शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
3
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
4
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
7
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
8
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
9
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
10
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
12
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
13
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
14
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
15
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
16
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
17
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
18
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
19
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
Daily Top 2Weekly Top 5

अटी न लावता सोयाबीन खरेदी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 23:09 IST

सातारा : कोणत्याही अटी न लावता शेतकºयांकडून सरसकट सोयाबीन खरेदीची मागणी करत ‘मनसे’चे राज्य उपाध्यक्ष संदीप मोझर यांच्या नेतृत्वाखाली येथील सोयाबीन खरेदी केंद्रावर शेतकरी व मनसेसैनिकांनी हल्लाबोल केला. ‘दहा दिवसांत शेतकºयांच्या सोयाबीन खरेदीबाबत निर्णय न झाल्यास ‘मनसे’स्टाईलने आंदोलन करू व आंदोलनाची राज्यभर व्याप्ती वाढवू,’ असा इशारा मोझर यांनी आंदोलनावेळी दिला.शेतकºयांच्या ...

सातारा : कोणत्याही अटी न लावता शेतकºयांकडून सरसकट सोयाबीन खरेदीची मागणी करत ‘मनसे’चे राज्य उपाध्यक्ष संदीप मोझर यांच्या नेतृत्वाखाली येथील सोयाबीन खरेदी केंद्रावर शेतकरी व मनसेसैनिकांनी हल्लाबोल केला. ‘दहा दिवसांत शेतकºयांच्या सोयाबीन खरेदीबाबत निर्णय न झाल्यास ‘मनसे’स्टाईलने आंदोलन करू व आंदोलनाची राज्यभर व्याप्ती वाढवू,’ असा इशारा मोझर यांनी आंदोलनावेळी दिला.शेतकºयांच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी मनसेच्या वतीने शेती उत्त्पन्न बाजार समितीतील खरेदी केंद्रावर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. आंदोलन करण्यात आले. या हल्लाबोलनंतर जिल्हा उपनिबंधक कार्यालयात मागण्यांचे निवेदन देण्यात आले. तसेच मुख्यमंत्र्यांनाही या निवेदनाची प्रत पाठविण्यात आली. या निवेदनात संदीप मोझर यांनी म्हटले आहे की, सध्या मूग, घेवडा, उडीद आदी कडधान्यांसह सोयाबीन उत्पादक शेतकºयांची अवस्था बिकट झाली आहे. वास्तविक सोयाबीन पीक घेताना शेतकºयांना खूप झगडावे लागते. त्यातच शासकीय खरेदी केंद्रांवर एकरी ८ क्विंटल सोयाबीन घेऊ, असा शासनाचा नियम आहे. जर एकरी ८ क्विंटल सोयाबीन शासकीय केंद्रावर दिले तर उरलेल्या सोयाबीन पिकाचे काय करायचे? असा प्रश्न शेतकºयांपुढे आ वासून उभा आहे.सोयाबीन व अन्य कोणत्याही पिकांची नोंद स्वत: शेतकरी तलाठी कार्यालयात जाऊन करत नाही. तलाठी चावडीत बसून त्यांच्या मनाने व उपलब्ध तुटपुंंज्या माहितीनुसार पिकाची नोंद पिकवारीत करतात. आपल्या पिकाची नोंद करण्याइतकी समज अल्पशिक्षित शेतकºयांना नसते. त्यामुळे त्रूटी राहून शेतकºयांचा तोटाच होतो. याबाबत शासनाने ठोस भूमिका घ्यावी व केवळ पिकपाण्याची नोंद नसल्याने होत नसलेल्या खरेदीबाबत होणारे शेतकºयांचे नुकसान टाळावे, अशी आमची मागणी आहे.दहा दिवसांत शेतकºयांच्या विविध प्रश्नांबाबत ठोस निर्णय न झाल्यास ‘मनसे स्टाईल’ने आंदोलन करू. आंदोलनादरम्यान होणाºया परिणामास आणि नुकसानीस शासनच जबाबदार असेल याची नोंद घ्यावी, असा इशारा मोझर यांनी दिला.आंदोलनात संदीप मोझर यांच्यासह महाराष्टÑ नवनिर्माण कामगार सेनेचे चिटणीस सचिन पवार, मनसे जनहित कक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज माळी, मनसेचे जिल्हा सचिव सागर पवार, शेतकरी सेनेचे पाटण तालुकाध्यक्ष दिलीप सुर्वे, वाई तालुकाध्यक्ष बाळकृष्ण पिसाळ, मनसेचे उपजिल्हाध्यक्ष मधुकर जाधव यांच्यासह शेतकºयांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.नऊ दिवसांत ३४ क्विंटल खरेदीसाताºयात १६ आॅक्टोबरपासून सुरूझालेल्या सोयाबीन खरेदी केंद्रावर अवघ्या नऊ दिवसांत ३४ क्विंंटल सोयाबीन खरेदी झाले आहे. ही वस्तूस्थिती लक्षात घेता शासनाने जाहीर केलेल्या ३०५० दरापेक्षा ४०० रुपयांनी कमी दर व्यापारी देत आहेत. असे असूनही एका मिनिटांत ३४ क्विंटलची होत असलेली खरेदी पाहता शासन व्यापाºयांना पूरक भूमिका घेत असल्याचेच सिद्ध होते, असा आरोपही यावेळी मोझर यांनी केला.कर्जमाफीप्रमाणेच फसवा अजेंडासरकारी केंद्राकडे जाताना सर्वप्रथम तलाठ्याचे खिसे गरम करावे लागतात. तेथून मिळेल त्या वाहनातून खरेदी केंद्रावर सोयाबीन नेल्यावर कागदपत्रे पाहून त्याची प्रतवारी तपासताना शेतकºयास अक्षरश: रडकुंडीला आणले जाते. तेथे प्रतवारीत न बसल्याने नाकारलेले सोयाबीन नाईलाजाने लगतच्याच व्यापाºयास प्रती क्विंंटल ४०० रुपयांचा तोटा सहन करून घालावे लागते. कर्जमाफीप्रमाणेच सोयाबीन खरेदी केंद्र हा सुद्धा शासनाचा फसवा अजेंडा आहे, अशी टीकाही यावेळी संदीप मोझर यांनी केली.

टॅग्स :agricultureशेती