शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

कºहाड जेवढं संवेदनशील, तेवढंच सहनशीलही आहे..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 22:49 IST

संजय पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क संवेदनशील शहर म्हणून कºहाड ओळखले जाते; मात्र संवेदनशील असण्याबरोबरच शहर सहनशीलही आहे, असं ...

संजय पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कसंवेदनशील शहर म्हणून कºहाड ओळखले जाते; मात्र संवेदनशील असण्याबरोबरच शहर सहनशीलही आहे, असं पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे सांगतात. गुन्हेगार आणि पोलीस दलाची भूमिका याविषयी त्यांच्याशी साधलेला हा संवाद.प्रश्न : संवेदनशीलतेचा कलंक पुसण्यासाठी पोलीस दलाची भूमिका काय आणि कशी राहील?उत्तर : कºहाडच्या गुन्हेगारीला इतिहास आहे. काही अनपेक्षित घटना येथे घडल्या आहेत. त्यानंतर पोलीस दलाने ठोस उपाययोजनाही केल्या आहेत. सध्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई आम्ही करीत आहोत. त्याचबरोबर सक्रिय टोळ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर मोक्कांतर्गत कारवाई करण्याच्या हालचालीही सुरू आहेत.प्रश्न : कºहाडात कोणत्या प्रकारचे गुन्हे वाढले आहेत?उत्तर : उपविभागात मालमत्तेच्या गुन्ह्यांमध्ये घट झाली आहे. मात्र, शरीराविरुद्धचे गुन्हे काही प्रमाणात वाढले आहेत. मारामारीसारख्या घटनांची गंभीर दखल घेऊन तातडीने कारवाई करण्याच्या सूचना त्या-त्या पोलीस ठाण्यांना दिल्या आहेत. शरीराविरुद्धचा गुन्हा कितीही किरकोळ असला तरी भविष्यात तो गंभीर होऊ शकतो. त्यामुळे अशा गुन्ह्यांवर वेळीच अंकुश ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.प्रश्न : गुन्हेगारीला पोषक ठरणाऱ्या अवैध धंद्यांना चाप लावण्यासाठीच धोरण काय?उत्तर : कºहाड शहरासह उपनगरांचा मोठ्या प्रमाणावर विस्तार झाला आहे. या विभागात प्रत्येक क्षेत्राशी निगडीत नागरिकांचे वास्तव्य आहे. त्यामुळे साहजिकच काही ठिकाणी अवैध व्यवसायांना पोषक असे वातावरण तयार होते. मात्र, अवैध धंद्यांच्या माध्यमातून गुन्हेगारीला आर्थिक रसद मिळू नये, त्याचबरोबरच अवैध व्यवसाय फोफावूच नयेत, यासाठी कडक पावले उचलली जात आहेत. वारंवार त्यासाठी कोम्बिंग, सर्च आॅपरेशन राबविले जात आहे.पालकांमध्ये जनजागृती व्हावीसोशल मीडियाचा गैरवापर हा गुन्हा आहे. आणि किशोरवयीन तसेच युवकांकडून असे गुन्हे सध्या मोठ्या प्रमाणात घडत आहेत. सोशल मीडियाचा गैरवापर रोखण्यासाठी पालकांनी जागृत होणे गरजेचे आहे. आपला पाल्य स्वातंत्र्याचा अतिरेक करतोय का, यावर पालकांनी लक्ष ठेवावे.पोलीसदीदी मैत्रीण बनतेय!युवतींच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी पोलीसदीदी ही संकल्पना राबविण्यात आली होती. महिला पोलिसांचे मोबाईल क्रमांक त्यासाठी महाविद्यालयात दर्शनी भागावर लावले होते. सध्या अनेक युवती या महिला पोलिसांच्या मैत्रिणी बनल्या आहेत.सुसंवाद वाढावाकºहाड उपविभागात कौटुंबिक हिंसाचार आणि मारामारी यासारखे गुन्हे वारंवार घडत आहेत. हे गुन्हे पोलीस रोखू शकत नाहीत. त्यामुळे असे गुन्हे रोखण्यासाठी कुटुंबीयांनीच पुढाकार घेऊन कुटुंबात सुसंवाद वाढवावा. तरच असे गुन्हे कमी होतील.