शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानच्या हल्ल्यात पाकिस्तानचे ५८ सैनिक ठार; तालिबान सरकारने ISIS बद्दल काय सांगितलं?
2
'मुलींनी रात्री बाहेर पडू नये', दुर्गापूर सामूहिक बलात्कार प्रकरणावर ममता बॅनर्जींचे वादग्रस्त वक्तव्य
3
धक्कादायक! कपडे उतरवून पोलिसांनी हैवानासारखं मारलं, धमन्या फुटल्या; तरुणाचा मृत्यू
4
'वनडे क्वीन' स्मृतीनं रचला नवा इतिहास; ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन विरुद्ध साधला मोठा डाव
5
“कोकणाच्या भूमीतील या न्याय मंदिरातून स्थानिकांना जलद गतीने न्याय मिळेल”: एकनाथ शिंदे
6
‘लंच पे चर्चा’! राज ठाकरे आईसोबत पुन्हा मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंसोबत स्नेहभोजनाचा कार्यक्रम
7
गृह कर्जाचा हप्ता भरणं जड जातंय? ईएमआय कमी करण्यासाठी 'या' ५ स्मार्ट ट्रिक्स वापरा आणि मोठी बचत करा!
8
“दादा भुसेंचे ट्रम्प यांच्याशी घनिष्ट संबंध असतील, पालकमंत्रीपद...”; गिरीश महाजनांचा टोला
9
अर्धा संघ तंबूत धाडत कुलदीप यादवनं रचला इतिहास; दिल्लीच्या मैदानात मारला विश्वविक्रमी 'पंजा'
10
तुम्हालाही मस्त नेलपेंट लावायला आवडते? ठरेल जीवघेणं, वाढू शकतो स्किन कॅन्सरचा धोका
11
तुम्हीही होऊ शकता कोट्यधीश! विद्यार्थी, गिग वर्कर्ससाठी 'मायक्रो SIP' चा नवा सुपरहिट ट्रेंड
12
"जर तुम्ही कॉफी बनवायला शिकला असाल तर...", राहुल गांधींच्या दक्षिण अमेरिका दौऱ्यावर भाजपचा निशाणा
13
“तरे म्हणाले होते हा माणूस दगा देईल, तेच झाले, आता पश्चाताप झाला नसता”; ठाकरेंची शिंदेवर टीका
14
नोकरीच्या बचतीची चिंता सोडा! 'या' ४ सोप्या मार्गांनी घरबसल्या तपासा तुमचा PF बॅलन्स
15
Pune Crime: गर्लफ्रेंडच्या मोबाईलमध्ये दुसऱ्या पुरुषासोबतचे नग्न फोटो, बॉयफ्रेंडने केक कापायच्या चाकूनेच तरुणीची हत्या
16
घाईत घेतलेला निर्णय महागात; अमिताभ बच्चन यांनी मुलांच्या ओव्हर कॉन्फिडन्सवर टाकला प्रकाश
17
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पुन्हा पत्रकार परिषद घेणार, महिला पत्रकारांना विशेष आमंत्रण
18
अफगाणिस्तान vs पाकिस्तान; थेट युद्धात कोणाचे सैन्य वरचढ ठरेल? जाणून घ्या...
19
IND vs WI : बुमराहचा 'ट्रिपल फिफ्टी'चा रेकॉर्ड; वेळ घेतला; पण परफेक्ट यॉर्करसह साधला विकेटचा डाव
20
Rajya Sabha Election: भाजपने मुस्लीम नेत्याला उतरवले निवडणुकीच्या रिंगणात, तीन नावाची घोषणा

‘खादी’च्या मेहरबानीने बाटली उभी !

By admin | Updated: January 16, 2015 23:47 IST

खाकी कमजोर, विक्रेते शिरजोर : बंदी असूनही चाफळ भागात दारूचा पूर, पोलिसांना ‘मामा’ बनविण्याचा प्रकार

चाफळ : विभागात पुन्हा एकदा अवैध दारुविक्रीला ऊत आला असून, दारूबंदी असणाऱ्या सूर्याचीवाडी, वाघजाईवाडी व कडववाडीत सध्या दारूची मोठ्या प्रमाणात विक्री सुरु आहे. त्यामुळे ‘पोलीस कमजोर, दारूविक्रेते शिरजोर’ असे चित्र पाहावयास मिळत आहे. काही महिन्यांपासून चाफळ विभागात अवैध दारूविक्रीला ऊत आला आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अवैध दारुविक्रीमुळे गावांचे सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे. काही स्थानिक नेत्यांचे अभय मिळत असल्याने दारु व्यावसायिक पोलिसांना न जुमानता राजरोसपणे दारुविक्री करीत पोलिसांना आव्हान देत आहेत. सूर्याचीवाडी येथे एका राहत्या घरामध्ये राजरोसपणे दारुविक्री सुरु आहे. या व्यावसायिकाने दारुविक्रीसाठी नामी शक्कल लढविली आहे. आपल्या पत्नी व नातवांकरवी संबंधित व्यावसायिक दारूविक्री करीत आहे. हा व्यावसायिक पंधरा वर्षांपासून दारुविक्री करीत असल्याचे छातीठोकपणे सांगत असून मोठ्या आविर्भावात तो पोलिसांवर रूबाब झाडताना दिसून येत आहे. त्याच्याकडून पोलिसांनाही ‘मॅनेज’ केले जात असल्याची चर्चा आहे. या दारू व्यवसायामुळे गावातील अनेक महिलांचे संसार उद््ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. मात्र, त्याचे प्रशासनासह स्थानिक नेत्यांनाही काहर देणे घेणे नसल्याचे दिसून येते. कडववाडी व वाघजाईवाडी येथील दारुविक्रेत्यांनीही आपली पथारी पसरली आहे. झटपट पैसे मिळविण्यासाठी त्यांनी नामी शक्कल लढवत चक्क रस्त्याकडेलाच दारूचा अड्डा बनविला आहे.पोलिसांना ‘मामा’ बनवण्याचा उघोग वाघजाईवाडीतील एका व्यावसायिकाने मोठ्या थाटात सुरु केला आहे, तर येथील दुसऱ्या व्यावसायिकाने आपल्या राहत्या घरातच दारूचा अड्डा बनवला आहे. हा व्यावसायिक आपल्या कुटुंबीयांकरवी दारुविक्री करत आहे.समर्थ रामदास स्वामी व छत्रपती शिवाजी महारांजाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या चाफळ विभागास राम मंदिरामुळे मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. अशा या भूमीमध्ये अनेक धार्मिक कार्यक्रम पार पडत असतात. परंतु या दारुविक्रेत्यांमुळे गावांची शांतता भंग पावत चालल्याने याचाच विचार करुन गावातील तरुण व महिलांनी एकत्र येऊन गावातील उभी बाटली बहुमताने आडवी करणे गरजेचे आहे. त्यासाठी पोलीस प्रशासनानेही ग्रामस्थांना सहकार्य करणे आवश्यक आहे. (वार्ताहर)आधी मद्यप्राशन, मग मारामारीधार्मिक अधिष्ठान लाभलेल्या चाफळ विभागाची राममंदिरामुळे पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून ओळ्ख आहे. असे असताना या तिन्ही गावांतील शांतता दारू व्यवसायामुळे भंग होत आहे. या दारु अड्ड्यांवर पोलिसांनी तातडीने कारवाई करणे गरजेचे आहे. दारूमुळे काही गावात यापूर्वी मारामारीच्या घटना घडल्या आहेत. हे सारे जगजाहीर असूनही कोणतीच कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.