शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

अटी न लावता सोयाबीन खरेदी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 23:09 IST

सातारा : कोणत्याही अटी न लावता शेतकºयांकडून सरसकट सोयाबीन खरेदीची मागणी करत ‘मनसे’चे राज्य उपाध्यक्ष संदीप मोझर यांच्या नेतृत्वाखाली येथील सोयाबीन खरेदी केंद्रावर शेतकरी व मनसेसैनिकांनी हल्लाबोल केला. ‘दहा दिवसांत शेतकºयांच्या सोयाबीन खरेदीबाबत निर्णय न झाल्यास ‘मनसे’स्टाईलने आंदोलन करू व आंदोलनाची राज्यभर व्याप्ती वाढवू,’ असा इशारा मोझर यांनी आंदोलनावेळी दिला.शेतकºयांच्या ...

सातारा : कोणत्याही अटी न लावता शेतकºयांकडून सरसकट सोयाबीन खरेदीची मागणी करत ‘मनसे’चे राज्य उपाध्यक्ष संदीप मोझर यांच्या नेतृत्वाखाली येथील सोयाबीन खरेदी केंद्रावर शेतकरी व मनसेसैनिकांनी हल्लाबोल केला. ‘दहा दिवसांत शेतकºयांच्या सोयाबीन खरेदीबाबत निर्णय न झाल्यास ‘मनसे’स्टाईलने आंदोलन करू व आंदोलनाची राज्यभर व्याप्ती वाढवू,’ असा इशारा मोझर यांनी आंदोलनावेळी दिला.शेतकºयांच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी मनसेच्या वतीने शेती उत्त्पन्न बाजार समितीतील खरेदी केंद्रावर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. आंदोलन करण्यात आले. या हल्लाबोलनंतर जिल्हा उपनिबंधक कार्यालयात मागण्यांचे निवेदन देण्यात आले. तसेच मुख्यमंत्र्यांनाही या निवेदनाची प्रत पाठविण्यात आली. या निवेदनात संदीप मोझर यांनी म्हटले आहे की, सध्या मूग, घेवडा, उडीद आदी कडधान्यांसह सोयाबीन उत्पादक शेतकºयांची अवस्था बिकट झाली आहे. वास्तविक सोयाबीन पीक घेताना शेतकºयांना खूप झगडावे लागते. त्यातच शासकीय खरेदी केंद्रांवर एकरी ८ क्विंटल सोयाबीन घेऊ, असा शासनाचा नियम आहे. जर एकरी ८ क्विंटल सोयाबीन शासकीय केंद्रावर दिले तर उरलेल्या सोयाबीन पिकाचे काय करायचे? असा प्रश्न शेतकºयांपुढे आ वासून उभा आहे.सोयाबीन व अन्य कोणत्याही पिकांची नोंद स्वत: शेतकरी तलाठी कार्यालयात जाऊन करत नाही. तलाठी चावडीत बसून त्यांच्या मनाने व उपलब्ध तुटपुंंज्या माहितीनुसार पिकाची नोंद पिकवारीत करतात. आपल्या पिकाची नोंद करण्याइतकी समज अल्पशिक्षित शेतकºयांना नसते. त्यामुळे त्रूटी राहून शेतकºयांचा तोटाच होतो. याबाबत शासनाने ठोस भूमिका घ्यावी व केवळ पिकपाण्याची नोंद नसल्याने होत नसलेल्या खरेदीबाबत होणारे शेतकºयांचे नुकसान टाळावे, अशी आमची मागणी आहे.दहा दिवसांत शेतकºयांच्या विविध प्रश्नांबाबत ठोस निर्णय न झाल्यास ‘मनसे स्टाईल’ने आंदोलन करू. आंदोलनादरम्यान होणाºया परिणामास आणि नुकसानीस शासनच जबाबदार असेल याची नोंद घ्यावी, असा इशारा मोझर यांनी दिला.आंदोलनात संदीप मोझर यांच्यासह महाराष्टÑ नवनिर्माण कामगार सेनेचे चिटणीस सचिन पवार, मनसे जनहित कक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज माळी, मनसेचे जिल्हा सचिव सागर पवार, शेतकरी सेनेचे पाटण तालुकाध्यक्ष दिलीप सुर्वे, वाई तालुकाध्यक्ष बाळकृष्ण पिसाळ, मनसेचे उपजिल्हाध्यक्ष मधुकर जाधव यांच्यासह शेतकºयांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.नऊ दिवसांत ३४ क्विंटल खरेदीसाताºयात १६ आॅक्टोबरपासून सुरूझालेल्या सोयाबीन खरेदी केंद्रावर अवघ्या नऊ दिवसांत ३४ क्विंंटल सोयाबीन खरेदी झाले आहे. ही वस्तूस्थिती लक्षात घेता शासनाने जाहीर केलेल्या ३०५० दरापेक्षा ४०० रुपयांनी कमी दर व्यापारी देत आहेत. असे असूनही एका मिनिटांत ३४ क्विंटलची होत असलेली खरेदी पाहता शासन व्यापाºयांना पूरक भूमिका घेत असल्याचेच सिद्ध होते, असा आरोपही यावेळी मोझर यांनी केला.कर्जमाफीप्रमाणेच फसवा अजेंडासरकारी केंद्राकडे जाताना सर्वप्रथम तलाठ्याचे खिसे गरम करावे लागतात. तेथून मिळेल त्या वाहनातून खरेदी केंद्रावर सोयाबीन नेल्यावर कागदपत्रे पाहून त्याची प्रतवारी तपासताना शेतकºयास अक्षरश: रडकुंडीला आणले जाते. तेथे प्रतवारीत न बसल्याने नाकारलेले सोयाबीन नाईलाजाने लगतच्याच व्यापाºयास प्रती क्विंंटल ४०० रुपयांचा तोटा सहन करून घालावे लागते. कर्जमाफीप्रमाणेच सोयाबीन खरेदी केंद्र हा सुद्धा शासनाचा फसवा अजेंडा आहे, अशी टीकाही यावेळी संदीप मोझर यांनी केली.

टॅग्स :agricultureशेती