शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

आगीत गवताच्या पाच गंजी जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:39 IST

मंद्रुळकोळे खुर्द-काटकरवाडी येथील शिवाजी काटकर, यशवंत काटकर व महिपती काटकर यांच्या गवताच्या गंजी शेजारी शेजारी होत्या. ...

मंद्रुळकोळे खुर्द-काटकरवाडी येथील शिवाजी काटकर, यशवंत काटकर व महिपती काटकर यांच्या गवताच्या गंजी शेजारी शेजारी होत्या. अचानक गवताच्या गंजीला आग लागली. प्रचंड ऊन आणि वारा यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले. त्यामुळे ही आग शेजारच्या गंजीकडे गेल्याने त्याचा मोठा भडका उडाला. ज्या गंजींना आग लागली त्याशेजारी राहती घरे व इतरांच्याही गवताच्या गंजी होत्या. गंजींना लागलेली आग निदर्शनास येताच ग्रामस्थांनी एकत्र येऊन पाण्याचे टँकर आणून आग विझविली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

घटनेची माहिती मिळताच मंडलाधिकारी प्रवीण शिंदे यांच्या सूचनेनुसार तलाठी संजय काशिद यांनी घटनास्थळी भेट देऊन जळिताचा पंचनामा केला. आगीत शिवाजी काटकर यांचे १० हजार ८००, यशवंत काटकर यांचे २२ हजार ५०० व महिपती काटकर यांचे १३ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले.

चौकट

जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मिटला

घटनेची माहिती मिळाल्यानंतर काँग्रेसचे प्रांतिक प्रतिनिधी हिंदूराव पाटील यांनी त्याठिकाणी भेट दिली. त्यांनी जळीतग्रस्तांच्या जनावरांना चारा उपलब्ध करून दिला. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मिटला असून शासनाकडून जळीतग्रस्तांना मदत मिळवून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. यावेळी अरविंद कुंभार, दादासाहेब साळुंखे, अशोकराव काटकर, जोतीराम काटकर, खाशाबा काटकर, श्रीमंत घोलप, विकास काटकर, अंकुश काटकर, बापूराव काटकर उपस्थित होते.

फोटो : ०३केआरडी०२

कॅप्शन : मंद्रुळकोळे खुर्द-काटकरवाडी, ता. पाटण येथे आगीत गवताच्या गंजी जळून खाक झाल्यानंतर काँग्रेसचे प्रांतिक प्रतिनिधी हिंदूराव पाटील यांच्यासह महसूल कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.