शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

गाड्या सांभाळा; रात्रीस खेळ चाले

By admin | Updated: January 2, 2017 23:13 IST

चिमणपुरातील दुचाकी जळीत घटना : कुत्र्यांना गुंगीचे औषध देऊन अज्ञातांनी साधला डाव

सातारा : गाड्या जाळण्याचे प्रकार पूर्वी पुणे, मुंबई, नाशिक सारख्या शहरांमध्ये घडत होते. हे प्रकार आता सातारा शहरातही घडू लागल्याने परिसरातील लोकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. ‘गाड्या सांभाळा, रात्रीस खेळ चाले,’ असे म्हणण्याची वेळ सातारकरांवर आली आहे.सरत्या वर्षाला निरोप देऊन पुढील वर्ष आनंदाचे आणि भरभराटीचे जावो, अशा शुभेच्छा देत गोसावी कुटुंब रविवारी मध्यरात्री साखरझोपेत असतानाच फटाके वाजल्याचा मोठा आवाज आला. आवाज ऐकून घरातील ज्येष्ठ मंडळी बाहेर येऊन पाहताच दुचाकींना आग लागल्याचे निदर्शनास आले. त्यांनी आरडाओरड करून इतरांना जागे करून होणारा अनर्थ टाळला. सातारा शहरातील चिमणपुरा पेठेत अज्ञातांनी घरासमोर लावलेल्या चार दुचाकी जाळल्या. या घटनेने पेठेत भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने गोसावी कुटुंबीयांनी अख्खी रात्र जागून काढली. येथील चिमणपुरा पेठेत गोसावी यांचे तीन कुटुंब आणि भाडेकरूंचे तीन अशी सहा कुटुंबे राहतात. महेंद्र गोसावी यांनी आपली दुचाकी व इतर दोन दुचाकी घराबाहेर लावल्या होत्या तर एक दुचाकी घराच्या जिन्याखाली लावली होती. अज्ञातांनी अगोदर महेंद्र यांच्या दोन्ही दुचाकींना आग लावल्याने त्यांच्याच गाडीच्या शेजारी असणाऱ्या दोन गाड्यांना झळ बसल्याने त्याही जळाल्या. जाळलेल्या चार दुचाकीपैकी केवळ एका गाडीचा विमा असून, तीन गाड्यांचा विमा उतरविले नसल्याचे महेंद्र गोसावी यांनी सांगितले.दरम्यान, रविवारी रात्री एकच्या सुमारास घराजवळ कुत्रे जास्त भुंकत असल्याने बाहेर येऊन पाहणी केली असता, कोणतीही हालचाल निदर्शनास न आल्याने पुन्हा झोपी गेले. हीच संधी साधून अज्ञातांनी आपला डाव साधला. यापूर्वी त्यांनी कुत्रे जास्तच भुंकत असल्याने कुत्र्यांचाही बंदोबस्त केला. रात्री एकच्या सुमारास दोन्ही कुत्र्यांना गुंगीचे औषध देऊन त्यांना बेशुद्ध केले. नंतर कुत्रे झोपी गेल्याने दीडच्या सुमारास चारही दुचाकी जाळल्या गेल्या. (प्रतिनिधी)घटनेला राजकीय किनार?चिमणपुरामधील घडलेल्या घटनेला अनेक तर्क-वितर्क लढविले जात आहेत. ही घटना दोन राजकीय कलहातून घडली असल्याची चर्चा सध्या परिसरात दबक्या आवाजात सुरू आहे. काही महिन्यांपूर्वीही अशीच घटना घडली होती. त्या घटनेशी काहीजण संबंध जोडत आहेत. गोसावी कुटुंबीयांची कोणाची, कोणाशी शत्रुत्वही नाही, तर अशा घटना वारंवार घडत असल्याने चिमणपुरा पेठेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काहीच दिवसांपूर्वी दोन नेत्यांमधील वाद विकोपाला गेला होता. याच वादातून ही घटना घडली तर नसेल ना, अशी चर्चा सध्या पेठेत पाहायला मिळत आहे.