शहरं
Join us  
Trending Stories
1
‘तातडीने इराण सोडा, मिळेल त्या वाहनाने बाहेर पडा’, भारतीय दूतावासाने आपल्या नागरिकांना सूचना
2
अजित पवारांनी टाकला 'सिंचन बॉम्ब'; पार्टी फंडासाठी प्रकल्पाचा खर्च ११० कोटींनी कुणी वाढवला?
3
KL Rahul Century : स्टायलिश बॅटर केएल राहुलची क्लास सेंच्युरी! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
4
US-इराण लढाईत पाकिस्तान अडकला, ३ संकटांनी घेरलं; असीम मुनीर यांनी बोलावली तातडीची बैठक
5
धुळ्यात हजारो मतदान कार्डांचा साठा सापडला; एमआयएमचा राष्ट्रवादीवर गंभीर आरोप
6
...म्हणून राज ठाकरेंनी माझ्यावर टीका करणं टाळलं असावं; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं का बोलले?
7
बाजारात घसरण होऊनही गुंतवणूकदारांनी ३२ हजार कोटी कमावले; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
अमेरिका-इराण युद्धासाठी इस्रायल सतर्क, आयर्न डोम सक्रिय; आणखी एक युद्ध सुरू होणार?
9
अयोध्येतील श्रीराम मंदिर अन् कुतुब मिनारपेक्षा उंच! बिहारमध्ये उभारले जातेय विराट रामायण मंदिर
10
Makar Sankranti 2026: मकर संक्रांत ते रथसप्तमी; हळदी-कुंकवासाठी हाच काळ का निवडला जातो?
11
IND vs NZ : कोण आहे Kristian Clarke? ज्यानं 'रो-को'ला रोखून दाखवत राजकोटचं मैदान गाजवलं
12
शीख मुलीला पाकिस्तान्यांनी उचलून नेले, ६ जणांनी अनेक दिवसांपर्यंत सामूहिक बलात्कार केला
13
मुंबईत पकडलेल्या त्या दोन बांगलादेशींना मायदेशी पाठवलं, आता पुन्हा कफ परेडमध्ये सापडल्या...
14
हृदयद्रावक! "बेटा, मी येतोय...", वडिलांचा लेकीला शेवटचा कॉल; पतंगाच्या मांजामुळे गमावला जीव
15
गुंतवणूकदारांची दिवाळी! RBI च्या निर्णयामुळे गुंतवणूकदार मालामाल; ५ वर्षांत पैसा झाला ३ पट!
16
ही मराठी माणसांच्या नाही तर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वाची लढाई; एकनाथ शिंदेंचा घणाघात
17
मृत्यूची झडप! महाकाय क्रेन भरधाव 'रेल्वे गाडी'वर वर कोसळलं; २८ प्रवाशांचा मृत्यू, कसा घडला अपघात?
18
Syeda Falak: "एक दिवस ही हिजाब घातलेली मुस्लीम महिला…" फडणवीसांना चॅलेंज देणारी सईदा फलक आहे तरी कोण?
19
गुंतवणूकदारांची संक्रांत! निफ्टी ५०० मधील ७०% शेअर्स तोट्यात; ५ वर्षांतील सर्वात खराब सुरुवात
20
एकाच ठिकाणी व्हिडिओ एडिटिंग, प्रॉडक्शन अन् डिझाइनिंग; Apple ने लॉन्च केला Creator Studio
Daily Top 2Weekly Top 5

गाड्या सांभाळा; रात्रीस खेळ चाले

By admin | Updated: January 2, 2017 23:13 IST

चिमणपुरातील दुचाकी जळीत घटना : कुत्र्यांना गुंगीचे औषध देऊन अज्ञातांनी साधला डाव

सातारा : गाड्या जाळण्याचे प्रकार पूर्वी पुणे, मुंबई, नाशिक सारख्या शहरांमध्ये घडत होते. हे प्रकार आता सातारा शहरातही घडू लागल्याने परिसरातील लोकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. ‘गाड्या सांभाळा, रात्रीस खेळ चाले,’ असे म्हणण्याची वेळ सातारकरांवर आली आहे.सरत्या वर्षाला निरोप देऊन पुढील वर्ष आनंदाचे आणि भरभराटीचे जावो, अशा शुभेच्छा देत गोसावी कुटुंब रविवारी मध्यरात्री साखरझोपेत असतानाच फटाके वाजल्याचा मोठा आवाज आला. आवाज ऐकून घरातील ज्येष्ठ मंडळी बाहेर येऊन पाहताच दुचाकींना आग लागल्याचे निदर्शनास आले. त्यांनी आरडाओरड करून इतरांना जागे करून होणारा अनर्थ टाळला. सातारा शहरातील चिमणपुरा पेठेत अज्ञातांनी घरासमोर लावलेल्या चार दुचाकी जाळल्या. या घटनेने पेठेत भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने गोसावी कुटुंबीयांनी अख्खी रात्र जागून काढली. येथील चिमणपुरा पेठेत गोसावी यांचे तीन कुटुंब आणि भाडेकरूंचे तीन अशी सहा कुटुंबे राहतात. महेंद्र गोसावी यांनी आपली दुचाकी व इतर दोन दुचाकी घराबाहेर लावल्या होत्या तर एक दुचाकी घराच्या जिन्याखाली लावली होती. अज्ञातांनी अगोदर महेंद्र यांच्या दोन्ही दुचाकींना आग लावल्याने त्यांच्याच गाडीच्या शेजारी असणाऱ्या दोन गाड्यांना झळ बसल्याने त्याही जळाल्या. जाळलेल्या चार दुचाकीपैकी केवळ एका गाडीचा विमा असून, तीन गाड्यांचा विमा उतरविले नसल्याचे महेंद्र गोसावी यांनी सांगितले.दरम्यान, रविवारी रात्री एकच्या सुमारास घराजवळ कुत्रे जास्त भुंकत असल्याने बाहेर येऊन पाहणी केली असता, कोणतीही हालचाल निदर्शनास न आल्याने पुन्हा झोपी गेले. हीच संधी साधून अज्ञातांनी आपला डाव साधला. यापूर्वी त्यांनी कुत्रे जास्तच भुंकत असल्याने कुत्र्यांचाही बंदोबस्त केला. रात्री एकच्या सुमारास दोन्ही कुत्र्यांना गुंगीचे औषध देऊन त्यांना बेशुद्ध केले. नंतर कुत्रे झोपी गेल्याने दीडच्या सुमारास चारही दुचाकी जाळल्या गेल्या. (प्रतिनिधी)घटनेला राजकीय किनार?चिमणपुरामधील घडलेल्या घटनेला अनेक तर्क-वितर्क लढविले जात आहेत. ही घटना दोन राजकीय कलहातून घडली असल्याची चर्चा सध्या परिसरात दबक्या आवाजात सुरू आहे. काही महिन्यांपूर्वीही अशीच घटना घडली होती. त्या घटनेशी काहीजण संबंध जोडत आहेत. गोसावी कुटुंबीयांची कोणाची, कोणाशी शत्रुत्वही नाही, तर अशा घटना वारंवार घडत असल्याने चिमणपुरा पेठेत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काहीच दिवसांपूर्वी दोन नेत्यांमधील वाद विकोपाला गेला होता. याच वादातून ही घटना घडली तर नसेल ना, अशी चर्चा सध्या पेठेत पाहायला मिळत आहे.