शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
4
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
5
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
6
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
7
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
8
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
9
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
10
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
11
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
12
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
13
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
14
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
15
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
16
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
17
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
18
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
19
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
20
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!

महामार्गावरील नाले तुंबल्याने उपमार्ग जलमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:34 IST

मलकापूर ते आटकेटप्पा परिसरात महामार्ग रूंदीकरणावेळी सहा ठिकाणी ओढ्यांमधील पाण्याच्या प्रवाहासाठी मोऱ्यांची निर्मिती केली आहे. महामार्ग व उपमार्गालगत दोन्ही ...

मलकापूर ते आटकेटप्पा परिसरात महामार्ग रूंदीकरणावेळी सहा ठिकाणी ओढ्यांमधील पाण्याच्या प्रवाहासाठी मोऱ्यांची निर्मिती केली आहे. महामार्ग व उपमार्गालगत दोन्ही बाजूला सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी नाले खोदले आहेत. मात्र, या नाल्यात टाकलेला कचरा व मुख्य ओढ्यांवर झालेले अतिक्रमण यामुळे ठिकठिकाणी नाले तुंबले आहेत. मलकापूर येथेही भारत मोटार्ससमोर गटरचे घाण पाणी रस्त्यावर पसरल्याने तलाव्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या भागातून प्रवास करताना वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे, तर नाल्यातील घाण रस्त्यावर पसरल्याने परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. दुर्गंधीमुळे या भागातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. त्याचबरोबर या परिसरातील बहुतांशी ओढ्यांवर अतिक्रमण झाले आहे. मोऱ्यांमध्ये कचरा टाकून तुंबल्याने ओढ्यातील पाण्याचा प्रवाह अनेक ठिकाणी रस्त्यावरूनच प्रवाहित झाला आहे.

पावसाळा संपून तीन महिन्यांचा कालावधी उलटला असतानाही नांदलापूर येथे जखीणवाडी ओढा उपमार्गावरूनच वाहत आहे. या ओढ्यात मोठ्या प्रमाणात कचऱ्याची पोती टाकली आहेत. कचऱ्याने मोऱ्या तुंबल्या आहेत. अशा तुंबलेल्या मोऱ्या रिकाम्या करणे गरजेचे आहे. पाण्याचा निचरा न झाल्याने रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या व्यापाऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. नैसर्गिक ओढे व नाल्यावर अतिक्रमण झाले आहे. अनेक भुयारी नाल्यात कचरा अडकल्याने नाले ठिकठिकाणी तुंबले आहेत. त्यामुळे उपमार्ग जलमय झाले आहेत.

- चौकट

स्थानिकांचा विरुद्ध दिशेने जीवघेणा प्रवास

उपमार्गावर पाणी साचल्यामुळे स्थानिकांना नाइलाजास्तव आपला जीव मुठीत घेऊन विरुद्ध दिशेने जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. अनेक ठिकाणी बरेच दिवस उपमार्गावर साचलेल्या पाण्यातूनच ग्रामस्थांना ये-जा करावी लागत असून, संबंधित विभाग गांधारीच्या भूमिकेत दिसत आहे. तसेच ठिकठिकाणी उपमार्गावर धोकादायक खड्डे पडल्याने अपघात घडत आहेत. उपमार्गावरून प्रवास करणारे वाहनधारक व प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी संबंधित विभागाने योग्य उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.

फोटो : १७केआरडी०२

कॅप्शन : नांदलापूर, ता. कऱ्हाड येथे नाले तुंबल्यामुळे दुर्गंधीयुक्त पाणी उपमार्गावर साचत असून, या मार्गावरून स्थानिकांना धोकादायकरीत्या प्रवास करावा लागत आहे. (छाया : माणीक डोंगरे)