शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

जनतेच्या प्रमाणपत्रासाठी चढाओढ

By admin | Updated: July 27, 2014 23:07 IST

टीकाटिप्पणीची ‘अतिवृष्टी’ : कोण पास-कोण नापास, ठरवणार मात्र मतदार

पाटण : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संगमनगर पुलाचे भूमिपूजन केले. त्या कार्यक्रमात ‘तुम्ही चांगले काम करताय’ अशी प्रशंसा पाटणकरांनी उपमुख्यमंत्र्यांची केली, अशी टीका करून शंभूराज देसाई यांनी चांगल्या कामाचे प्रमाणपत्र जनता देते, असे सुनावले तर शेडगेवाडी व गणेशवाडी येथील ग्रामस्थांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला हे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आजी-माजी आमदारांमध्ये सध्या चढाओढ सुरू असून, कोण पास आणि कोण नापास याचा फैसला येत्या दोन महिन्यांतच पाटणची जनता करणार आहे. तोपर्यंत एकमेकांची उणीदुणी काढणाऱ्या नेत्यांच्या दररोजच्या कार्यक्रमामुळे प्रमाणपत्र देणाऱ्या जनतेचे चांगलेच मनोरंजन होत आहे.पाटण तालुक्यातील जनता समाधानी आहे का, हलाखीचे जीवन जगत आहे, हे नुकत्याच चार दिवस झालेल्या जोरदार अतिवृष्टीमुळे उघड झाले. रस्त्यावरील गावे किमान सकाळी उठल्यावर विजेच्या प्रकाशात दुधाचा वाफाळलेला चहा, कडक इस्त्रीचे कपडे, ताजी चपाती, वेगवेगळ्या भाज्या, फिल्टरचे पाणी आणि दारात येणाऱ्या गाडीमुळे समाधानी आहेत. मात्र, पाटण तालुक्याच्या दुर्गम भागात डोंगरावर वसलेली शेकडो गावे अती पावसामुळे गावात वीज नसल्याने अर्धपोटी राहतात; कारण गावात वीज नसल्यामुळे दळण मिळत नाही. ओढ्यातील दूषित पाणी प्यावे लागते. घरात गळत असल्यामुळे निवाऱ्याचा प्रश्न निर्माण होतो. आजारी पडलेल्या व्यक्ती, लहान मूल, गरोदर मातांना पाटण, मोरगिरी, कोयनानगर किंवा ढेबेवाडीला न्यायचे झाल्यास अंधारातून चारचौघांनी डोलीतून घेऊन जायचे किंवा एखादी मोडकीतोडकी जीप बघून ४० किलोमीटर अंतर कापायचे. वाटेतच जर काही बरं वाईट झाले तर पेशंट जीवाला मुकले. अशा घटना आजही तालुक्यात घडत आहेत. याला जबाबदार कोण, असा प्रश्न जनतेला पडला आहे. (प्रतिनिधी)