शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

अटी न लावता सोयाबीन खरेदी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 23:09 IST

सातारा : कोणत्याही अटी न लावता शेतकºयांकडून सरसकट सोयाबीन खरेदीची मागणी करत ‘मनसे’चे राज्य उपाध्यक्ष संदीप मोझर यांच्या नेतृत्वाखाली येथील सोयाबीन खरेदी केंद्रावर शेतकरी व मनसेसैनिकांनी हल्लाबोल केला. ‘दहा दिवसांत शेतकºयांच्या सोयाबीन खरेदीबाबत निर्णय न झाल्यास ‘मनसे’स्टाईलने आंदोलन करू व आंदोलनाची राज्यभर व्याप्ती वाढवू,’ असा इशारा मोझर यांनी आंदोलनावेळी दिला.शेतकºयांच्या ...

सातारा : कोणत्याही अटी न लावता शेतकºयांकडून सरसकट सोयाबीन खरेदीची मागणी करत ‘मनसे’चे राज्य उपाध्यक्ष संदीप मोझर यांच्या नेतृत्वाखाली येथील सोयाबीन खरेदी केंद्रावर शेतकरी व मनसेसैनिकांनी हल्लाबोल केला. ‘दहा दिवसांत शेतकºयांच्या सोयाबीन खरेदीबाबत निर्णय न झाल्यास ‘मनसे’स्टाईलने आंदोलन करू व आंदोलनाची राज्यभर व्याप्ती वाढवू,’ असा इशारा मोझर यांनी आंदोलनावेळी दिला.शेतकºयांच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी मनसेच्या वतीने शेती उत्त्पन्न बाजार समितीतील खरेदी केंद्रावर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. आंदोलन करण्यात आले. या हल्लाबोलनंतर जिल्हा उपनिबंधक कार्यालयात मागण्यांचे निवेदन देण्यात आले. तसेच मुख्यमंत्र्यांनाही या निवेदनाची प्रत पाठविण्यात आली. या निवेदनात संदीप मोझर यांनी म्हटले आहे की, सध्या मूग, घेवडा, उडीद आदी कडधान्यांसह सोयाबीन उत्पादक शेतकºयांची अवस्था बिकट झाली आहे. वास्तविक सोयाबीन पीक घेताना शेतकºयांना खूप झगडावे लागते. त्यातच शासकीय खरेदी केंद्रांवर एकरी ८ क्विंटल सोयाबीन घेऊ, असा शासनाचा नियम आहे. जर एकरी ८ क्विंटल सोयाबीन शासकीय केंद्रावर दिले तर उरलेल्या सोयाबीन पिकाचे काय करायचे? असा प्रश्न शेतकºयांपुढे आ वासून उभा आहे.सोयाबीन व अन्य कोणत्याही पिकांची नोंद स्वत: शेतकरी तलाठी कार्यालयात जाऊन करत नाही. तलाठी चावडीत बसून त्यांच्या मनाने व उपलब्ध तुटपुंंज्या माहितीनुसार पिकाची नोंद पिकवारीत करतात. आपल्या पिकाची नोंद करण्याइतकी समज अल्पशिक्षित शेतकºयांना नसते. त्यामुळे त्रूटी राहून शेतकºयांचा तोटाच होतो. याबाबत शासनाने ठोस भूमिका घ्यावी व केवळ पिकपाण्याची नोंद नसल्याने होत नसलेल्या खरेदीबाबत होणारे शेतकºयांचे नुकसान टाळावे, अशी आमची मागणी आहे.दहा दिवसांत शेतकºयांच्या विविध प्रश्नांबाबत ठोस निर्णय न झाल्यास ‘मनसे स्टाईल’ने आंदोलन करू. आंदोलनादरम्यान होणाºया परिणामास आणि नुकसानीस शासनच जबाबदार असेल याची नोंद घ्यावी, असा इशारा मोझर यांनी दिला.आंदोलनात संदीप मोझर यांच्यासह महाराष्टÑ नवनिर्माण कामगार सेनेचे चिटणीस सचिन पवार, मनसे जनहित कक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज माळी, मनसेचे जिल्हा सचिव सागर पवार, शेतकरी सेनेचे पाटण तालुकाध्यक्ष दिलीप सुर्वे, वाई तालुकाध्यक्ष बाळकृष्ण पिसाळ, मनसेचे उपजिल्हाध्यक्ष मधुकर जाधव यांच्यासह शेतकºयांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.नऊ दिवसांत ३४ क्विंटल खरेदीसाताºयात १६ आॅक्टोबरपासून सुरूझालेल्या सोयाबीन खरेदी केंद्रावर अवघ्या नऊ दिवसांत ३४ क्विंंटल सोयाबीन खरेदी झाले आहे. ही वस्तूस्थिती लक्षात घेता शासनाने जाहीर केलेल्या ३०५० दरापेक्षा ४०० रुपयांनी कमी दर व्यापारी देत आहेत. असे असूनही एका मिनिटांत ३४ क्विंटलची होत असलेली खरेदी पाहता शासन व्यापाºयांना पूरक भूमिका घेत असल्याचेच सिद्ध होते, असा आरोपही यावेळी मोझर यांनी केला.कर्जमाफीप्रमाणेच फसवा अजेंडासरकारी केंद्राकडे जाताना सर्वप्रथम तलाठ्याचे खिसे गरम करावे लागतात. तेथून मिळेल त्या वाहनातून खरेदी केंद्रावर सोयाबीन नेल्यावर कागदपत्रे पाहून त्याची प्रतवारी तपासताना शेतकºयास अक्षरश: रडकुंडीला आणले जाते. तेथे प्रतवारीत न बसल्याने नाकारलेले सोयाबीन नाईलाजाने लगतच्याच व्यापाºयास प्रती क्विंंटल ४०० रुपयांचा तोटा सहन करून घालावे लागते. कर्जमाफीप्रमाणेच सोयाबीन खरेदी केंद्र हा सुद्धा शासनाचा फसवा अजेंडा आहे, अशी टीकाही यावेळी संदीप मोझर यांनी केली.

टॅग्स :agricultureशेती