शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

बोअरचं पाणी जरा जपून!

By admin | Updated: October 16, 2014 22:52 IST

पुनर्भरण योजना : उद्देश चांगला; मात्र काळजी न घेतल्यास धोका

वाठार स्टेशन : स्वच्छ व निर्जंतुक पाणी देऊन एका बाजूने भविष्याची काळजी घेताना दुसऱ्या बाजूने बोअरवेल परिसरात तुंबलेल्या गटारातील पाणी बोअरवेल पुनर्भरण योजनेतून आता ग्रामस्थांना प्यावे लागणार आहे. या योजनेचा उद्देश जरी चांगला असला, तरी योग्य काळजी न घेतल््यास हे ‘विकतचं दुखणं’ ठरण्याची शक्यता आहे. जिल्हा भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या माध्यमातून सध्या कोरेगाव तालुक्यात ग्रामपंचायत हद्दीतील बोअरवेलचे पुनर्भरण करण्याचे काम सुरू आहे. एका गावासाठी ८४ हजार ११५ रुपयांची मंजुरी असून, बोअरवेलशेजारी अंदाजे पाच फुटांवर जमिनीत पाच इंची उभे बोअरवेल ६५ ते ७० फूट खोलीचे घेऊन त्याशेजारी अंदाजे २ बाय २ च्या खड्ड्यात मुरूम, वाळू भरून त्याचे पुनर्भरण करण्यात येणार आहे. बऱ्याच ठिकाणी हे पुनर्भरण चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याने भविष्यात यातून उद््भवू शकणाऱ्या परिणामांनाही ग्रामस्थांना सामोरे जावे लागणार आहे. देऊर गावात संबंधित ठेकेदारांनी नुकतेच बोअरवेल पुनर्भरणाचे काम केले आहे. परंतु, बोअरवेलच्या शेजारील गटारे नेहमीच तुंबलेली असल्याने हे पाणी या खड्ड्यात उतरून तेच सांडपाणी या बोअरवेलच्या माध्यमातून लोकांना प्यावे लागण्याची शक्यता आहे. कोरेगाव तालुक्यातील आसनगाव, पळशी, देऊर या गावांत ही कामे सुरू असून, आणखीही काही गावांमध्ये ती सुरू केली जाणार आहेत. ती योग्य पद्धतीने केली जावीत, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. (वार्ताहर)