शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
3
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
4
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
5
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
6
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
7
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
8
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
9
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
10
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
11
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
12
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
13
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
14
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
15
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
16
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
17
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
18
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
19
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
20
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित

शेतीसाठी कालवे; पण पिण्यासाठी पाईपलाईन!

By admin | Updated: July 22, 2016 00:20 IST

धरणांतील पाण्याचा व्हावा उपयोग : कमी खर्चात कायमस्वरूपी उपाययोजनांसाठी निवृत्त अभियंत्याची संकल्पना

सातारा : ‘माण, खटाव दुष्काळी भागांतील शेतीसाठी पाणी देण्यासाठी कालवे होतील तेव्हा होतील; पण तोपर्यंत तहानलेल्या गावांना पाईपलाईनने पाणीपुरवठा करता येईल. याचा खर्च कमी असून, दीर्घकालीन योजना असू शकते,’ अशी संकल्पना पाटबंधारे विभागाचे निवृत्त अधीक्षक अभियंता अ. रा. कुलकर्णी यांनी ‘लोकमत’शी बोलतांना मांडली.संपूर्ण राज्य यंदा दुष्काळाने होरपळून निघाले होते. मराठवाड्यातील लातूरला रेल्वेने पाणी द्यावे लागले. महाराष्ट्राला दुष्काळ नवीन नाही. दर चार-पाच वर्षांनंतर दुष्काळ पडतो. असा अनुभव आहे. प्रदूषण, वृक्षतोड नसताना पर्यावरण चांगले असतानाही दुष्काळ पडला होता. त्यामुळे यापुढेही पडत राहणार हे नक्की; पण यासाठी पाण्याचे योग्य नियोजन होणे गरजेचे आहे. यासंदर्भात कुलकर्णी ‘लोकमत’शी बोलत होते.कुलकर्णी म्हणाले, ‘देशात धान्याचा मुबलक साठा आहे. दळणवळणाची साधने भरपूर आहेत. तेव्हा दुष्काळाच्या वेळी धान्य पुरवणे अवघड नाही. रोजगार हमी योजनेतून रोजगारही पुरवता येतो. त्यामुळे मुख्य प्रश्न घरगुती वापराच्या व जनावरांच्या पाण्याचा आहे. तो सुटला तर दुष्काळाची तीव्रता कायमस्वरूपी कमी करता येईल. (प्रतिनिधी)मोठ्या योजना भंपक कल्पनासिंचनासाठी मोठमोठ्या उपसा सिंचन योजना राबवून दुष्काळी भागाला पाणी दिल्यास भाग सुजलाम् सुफलाम् होईल, अशी सध्याची विचारसरणी दिसते. म्हैसाळ, ताकारी, टेंभू, जिहेकठापूर, तारळी, उरमोडी या योजना प्रचंड खर्चाच्या आहेत. त्यांना मोठ्या प्रमाणावर वीज लागणार आहे. त्यामुळे त्या कधी पूर्ण होतील हे सांगता येत नाही. पूर्ण झाल्याच तरी विजेच्या प्रचंड खर्चामुळे कितपत यशस्वी होतील याची खात्री नाही. त्यामुळे अशा योजनांवर अवलंबून राहून दुष्काळाची तीव्रता कमी होईल, असे वाटत नाही. एका टेंभू योजनेचा खर्च पाच हजार कोटी आहे. सिंचन आणि घरगुती पाण्यात गल्लतसिंचन व घरगुती वापराचे पाणी यांची गल्लत न करता दोन्ही प्रश्न स्वतंत्रपणे हाताळणे गरजेचे आहे. कृष्णा, भीमा, नीराप्रमाणे ज्या नद्यांवर धरणे आहेत व उन्हाळ्यातही पाणी असते, त्यातून दुष्काळी गावांना पिण्याचे व जनावरांसाठी पाणी दिल्यास दुष्काळ कायमचा मिटेल. माण-खटावची तहान दोन टीएमसीचीयासंदर्भात माण व खटाव तालुक्यांचा अभ्यास करण्यात आला होता. तेव्हा असे लक्षात आले की या दोन तालुक्यांना घरगुती वापरासाठी व जनावरांसाठी फक्त अर्धा टीएमसी पाणी लागते. हे पाणी उपलब्ध करून देण्यास १०० ते १२० कोटी रुपये खर्च येईल. एकदा हा खर्च केल्यास दुष्काळ कायमचा हद्दपार होऊ शकतो. उरमोडी, तारळी, जिहे-कठापूर या सिंचनासाठीच्या योजनांतून या तालुक्यातून ३९५ द.ल.घ.मी पाणी उचलण्यात येणार आहे. म्हणजे पिण्याच्या व जनावरांच्या पाण्याची गरज फक्त ३.३ टक्केच आहे. त्यामुळे येणारा खर्चही कमी आहे. कायम पाणी देणाऱ्या स्त्रोताचा वापरदुष्काळी भागात ग्रामीण पाणीपुरवठा योजना राबविण्यात आल्या आहेत. त्यासाठी प्रत्येक गावासाठी किंवा चार ते पाच गावांसाठी समूहासाठी टाक्या बांधण्यात आल्या आहेत. प्रश्न पाण्याच्या स्त्रोतांचा आहे. या टाक्यांमध्ये पाणी टाकण्याचे स्त्रोत दुष्काळी भागातील तलाव, विहिरी, नदी-नाले आहेत. हेच स्त्रोत दुष्काळात आटतात. त्यामुळे काही उपयोग होत नाही. कायमस्वरूपी पाणी असणाऱ्या व ज्यांच्यावर धरणे आहेत अशा कृष्णा, भीमा, नीरा या सारख्या नद्यांतून पाईपद्वारे पाणी नेऊन या टाक्यांमध्ये टाकले तर दुष्काळतही घरगुती व जनावरांसाठी पाणी मिळू शकते. असे लागणारे पाणी सिंचनाच्या तुलनेत अल्प असल्याने ते उचलण्याचा तसेच जलवाहिन्यांचा खर्चही अल्प असणार आहेत.