शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

बोंडारवाडी बंधारा न होता धरणच होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:26 IST

सातारा : ‘जावळी तालुक्याच्या पश्चिम भागातील ५४ गावांचे पिण्याचे पाणी व सिंचनासाठी बोंडारवाडी हा बंधारा न होता धरणच ...

सातारा : ‘जावळी तालुक्याच्या पश्चिम भागातील ५४ गावांचे पिण्याचे पाणी व सिंचनासाठी बोंडारवाडी हा बंधारा न होता धरणच होईल. येथील नागरिकांना हे निश्चितच वरदान ठरणार असून, याद्वारे येथील नागरिकांची पाण्याची गैरसोय दूर होईल,’ अशी ग्वाही आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.

बोंडारवाडी धरणग्रस्त कृती समितीने केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मेढा याठिकाणी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव रांजणे, नगराध्यक्ष पांडुरंग जवळ, उपनगराध्यक्षा कल्पना जवळ, पंचायत समिती सदस्य विजय सुतार, मोहनराव कासुर्डे, रामभाऊ शेलार, बबन बेलोशे, अंकुश बेलोशे, महादेव ओंबळे, बाळासाहेब ओंबळे, हरिभाऊ शेलार,जगन्नाथ चिकणे, संतोष बैलकर, सुनील देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘बोंडारवाडी धरण कृती समितीने आमदार धरण नाही तर बंधारा बांधणार, असा गैरसमज समाजात विनाकारण पसरवला आहे. राजकारण न करता बोंडारवाडी धरण झाले पाहिजे, ही आमची भूमिका आहे. कृती समितीच्या म्हणण्यानुसार धरणाच्या भिंतीला बोंडारवाडी ग्रामस्थांचा विरोध होता. त्यांच्याशी चर्चा करून विरोध दूर करण्यात आला आहे. अकराशे मीटरवर धरणरेषा घेण्याचे त्यांनी मान्य केले असून, त्यामुळे पाणीसाठ्यात काहीही फरक पडणार नाही. यापुढील पन्नास वर्षांची लोकसंख्या व दर माणसी ७५ लीटर पाणी धरूनच सध्याची धरणरेषा वर घेण्यात आली आहे. त्यामुळे कृती समितीने समाजात गैरसमज पसरवू नये व स्वतःचाही गैरसमज करून घेऊ नये. आतापर्यंत धरणाच्या संदर्भात मोकाशी यांच्या नेतृत्वाखालीच काम करून त्यांना सहकार्य केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून धरण नक्की मार्गी लागेल. त्यामुळे कुठलाही गैरसमज करू नये. बोंडारवाडी याठिकाणी धरणच होईल.’

याबाबत येथील ग्रामस्थांना विश्वासात घेऊन चर्चा करून मान्यता घेतली आहे. कृती समितीच्या म्हणण्यानुसार धरण रेषा आहे, त्याच ठिकाणी असण्याला माझा विरोध नाही. धरणात माझी जमीन जाणार नाही किंवा माझं नुकसान होणार नाही. मात्र, बोंडारवाडी ग्रामस्थांचा विरोध धरण कृती समितीने दूर करावा, त्यांच्याशी चर्चा करावी व त्यांचा विरोध थांबवावा.

(चौकट)

धरणामध्ये राजकारणाचा मुद्दा नको...

बोंडारवाडी धरण हा राजकारणाचा मुद्दा होऊ नये, एवढीच माफक माझी इच्छा आहे. कोणत्याही परिस्थितीत धरण व्हावे. धरणाची भिंत कोठे असावी, ही तांत्रिक बाब आहे. मात्र, पिण्यासाठी व सिंचनासाठी जो पाणीसाठा आपल्या वाट्याला आलेला आहे, यात काहीही बदल होत नाही. धरण कृती समितीने केवळ आतापर्यंत फक्त नांदगणे येथीलच बैठकीला मला बोलावले. आमदारांना बोंडारवाडी धरण नको आहे म्हणून केटीवेअर बंधारे बांधत आहेत, असा गैरसमज यांनी समाजात पसरवला होता. असा आरोप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत कृती समितीवर केला.