शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
3
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
4
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
5
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
6
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
7
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
8
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
9
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
10
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
11
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
12
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
13
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
14
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
15
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
16
आर्थिक कारणांमुळे 'वेलकम टू द जंगल' सिनेमाचं शूट रखडलं? समोर आलं खरं कारण
17
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
18
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
19
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज

प्रतवारी न करता सरसकट आले खरेदी!

By नितीन काळेल | Updated: June 28, 2024 20:02 IST

जिल्हा उपनिबंधकांची सूचना : जिल्ह्यातील बाजार समित्यांसाठी फतवा 

नितीन काळेल, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा : जिल्ह्यातील शेतकरी आले खरेदीच्या प्रश्नावर आक्रमक झाले असून सातारा बाजार समितीतही शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या बैठकीत प्रतवारी न करता जुने आणि नवे आले सरसकट खरेदीचा ठराव झाला होता. यानंतर आता याची जिल्हा उपनिबंधकांनी दखल घेतली असून याबाबत सर्व बाजार समित्यांना सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे.

जिल्ह्यात नवीन आणि जुने आले याबाबत दर निश्चिती करताना व्यापाऱ्यांकडून मोठा फरक ठेवला जात होता. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत होते. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिध्द केले होते. याची दखल घेऊन सातारा बाजार समितीने मागील रविवारी व्यापारी आणि शेतकऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला बाजार समितीचे सभापती विक्रम पवार, उपसभापती मधुकर पवार यांच्यासह संचालक, व्यापारी आणि आले उत्पादक शेतकरी उपस्थित होते. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी सांगितल्या.

व्यापाऱ्यांकडून नवीन आणि जुन्या आल्याच्या दरात मोठी तफावत होते. त्यामुळे आर्थिक नुकसान होत असल्याचे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले. तसेच व्यापाऱ्यांनी आले खरेदीनंतर ३० टनापर्यंत गाडी भरेपर्यंत वाट न पाहता १२ टन भरताच इन्सुलेटेड व्हॅनने माल पाठवावा, तो खराब होणार नाही. याशिवाय शेतमालाचे पेमेंट वेळेत द्यावे, अशीही मागणीही शेतकऱ्यांनी केली होती. तर व्यापाऱ्यांनी सरसकट आले सद्यस्थितीतील बाजार भावाने खरेदी करण्याचे मान्य केले. त्याचबरोबर यावेळी शेतकऱ्यांनी कोणतीही प्रतवारी न करता सरसकट एकत्र करून आले बाजार समितीतील अधिकृत परवानाधारक व्यापाऱ्यांनाच विकावे. सरसकट आले खरेदीचा सौदा न केल्याची तक्रार बाजार समितीकडे आल्यास संबंधिताचा परवाना रद्द करुन फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असे ठराव करण्यात आले होते. या ठरावाची आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या निवेदनाची दखल उपनिबंधक मनोहर माळी यांनी घेतली आहे. तसेच बाजार समितींना सूचना केली आहे.

व्यापाऱ्यांनी आल्याची नवे आणि जुने अशी प्रतवारी केल्याने किमतीत फरक फडतो. यामुळे शेतकऱ्यांना मोठे आर`थिक नुकसान होते हे निवेदनाद्वारे कार्यालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे. तसेच सातारा बाजार समितीनेही आल्याची प्रतवारी करु नये असा ठराव केला असून तो कार्यालयास प्राप्त झाला आहे. त्यामुळे आले प्रतवारीने शेतकऱ्यांचे नुकसान आणि व्यापाऱ्यातील संघर्ष यातून बाजार समितीचे कामकाज, शेतमालाचा लिलाव यावर विपरित परिणाम होऊ नये. यासाठी आवश्यक त्या उपायोजना कराव्यात, अशी सूचना उपनिबंधकांनी केली आहे. त्यामुळे आता प्रतवारी न करता आले विक्रीचा सरसकट निर्णय झाल्याचे स्पष्ट झाल्याने शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे.

जिल्हा उपनिबंधकांनी शेतकऱ्यांच्या असंतोषाची दखल घेत सर्व बाजार समित्यांना सरसकट आले खरेदीची सूचना केली आहे. आता सूचनांची अंमलबजावणी होण्यासाठी बाजार समित्यांनी दक्ष राहण्याची गरजेचे आहे. केवळ शासकीय कागद नाचविल्यास आणि सरसकट आले खरेदी न झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना कायदा हातात घेतल्याशिवाय राहणार नाही. - अनिल पवार, राज्य प्रवक्ते स्वाभिमानी शेतकरी संघटना 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीfarmingशेती