शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

बोकड तब्बल २२ हजारांना !

By admin | Updated: September 24, 2015 00:02 IST

पाचवड जनावरांचा बाजार : बकरी ईदसाठी कोकणवासीय आले साताऱ्यात; बोकडाच्या विक्रीने केला विक्रम!

भुर्इंज : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर वाई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाचवड, ता. वाई येथील उपबाजार आवारात बोकडांच्या खरेदी-विक्रीने उच्चांकी आकडा पार केला. तब्बल २२ हजार रुपयांना एका देखण्या बोकडाची विक्री झाली आहे. एकूण उलाढाल ४ ते ५ लाख रुपये एवढी झाली आहे. संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र व दक्षिण महाराष्ट्रात प्रसिद्ध असणाऱ्या पाचवडच्या मंगळवारच्या जनावरांच्या बाजारात बोकड खरेदीसाठी थेट कोकणातील महाड, पोलादपूरसह, पुणे, सातारा व इतर ठिकाणाहून लोक आले होते. पाचवडचा मंगळवारी भरणारा जनावरांचा बाजार सर्वदूर प्रसिद्ध आहे. मात्र गोहत्या व गोवंशबंदीमुळे या बाजाराला गेल्या काही दिवसात अवकळा प्राप्त झाली आहे. या कायद्यामुळे या बाजाराची उलाढाल मोठ्या प्रमाणावर मंदावली आहे. अशा परिस्थितीत बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी झालेल्या जनावरांच्या बाजारात बोकडांच्या खरेदी-विक्रीची उलाढाल नेहमीपेक्षा तब्बल ५ पट जादा झाली. एका बोकडाला उच्चांकी असा २२ हजारांची किंमत मिळाली असली तरी २ हजारांपासून १० हजारांपर्यंतचे बोकड येथे विक्रीसाठी उपलब्ध होते. तसेच सध्या बाजारात मटणाचे दर ४०० रुपये किलो असा आहे. मात्र येथील जनावरांच्या बाजारात जिवंत बोकडाची विक्री होताना सरासरी ४५० ते ५०० रुपये किलोने झाली. त्यातही देखण्या बोकडांना अधिक दर मिळाला. (वार्ताहर) विक्रेत्यांमध्ये आनंदीआनंद...दरवेळी आठवडा बाजारात बकरी, बोकडांच्या व्यवहाराची उलाढाल ५० हजार ते १ लाख रुपये एवढी होते. मात्र, यावेळी बकरी ईदमुळे ती ४ ते ५ लाख रुपये झाली आहे. विशेष म्हणजे आजच्या व्यवहारात डोक्यावर चांद असणारा एकही बोकड नव्हता. तरीही बोकडांना चांगला दर मिळाल्याने विक्रेते चांगलेच खूश आहेत. सर्व विक्रेते हे स्थानिक होते. तर खरेदीदार दूरहून आले होते, अशी माहिती समितीचे पर्यवेक्षक पी. एन. शिंंदे, लिपिक एम. एस. खाडे यांनी दिली.