शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

निसर्गाची हानी न करता पर्यटन विकास; अनाधिकृत बांधकामांना मज्जाव - मुख्यमंत्री शिंदे 

By नितीन काळेल | Updated: August 10, 2023 19:02 IST

सातारा : मुंबई-गोवा मार्गावरील एक लेन गणेशोत्सवापूर्वी तयार करणार असून सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पर्यटनास मोठा वाव आहे. त्यामुळे ...

सातारा : मुंबई-गोवा मार्गावरील एक लेन गणेशोत्सवापूर्वी तयार करणार असून सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पर्यटनास मोठा वाव आहे. त्यामुळे निसर्गाची हानी न करता पर्यटन विकास करण्यात येईल. त्याचबरोबर यापुढे कोणत्याही परिस्थितीत अनधिकृत बांधकाम होणार नाही याबाबत सूचना करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच करण्याबाबतही पत्रकारांना आश्वस्त केले.सातारा येथील शासकीय विश्रामगृहात मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तसेच पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरेही दिली. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार मकरंद पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलिस अधीक्षक समीर शेख, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी आदी उपस्थित होते. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रथम हेलिकाॅप्टरने सैनिक स्कूलच्या मैदानावर आगमन झाले. तेथील स्वागतानंतर ते विश्रामगृहात दाखल झाले.मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘मुंबई-गोवा महामार्गाबाबत मी स्वत: बैठक घेतली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वत: लक्ष घातले आहे. तसेच मंत्री रवींद्र चव्हाण हे कामावर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे गणेशोत्सवापूर्वी एक लेन पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच मुंबई-सिंधुदुर्ग रस्ता हा ग्रीन फिल्ड करतोय. कोकणच्या विकासासाठी हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. त्याचबरोबर सातारा येथील तरुण नोकरीसाठी मुंबईला जातोय. येथे विकासाची मोठी क्षमता आहे. मोठ्या प्रमाणात क्लस्टर शेतीत लोकांना एकत्र आणत आहोत. बांबू लागवड मोठ्या प्रमाणात केली जाणार आहे. तसेच वनाैषधीवरही मोठ्या प्रमाणात काम करणार आहे.महाबळेश्वर हे जागतिक पर्यटनस्थळ आहे. तेथे रस्ते, पार्किंग करणार आहे. तसेच तापोळा हे मिनी काश्मीर आहे. बामणोली, वसोटा येथील पर्यटनासाठी जे काही करता येईल ते करणार आहे. कारण येथे पर्यटनाला मोठी संधी आहे. निसर्गाची कोणतीही हानी न करता पर्यटन विकास केला जाईल. त्याचबराेबर हे करताना कोणत्याही परिस्थितीत अनधिकृत बांधकाम होणार नाही, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केली आहे, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. तसेच कोकणला साताऱ्याशी जोडण्यासाठी आणखी एक पूल मंजूर केल्याचेही त्यांनी सांगितले.पारोळ्याच्या पत्रकारावरील हल्ल्याचा प्रश्न उपस्थित केल्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकार हा लोकशाहीचा एक स्तंभ आहे. त्यांच्यावर हल्ला होता कामा नये. जो कोणी असेल त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट संकेत दिले. तसेच मंत्रिमंडळ विस्तारावर लवकरच एवढेच बोलून मुख्यमंत्री पुढे गेले.

मुख्यमंत्री प्रथमच सातारा शहरात...मुख्यमंत्री होऊन एकनाथ शिंदे यांना एक वर्ष होऊन गेले आहे. आतापर्यंत शिंदे हे अनेकवेळा जिल्ह्यात आले. पण, सातारा शहरात आले नव्हते. गुरुवारी प्रथमच ते सातारा शहरात आले. पण, शासकीय विश्रामगृहावर थोडावेळ थांबल्यानंतर ते कासमार्गे दरे या गावी निघून गेले. मुख्यमंत्री सातारा शहरात येणार म्हणून दुपारपासूनच पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारEknath Shindeएकनाथ शिंदे