शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
4
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
5
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
6
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
7
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
8
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
9
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
10
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
11
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
13
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
14
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
15
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
16
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
17
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
18
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
19
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
20
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेची दुचाकीला धडक बसून वांगीचे दाम्पत्य ठार

By admin | Updated: October 3, 2015 23:08 IST

कार्वे येथे बहिणीला भेटून जाताना दुर्घटना

कऱ्हाड : रूळ ओलांडताना रेल्वेच्या धडकेत दुचाकीस्वार दाम्पत्य जागीच ठार झाले. कऱ्हाड तालुक्यातील कार्वेचौकी येथे शनिवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. राजेंद्र विठ्ठल फसाले (वय ३५) व वैशाली राजेंद्र फसाले (२५, रा. वांगी, ता. कडेगाव) असे रेल्वेच्या धडकेत मृत्युमुखी पडलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, वांगी येथील राजेंद्र फसाले यांच्या बहिणीचे कार्वे (ता. कऱ्हाड) हे सासर आहे. शनिवारी दुपारी राजेंद्र व त्यांची पत्नी वैशाली हे दुचाकीवरून कार्वे येथे आले होते. बहिणीला भेटल्यानंतर राजेंद्र व वैशाली परत दुचाकीवरून वांगीला जाण्यासाठी निघाले. कार्वेहून वांगीला जाण्यासाठी कार्वेचौकी, शेणोली मार्गे सोनसळ घाटातून मार्ग आहे. या मार्गावरून जाताना कार्वेचौकी येथे रेल्वेरूळ ओलांडावा लागतो. संबंधित ठिकाणी गेट नाही. मात्र, स्थानिकांसह अनेकजण तेथूनच कच्च्या रस्त्यातून रूळ ओलांडतात. राजेंद्र व वैशाली हेसुद्धा त्याच मार्गाने वांगीला निघाले होते. रूळ ओलांडण्याच्या ठिकाणी रस्त्याला चढ आहे. त्यामुळे राजेंद्र यांनी दुचाकीची गती वाढविली. याचवेळी कोल्हापूरहून अहमदाबादला निघालेली रेल्वे राजेंद्र यांच्या निदर्शनास आली नाही. त्यामुळे रेल्वेची दुचाकीला जोराची धडक बसली. ही धडक एवढी भीषण होती की, राजेंद्र व वैशाली दुचाकीसह दूरवर फेकले गेले. दुर्घटना निदर्शनास येताच परिसरातील ग्रामस्थांनी तत्काळ त्याठिकाणी धाव घेतली. मात्र, रेल्वेच्या धडकेत राजेंद्र व वैशाली यांचा जागीच मृत्यू झाला होता. (पान १ वरून) तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, सहायक निरीक्षक स्वप्निल लोखंडे, विवेक पाटील, फौजदार भरते, हवालदार चोरगे यांनी अपघातस्थळाला भेट दिली. तसेच रेल्वे पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा झाल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी कऱ्हाडच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. तीन मुले निराधार पसाले दाम्पत्याची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. मोलमजुरी करून ते उदरनिर्वाह करीत होते. राजेंद्र यांच्या पश्चात आई-वडील, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. मोठी मुलगी ज्योती आठ वर्षांची, दुसरी मुलगी संस्कृती सहा वर्षांची, तर मुलगा संस्कार तीन वर्षाचा आहे. पसाले दाम्पत्याच्या मृत्यूने त्यांची तीन मुले निराधार झाली आहेत. रेल्वेरुळावर हद्द कुणाची? च्संबंधित अपघात रेल्वेरुळावर झाला असल्याने तो रेल्वे पोलिसांच्या अखत्यारित की कऱ्हाड तालुका पोलिसांच्या, असा पेच निर्माण झाला होता. च्रात्री उशिरापर्यंत त्याबाबत कोणताही निर्णय झाला नव्हता. अपघाताची नोंद कोठे करायची, याबाबत अधिकाऱ्यांची चर्चा सुरू होती. बहिणीचा आक्रोश अपघाताची माहिती मिळाल्यानंतर राजेंद्र यांची बहीण व इतर नातेवाईक कार्वेतून त्वरित कार्वेचौकी येथे पोहोचले. त्यावेळी भाऊ व वहिनीचा मृतदेह पाहून बहिणीने आक्रोश केला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर सायंकाळी वांगी येथील नातेवाईकही अपघातस्थळी पोहोचले होते. वांगी परिसरावर शोककळा वांगी : रेल्वे अपघातात राजेंद्र पसाले व वैशाली पसाले हे दाम्पत्य ठार झाल्याचे वृत्त वांगी गावात समजताच परिसरावर शोककळा पसरली. राजेंद्र पसाले आई-वडिलांपासून विभक्त झाल्याने वांगी गावातच पत्नी व तीन मुलांसह स्वतंत्र राहत होते. त्यांना शनिवारीच सोसायटीचे कर्ज मंजूर झाले होते. त्यातून काही जणांची उधारी भागवून पत्नी वैशालीला पैंजण खरेदी केले होते. त्यानंतर दोघे पती-पत्नी धानाई-कार्वे येथे आजारी असलेल्या नातेवाइकास पाहण्यासाठी सकाळी तीन वर्षांच्या मुलाला घेऊन दुचाकीवरून गेले होते. तेथील नातेवाइकांच्या घरात मुलाला ठेवून ते दुसऱ्या नातेवाइकांकडे जात असताना रेल्वे रुळावर रेल्वेने ठोकरल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.