वेग वाढावा, प्रदूषण कमीत कमी व्हावे म्हणून नवीन वाहनांमध्ये आधुनिक सुविधा पुरवल्या जातात. टर्बो चार्जर आले आहेत. सरासरी ८० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त उष्ण हवा घेतली जाते. त्याचवेळी गळती लागल्याने पेट घेण्याच्या घटना घडतात.नियमित देखभाल हाच पर्यायप्रवासी वाहतूक करणारे वाहन असो व मालवाहू. प्रत्येकाची नियमित काळजी, देखभाल करणे हाच एकमेव पर्याय आहे. यामध्ये डिझेल, आॅईलची गळती रोखणे, वायरिंगला कोटिंग करणे, शक्य असल्यास त्यावर पुन्हा पॅकिंग केल्यास वायरमुळे अपघात घडण्याचे प्रमाण कमी होईल.