शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

बैल थांबले...श्वान धावले!

By admin | Updated: January 13, 2016 01:09 IST

स्थगितीपूर्वी धावल्या गाड्या : पुसेगावच्या सेवागिरी यात्रेत श्वान स्पर्धेसाठी गर्दी

पुसेगाव : पुसेगावच्या सेवागिरी यात्रेत यंदाही कमालच झाली. दरवर्षी यात्रेचे मुख्य आकर्षण असलेल्या बैलगाड्यांच्या शर्यतींना बंदी असल्याने त्या रद्द केल्या होत्या. यात्रा सुरू असतानाच केंद्र सरकारने गुरुवार, दि. ५ रोजी बैलगाड्यांच्या शर्यतींवरील बंदी उठवली. देवस्थानने तत्काळ हालचाली करून शर्यती आयोजित केल्या. सोमवारी शर्यती निर्विघ्नपणे पार पडल्याही अन् मंगळवारी उच्च न्यायालयाने केंद्राच्या निर्णयाला स्थगिती दिली. त्यामुळे बैलं थांबले; पण श्वान धावली.श्री सेवागिरी महाराजांच्या वार्षिक यात्रेनिमित्त पुसेगाव, ता. खटाव येथे आयोजित केलेल्या श्वान शर्यतींना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बैलगाड्यांच्या शर्यतींना न्यायालयीन बंदी असल्याने या श्वानांच्या चित्तथरारक शर्यती पाहण्यासाठी जिल्ह्यातील सुमारे १० हजार श्वानप्रेमींनी हजेरी लावली होती. पुसेगाव-दहिवडी रस्त्यालगत कटगुण माळावर झालेल्या या स्पर्धेत सातारा, सोलापूर, कोल्हापूर, उस्मानाबाद, सांगली या जिल्ह्यांतून महाराष्ट्र ग्रेहाउंड गट, ग्रेहाउंड गटात, कारवान, ओरिजनल, क्रॉस आदी प्रकारच्या श्वानांनी सहभाग घेतला. स्पर्धा बाद पद्धतीने खेळवण्यात आल्या.प्रारंभी मठाधिपती सुंदरगिरी महाराज, ट्रस्ट अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त मोहनराव जाधव, शिवाजीराव जाधव, डॉ. प्र. ल. भुजबळ, विजय जाधव, अ‍ॅड. विजयराव जाधव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. श्वान शर्यतीचे समालोचन खास शैलीत झाल्याने रंगत आली. प्रत्येक फेरीत धावणाऱ्या श्वानांची वंशावळ व त्यांनी आत्तापर्यंत मारलेल्या मैदानांचा इतिहास श्वानप्रेमींच्या पुढे उलगडल्याने शर्यतीत खरी रंगत आली. यावर्षी स्पर्धेत श्वानांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविल्यामुळे अंतिम फेरीपर्यंत सूर्यास्त झाला होता.दोन वर्षांपूर्वीही काही काळासाठी बैलगाड्यांच्या शर्यतीवरील बंदी मागे घेण्यात आली. यात्रा झाल्यानंतर पुन्हा बंदी आणण्यात आली होती. बैलगाड्यांच्या शर्यती पार पडल्या त्यानंतर पुन्हा मंगळवारी बंदी आली. या योगायोगाची चर्चा रंगत होती. (प्रतिनिधी)शौकिनांकडून संमिश्र प्रतिक्रियाकेंद्र सरकारने शर्यत सुरू होण्यासाठी निर्णय घेतला होता. न्यायालयाने त्याला स्थगिती दिली असली तरी सरकार आमच्या बाजूने असल्याने ते योग्य बाजू मांडतील. - धनाजी शिंदे, अध्यक्ष, अखिल भारतीय बैलगाडी चालक-मालक संघटनाबैलगाड्या शर्यती पुन्हा सुरू करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे सद्याच्या निर्णयाचा आदर राखत आम्ही न्यायालयात जाण्याची तयारी करत आहोत. - सचिन नलवडे, तालुकाध्यक्ष, कऱ्हाड उत्तर स्वाभिमानी शेतकरी संघटनाकेंद्र सरकारने न्यायालयाचे मत जाणून घेऊन बैलगाडी शर्यतींसंदर्भात निर्णय घेतला असता तर बरे झाले असते. स्थगितीमुळे बैलगाडी चालक-मालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. - अमोल शिंदे, अ‍ॅनिमल आॅफिसर, मुंबई उच्च न्यायालयकेंद्र सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने आहे. त्यामुळे आम्हाला चिंता नाही. न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करून रास्त मार्गाने न्याय मिळेल, यावर आमचा विश्वास आहे. बैलगाडी शर्यतींना परवानगी मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही.- आनंदराव मोहिते, बैलगाडी मालक, रेठरे बुद्रक