शिवथर : शिवथर येथे बऱ्याच दिवसांपासून स्मशानभूमीमध्ये गावकऱ्यांना अंत्यविधी वेळी बसण्यासाठी अडचण होत होती. याचे गांभीर्य ओळखून किरण साबळे-पाटील, बबनराव साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली व सामाजिक कार्यकर्ते डॉ. अविनाश पोळ यांच्या सहकार्याने ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी कामाचा धडाका चालू केला. त्यामुळे ग्रामस्थांनी पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.शिवथर गावची निवडणूक काही दिवसांपूर्वी झाली आणि सरपंच व उपसरपंच निवड दि. ११ तारखेला झाली. त्या दिवसापासून नवनिर्वाचित ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी कामाला सुरुवात केली. बऱ्याच दिवसांपासून गावच्या पाणी पुरवठ्याच्या विहिरीला दुष्काळामुळे पाणी अपुरे पडत होते. त्यामुळे गावातील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु नव्याने आलेल्या ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय पेयजल योजनेतून झालेल्या विहिरीतून स्वत: पाईप टाकून जुन्या पाणी पुरवठ्याच्या विहिरीमध्ये पाणी सोडले. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला. तसेच गावातील स्मशानभूमीमध्ये ग्रामस्थ, महिलांना बसण्यासाठी व्यवस्थित बैठक व्यवस्था नव्हती त्याचीही पोकल्यानच्या साह्याने दुरुस्ती करण्यात आली व भवानी ओघळीत बऱ्याच दिवसांपासून लहान झाडे-झुडपे वाढल्याने दुर्गंधी पसरली होती. ती देखील साफ करण्यात आली. त्यामुळे ग्रामस्थांनी नवीन आलेल्या ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले.(वार्ताहर)येणाऱ्या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये गावामध्ये कोणतेही काम आमच्याकडून राहणार नाही. या पाच वर्षांत शिवथर गाव हे आयडॉल गाव करण्याचा आमचा मानस आहे.- प्रकाश साबळे, उपसरपंच, शिवथर
शिवथर स्मशानभूमीचे उजळले भाग्य
By admin | Updated: December 2, 2015 00:41 IST