शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

रेल्वेची दुचाकीला धडक बसून वांगीचे दाम्पत्य ठार

By admin | Updated: October 3, 2015 23:08 IST

कार्वे येथे बहिणीला भेटून जाताना दुर्घटना

कऱ्हाड : रूळ ओलांडताना रेल्वेच्या धडकेत दुचाकीस्वार दाम्पत्य जागीच ठार झाले. कऱ्हाड तालुक्यातील कार्वेचौकी येथे शनिवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. राजेंद्र विठ्ठल फसाले (वय ३५) व वैशाली राजेंद्र फसाले (२५, रा. वांगी, ता. कडेगाव) असे रेल्वेच्या धडकेत मृत्युमुखी पडलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, वांगी येथील राजेंद्र फसाले यांच्या बहिणीचे कार्वे (ता. कऱ्हाड) हे सासर आहे. शनिवारी दुपारी राजेंद्र व त्यांची पत्नी वैशाली हे दुचाकीवरून कार्वे येथे आले होते. बहिणीला भेटल्यानंतर राजेंद्र व वैशाली परत दुचाकीवरून वांगीला जाण्यासाठी निघाले. कार्वेहून वांगीला जाण्यासाठी कार्वेचौकी, शेणोली मार्गे सोनसळ घाटातून मार्ग आहे. या मार्गावरून जाताना कार्वेचौकी येथे रेल्वेरूळ ओलांडावा लागतो. संबंधित ठिकाणी गेट नाही. मात्र, स्थानिकांसह अनेकजण तेथूनच कच्च्या रस्त्यातून रूळ ओलांडतात. राजेंद्र व वैशाली हेसुद्धा त्याच मार्गाने वांगीला निघाले होते. रूळ ओलांडण्याच्या ठिकाणी रस्त्याला चढ आहे. त्यामुळे राजेंद्र यांनी दुचाकीची गती वाढविली. याचवेळी कोल्हापूरहून अहमदाबादला निघालेली रेल्वे राजेंद्र यांच्या निदर्शनास आली नाही. त्यामुळे रेल्वेची दुचाकीला जोराची धडक बसली. ही धडक एवढी भीषण होती की, राजेंद्र व वैशाली दुचाकीसह दूरवर फेकले गेले. दुर्घटना निदर्शनास येताच परिसरातील ग्रामस्थांनी तत्काळ त्याठिकाणी धाव घेतली. मात्र, रेल्वेच्या धडकेत राजेंद्र व वैशाली यांचा जागीच मृत्यू झाला होता. (पान १ वरून) तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, सहायक निरीक्षक स्वप्निल लोखंडे, विवेक पाटील, फौजदार भरते, हवालदार चोरगे यांनी अपघातस्थळाला भेट दिली. तसेच रेल्वे पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा झाल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी कऱ्हाडच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. तीन मुले निराधार पसाले दाम्पत्याची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. मोलमजुरी करून ते उदरनिर्वाह करीत होते. राजेंद्र यांच्या पश्चात आई-वडील, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. मोठी मुलगी ज्योती आठ वर्षांची, दुसरी मुलगी संस्कृती सहा वर्षांची, तर मुलगा संस्कार तीन वर्षाचा आहे. पसाले दाम्पत्याच्या मृत्यूने त्यांची तीन मुले निराधार झाली आहेत. रेल्वेरुळावर हद्द कुणाची? च्संबंधित अपघात रेल्वेरुळावर झाला असल्याने तो रेल्वे पोलिसांच्या अखत्यारित की कऱ्हाड तालुका पोलिसांच्या, असा पेच निर्माण झाला होता. च्रात्री उशिरापर्यंत त्याबाबत कोणताही निर्णय झाला नव्हता. अपघाताची नोंद कोठे करायची, याबाबत अधिकाऱ्यांची चर्चा सुरू होती. बहिणीचा आक्रोश अपघाताची माहिती मिळाल्यानंतर राजेंद्र यांची बहीण व इतर नातेवाईक कार्वेतून त्वरित कार्वेचौकी येथे पोहोचले. त्यावेळी भाऊ व वहिनीचा मृतदेह पाहून बहिणीने आक्रोश केला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर सायंकाळी वांगी येथील नातेवाईकही अपघातस्थळी पोहोचले होते. वांगी परिसरावर शोककळा वांगी : रेल्वे अपघातात राजेंद्र पसाले व वैशाली पसाले हे दाम्पत्य ठार झाल्याचे वृत्त वांगी गावात समजताच परिसरावर शोककळा पसरली. राजेंद्र पसाले आई-वडिलांपासून विभक्त झाल्याने वांगी गावातच पत्नी व तीन मुलांसह स्वतंत्र राहत होते. त्यांना शनिवारीच सोसायटीचे कर्ज मंजूर झाले होते. त्यातून काही जणांची उधारी भागवून पत्नी वैशालीला पैंजण खरेदी केले होते. त्यानंतर दोघे पती-पत्नी धानाई-कार्वे येथे आजारी असलेल्या नातेवाइकास पाहण्यासाठी सकाळी तीन वर्षांच्या मुलाला घेऊन दुचाकीवरून गेले होते. तेथील नातेवाइकांच्या घरात मुलाला ठेवून ते दुसऱ्या नातेवाइकांकडे जात असताना रेल्वे रुळावर रेल्वेने ठोकरल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.