शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

वास्तव्य नसल्याने इमारती मोडकळीस! रावसाहेब थोडं इकडंही बघा : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारती पडून व त्यांचा गैरकारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 00:17 IST

वडूज : तहसील कार्यालय व पोलिस स्टेशनच्या मागील बाजूस असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारतीसह महसूल कर्मचारी कॉलनीत कोणी कर्मचारी वास्तव्यास नसल्याने इमारतींचा सर्रास गैरवापर होत आहे

वडूज : तहसील कार्यालय व पोलिस स्टेशनच्या मागील बाजूस असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारतीसह महसूल कर्मचारी कॉलनीत कोणी कर्मचारी वास्तव्यास नसल्याने इमारतींचा सर्रास गैरवापर होत आहे. त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल विभाग आणि पोलिस खाते यांच्याकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने लाखो रुपये खर्च करून तहसील कार्यालय आणि पोलिस स्टेशनच्या मागील बाजूस इमारती उभ्या केल्या आहेत. या इमारतीत सध्या कोणीही वास्तव्यास नसल्याने या इमारतीचा गैरवापर होण्यास सुरुवात झाली आहे. या इमारतीचे काम अर्धवट राहिल्याने शासनाचे लाखोंचे नुकसान झाले आहे. या इमारती शेजारीच सार्वजनिक बांधकाम विभागाचे तसेच महसूल विभाग असूनही या इमारतीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का?, असा संतप्त सवाल नागरिकांतून होत आहे.

या परिसरात भूमीअभिलेख कार्यालय, तहसीलदार व महसूल कर्मचारी निवासस्थान आहे. मात्र सध्या या ठिकाणी कोणीही वास्तव्यास नसल्याने ‘भलतेच चाळे’ करणारे या इमारतीचा खुलेआम वापर करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. येथून रोज हजारो नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांची ये-जा असते. या इमारतीत गैर कारभाराची कृत्ये पाहावयास मिळत आहेत. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या मनावर याचे वाईट परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दिवसाढवळ्या होत असलेल्या दृश्याकडे पाहण्याचा कल सध्या वाढू लागला आहे .

संबंधित विभागाकडे वेळोवेळी या इमारती संदर्भात चौकशी केली असता हे अपूर्ण बांधकाम ठेकेदाराच्या व संबंधित विभागाच्या ‘साटेलोटे’ धोरणामुळे रखडले असल्याचे प्रकर्षाने जाणवते. यावर तोडगा म्हणून संबंधित विभागाने गांधारीची भूमिका न घेता तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. प्रशासनाने ही इमारत स्वच्छ केली होती.मात्र, बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे. इमारतीच्या चारी बाजूस काटेरी झाडाझुडपांची वाढ झाल्याने इमारत झाडांनी पूर्णपणे झाकली गेली आहे. याचा फायदा प्रेमीयुगुल घेत आहेत. या इमारतीचे बांधकाम झाल्यापासून त्या तशाच पडून आहेत. त्यामुळे या इमारतीची देखभाल होत नाही.

इमारतीपासून पोलिस ठाणे हाकेच्या अंतरावर असतानाही या इमारतीमध्ये धाडसाने गैरकारभार होत आहेत. येथे सुरू असणाºया अवैध उद्योगांविषयी संबंधिताना व पोलिस विभागाला माहिती नसणं ही शोकांतिका म्हणावी लागेल. बंद घरे यामुळे इमारतीचा गैरवापर तर होत आहेच; परंतु या परिसरात एकदिवस मोठा अनर्थ झाल्यावरच संबंधितांचे डोळे उघडणार का ? असा संतप्त सवाल नागरिकांनी ‘लोकमत’कडे याविषयी बोलताना स्पष्टपणे व्यक्त केला आहे.वास्तव्य नसल्याने गैरकृत्यांना प्रोत्साहनशहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या शासकीय इमारती वापराविना पडून राहिल्याने अवैध व्यवसायांना आणि कामांना प्रोत्साहन मिळत आहे. तर या इमारतीत गैरकृत्याचे साहित्य मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. अर्धा एकरापेक्षा जादा जागा मध्यवर्ती ठिकाणी शासनाला मिळून देखील त्याचा सुयोग्य वापर करता येत नसल्याने तालुक्यातील नागरिक संतप्त प्रतिक्रिया देत आहेत.