शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भाजपाने शंभरचा आकडा केला पार, काँग्रेस १९, ठाकरेंची शिवसेना ९; जाणून घ्या नगर पंचायत अन् नगर परिषदेचे निकाल
2
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
3
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
4
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
5
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
6
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
7
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
8
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
9
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
10
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
11
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
12
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
13
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
14
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
15
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
16
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
17
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
18
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
19
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
20
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
Daily Top 2Weekly Top 5

पाणी आणणे हीच खरी शंकररावांना श्रध्दांजली

By admin | Updated: August 25, 2015 23:50 IST

रामराजे नाईक-निंंबाळकर : कोरेगाव येथील कार्यक्रमात पाणीप्रश्नी एकत्र येण्याचे आवाहन

कोरेगाव : ‘दुष्काळी भागातील पाणी प्रश्नाकडे दिवंगत शंकरराव जगताप यांनी राजकीय प्रश्न म्हणून कधीच पाहिले नाही. त्यांना पाणी प्रश्नाची ओढ होती. सर्वांनी पक्ष विरहीत आणि गट-तट विसरुन एकत्रित येऊन पाणी प्रश्न सोडविणे हीच खरी त्यांना श्रध्दांजली ठरेल,’ असा विश्वास विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केला. विधानसभेचे माजी अध्यक्ष शंकरराव जगताप यांचा तृत्तीय पुण्यस्मरण दिन कोरेगाव एज्युकेशन सोसायटीतर्फे विविध उपक्रम आयोजित केले होते. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा अ‍ॅड. सुनीता जगताप होत्या. आमदार बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, मुंबई बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब सोळस्कर-पाटील, उपाध्यक्ष भीमराव पाटील, पंचायत समितीचे उपसभापती अर्जून वीर, छत्रपती संभाजी महाराज समुहाचे प्रमुख सुरेश साळुंखे, तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष शहाजी भोईटे उपस्थिते होते. रामराजे म्हणाले, ‘खरे तर शंकरराव जगताप हे आमच्या वडिलांचे मित्र, त्यांना जिल्हा परिषदेत उपाध्यक्ष असताना पहिल्यांदा पाहिले होते. १९९५ मध्ये सर्वात पहिल्यांदा आमदार झाल्यावर त्यांच्याशी परिचय झाला. त्यांनी आम्हाला बरोबरीने वागविले. पाणी या विषयावर आमचे ते नाते जडले. त्यांनी वैचारिक धनाची शिदोरी प्रत्येकाला दिली. त्यांचे दुष्काळी भागातील पाण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकत्र येऊ या. आमदार बाळासाहेब पाटील यांनी दिवंगत शंकरराव जगताप यांच्या दुष्काळातील पाझर तलाव निर्मिती आणि रस्त्यांच्या जाळ्यांचे कौतुक करत, असा आमदार होणे नाही, असे स्पष्ट केले. अण्णांनी कार्यकर्त्यांचे जाळे विणले.’ अ‍ॅड. सुनीता जगताप म्हणाल्या, ‘आण्णांना नेहमी दुष्काळी भागाची काळजी होती. त्यांनी विविध पदे भूषविली, मात्र त्यामध्ये दुष्काळी जनतेची कामे करण्याकडे पुढाकार होता. त्यांनी पाझर तलाव निर्मिती, रस्ते या मूलभूत गरजांसह कोरेगाव एज्युकेशन सोसायटीची स्थापना करत ज्ञानगंगोत्री खेडोपाडी पोहोचविली. गरिबांच्या मुलांना अग्रक्रमाने शिक्षण दिले. शिक्षण संस्था चालविताना, त्यांना किती अडचणी आल्या, याचा विचार केला तर मन हेलावून जाते.’ भीमराव पाटील यांनी प्रास्ताविकात आण्णांच्या कार्याला उजाळा दिला. त्यांची अपूर्ण राहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत, अशी भूमिका विषद केली. प्रमुख पाहुण्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. संस्थेचे खजिनदार दत्तात्रय महाजन यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)