शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

‘खादी’च्या मेहरबानीने बाटली उभी !

By admin | Updated: January 16, 2015 23:47 IST

खाकी कमजोर, विक्रेते शिरजोर : बंदी असूनही चाफळ भागात दारूचा पूर, पोलिसांना ‘मामा’ बनविण्याचा प्रकार

चाफळ : विभागात पुन्हा एकदा अवैध दारुविक्रीला ऊत आला असून, दारूबंदी असणाऱ्या सूर्याचीवाडी, वाघजाईवाडी व कडववाडीत सध्या दारूची मोठ्या प्रमाणात विक्री सुरु आहे. त्यामुळे ‘पोलीस कमजोर, दारूविक्रेते शिरजोर’ असे चित्र पाहावयास मिळत आहे. काही महिन्यांपासून चाफळ विभागात अवैध दारूविक्रीला ऊत आला आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अवैध दारुविक्रीमुळे गावांचे सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे. काही स्थानिक नेत्यांचे अभय मिळत असल्याने दारु व्यावसायिक पोलिसांना न जुमानता राजरोसपणे दारुविक्री करीत पोलिसांना आव्हान देत आहेत. सूर्याचीवाडी येथे एका राहत्या घरामध्ये राजरोसपणे दारुविक्री सुरु आहे. या व्यावसायिकाने दारुविक्रीसाठी नामी शक्कल लढविली आहे. आपल्या पत्नी व नातवांकरवी संबंधित व्यावसायिक दारूविक्री करीत आहे. हा व्यावसायिक पंधरा वर्षांपासून दारुविक्री करीत असल्याचे छातीठोकपणे सांगत असून मोठ्या आविर्भावात तो पोलिसांवर रूबाब झाडताना दिसून येत आहे. त्याच्याकडून पोलिसांनाही ‘मॅनेज’ केले जात असल्याची चर्चा आहे. या दारू व्यवसायामुळे गावातील अनेक महिलांचे संसार उद््ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. मात्र, त्याचे प्रशासनासह स्थानिक नेत्यांनाही काहर देणे घेणे नसल्याचे दिसून येते. कडववाडी व वाघजाईवाडी येथील दारुविक्रेत्यांनीही आपली पथारी पसरली आहे. झटपट पैसे मिळविण्यासाठी त्यांनी नामी शक्कल लढवत चक्क रस्त्याकडेलाच दारूचा अड्डा बनविला आहे.पोलिसांना ‘मामा’ बनवण्याचा उघोग वाघजाईवाडीतील एका व्यावसायिकाने मोठ्या थाटात सुरु केला आहे, तर येथील दुसऱ्या व्यावसायिकाने आपल्या राहत्या घरातच दारूचा अड्डा बनवला आहे. हा व्यावसायिक आपल्या कुटुंबीयांकरवी दारुविक्री करत आहे.समर्थ रामदास स्वामी व छत्रपती शिवाजी महारांजाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या चाफळ विभागास राम मंदिरामुळे मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. अशा या भूमीमध्ये अनेक धार्मिक कार्यक्रम पार पडत असतात. परंतु या दारुविक्रेत्यांमुळे गावांची शांतता भंग पावत चालल्याने याचाच विचार करुन गावातील तरुण व महिलांनी एकत्र येऊन गावातील उभी बाटली बहुमताने आडवी करणे गरजेचे आहे. त्यासाठी पोलीस प्रशासनानेही ग्रामस्थांना सहकार्य करणे आवश्यक आहे. (वार्ताहर)आधी मद्यप्राशन, मग मारामारीधार्मिक अधिष्ठान लाभलेल्या चाफळ विभागाची राममंदिरामुळे पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून ओळ्ख आहे. असे असताना या तिन्ही गावांतील शांतता दारू व्यवसायामुळे भंग होत आहे. या दारु अड्ड्यांवर पोलिसांनी तातडीने कारवाई करणे गरजेचे आहे. दारूमुळे काही गावात यापूर्वी मारामारीच्या घटना घडल्या आहेत. हे सारे जगजाहीर असूनही कोणतीच कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.