शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
2
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
3
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
4
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
5
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
6
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
7
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
8
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
9
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
10
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
11
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
12
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
13
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
14
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
15
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
16
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
18
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
19
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
20
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर

गाड्या सांभाळा; रात्रीस खेळ चाले

By admin | Updated: January 2, 2017 23:13 IST

चिमणपुरातील दुचाकी जळीत घटना : कुत्र्यांना गुंगीचे औषध देऊन अज्ञातांनी साधला डाव

सातारा : गाड्या जाळण्याचे प्रकार पूर्वी पुणे, मुंबई, नाशिक सारख्या शहरांमध्ये घडत होते. हे प्रकार आता सातारा शहरातही घडू लागल्याने परिसरातील लोकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. ‘गाड्या सांभाळा, रात्रीस खेळ चाले,’ असे म्हणण्याची वेळ सातारकरांवर आली आहे.सरत्या वर्षाला निरोप देऊन पुढील वर्ष आनंदाचे आणि भरभराटीचे जावो, अशा शुभेच्छा देत गोसावी कुटुंब रविवारी मध्यरात्री साखरझोपेत असतानाच फटाके वाजल्याचा मोठा आवाज आला. आवाज ऐकून घरातील ज्येष्ठ मंडळी बाहेर येऊन पाहताच दुचाकींना आग लागल्याचे निदर्शनास आले. त्यांनी आरडाओरड करून इतरांना जागे करून होणारा अनर्थ टाळला. सातारा शहरातील चिमणपुरा पेठेत अज्ञातांनी घरासमोर लावलेल्या चार दुचाकी जाळल्या. या घटनेने पेठेत भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने गोसावी कुटुंबीयांनी अख्खी रात्र जागून काढली. येथील चिमणपुरा पेठेत गोसावी यांचे तीन कुटुंब आणि भाडेकरूंचे तीन अशी सहा कुटुंबे राहतात. महेंद्र गोसावी यांनी आपली दुचाकी व इतर दोन दुचाकी घराबाहेर लावल्या होत्या तर एक दुचाकी घराच्या जिन्याखाली लावली होती. अज्ञातांनी अगोदर महेंद्र यांच्या दोन्ही दुचाकींना आग लावल्याने त्यांच्याच गाडीच्या शेजारी असणाऱ्या दोन गाड्यांना झळ बसल्याने त्याही जळाल्या. जाळलेल्या चार दुचाकीपैकी केवळ एका गाडीचा विमा असून, तीन गाड्यांचा विमा उतरविले नसल्याचे महेंद्र गोसावी यांनी सांगितले.दरम्यान, रविवारी रात्री एकच्या सुमारास घराजवळ कुत्रे जास्त भुंकत असल्याने बाहेर येऊन पाहणी केली असता, कोणतीही हालचाल निदर्शनास न आल्याने पुन्हा झोपी गेले. हीच संधी साधून अज्ञातांनी आपला डाव साधला. यापूर्वी त्यांनी कुत्रे जास्तच भुंकत असल्याने कुत्र्यांचाही बंदोबस्त केला. रात्री एकच्या सुमारास दोन्ही कुत्र्यांना गुंगीचे औषध देऊन त्यांना बेशुद्ध केले. नंतर कुत्रे झोपी गेल्याने दीडच्या सुमारास चारही दुचाकी जाळल्या गेल्या. (प्रतिनिधी)घटनेला राजकीय किनार?चिमणपुरामधील घडलेल्या घटनेला अनेक तर्क-वितर्क लढविले जात आहेत. ही घटना दोन राजकीय कलहातून घडली असल्याची चर्चा सध्या परिसरात दबक्या आवाजात सुरू आहे. काही महिन्यांपूर्वीही अशीच घटना घडली होती. त्या घटनेशी काहीजण संबंध जोडत आहेत. गोसावी कुटुंबीयांची कोणाची, कोणाशी शत्रुत्वही नाही, तर अशा घटना वारंवार घडत असल्याने चिमणपुरा पेठेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काहीच दिवसांपूर्वी दोन नेत्यांमधील वाद विकोपाला गेला होता. याच वादातून ही घटना घडली तर नसेल ना, अशी चर्चा सध्या पेठेत पाहायला मिळत आहे.