शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
2
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
3
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
4
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
5
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
6
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
7
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
8
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
9
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
10
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
11
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
12
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
13
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
14
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
15
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
16
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
17
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
18
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
19
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
20
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला

बोंडारवाडी बंधारा न होता धरणच होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:26 IST

सातारा : ‘जावळी तालुक्याच्या पश्चिम भागातील ५४ गावांचे पिण्याचे पाणी व सिंचनासाठी बोंडारवाडी हा बंधारा न होता धरणच ...

सातारा : ‘जावळी तालुक्याच्या पश्चिम भागातील ५४ गावांचे पिण्याचे पाणी व सिंचनासाठी बोंडारवाडी हा बंधारा न होता धरणच होईल. येथील नागरिकांना हे निश्चितच वरदान ठरणार असून, याद्वारे येथील नागरिकांची पाण्याची गैरसोय दूर होईल,’ अशी ग्वाही आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.

बोंडारवाडी धरणग्रस्त कृती समितीने केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मेढा याठिकाणी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव रांजणे, नगराध्यक्ष पांडुरंग जवळ, उपनगराध्यक्षा कल्पना जवळ, पंचायत समिती सदस्य विजय सुतार, मोहनराव कासुर्डे, रामभाऊ शेलार, बबन बेलोशे, अंकुश बेलोशे, महादेव ओंबळे, बाळासाहेब ओंबळे, हरिभाऊ शेलार,जगन्नाथ चिकणे, संतोष बैलकर, सुनील देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘बोंडारवाडी धरण कृती समितीने आमदार धरण नाही तर बंधारा बांधणार, असा गैरसमज समाजात विनाकारण पसरवला आहे. राजकारण न करता बोंडारवाडी धरण झाले पाहिजे, ही आमची भूमिका आहे. कृती समितीच्या म्हणण्यानुसार धरणाच्या भिंतीला बोंडारवाडी ग्रामस्थांचा विरोध होता. त्यांच्याशी चर्चा करून विरोध दूर करण्यात आला आहे. अकराशे मीटरवर धरणरेषा घेण्याचे त्यांनी मान्य केले असून, त्यामुळे पाणीसाठ्यात काहीही फरक पडणार नाही. यापुढील पन्नास वर्षांची लोकसंख्या व दर माणसी ७५ लीटर पाणी धरूनच सध्याची धरणरेषा वर घेण्यात आली आहे. त्यामुळे कृती समितीने समाजात गैरसमज पसरवू नये व स्वतःचाही गैरसमज करून घेऊ नये. आतापर्यंत धरणाच्या संदर्भात मोकाशी यांच्या नेतृत्वाखालीच काम करून त्यांना सहकार्य केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून धरण नक्की मार्गी लागेल. त्यामुळे कुठलाही गैरसमज करू नये. बोंडारवाडी याठिकाणी धरणच होईल.’

याबाबत येथील ग्रामस्थांना विश्वासात घेऊन चर्चा करून मान्यता घेतली आहे. कृती समितीच्या म्हणण्यानुसार धरण रेषा आहे, त्याच ठिकाणी असण्याला माझा विरोध नाही. धरणात माझी जमीन जाणार नाही किंवा माझं नुकसान होणार नाही. मात्र, बोंडारवाडी ग्रामस्थांचा विरोध धरण कृती समितीने दूर करावा, त्यांच्याशी चर्चा करावी व त्यांचा विरोध थांबवावा.

(चौकट)

धरणामध्ये राजकारणाचा मुद्दा नको...

बोंडारवाडी धरण हा राजकारणाचा मुद्दा होऊ नये, एवढीच माफक माझी इच्छा आहे. कोणत्याही परिस्थितीत धरण व्हावे. धरणाची भिंत कोठे असावी, ही तांत्रिक बाब आहे. मात्र, पिण्यासाठी व सिंचनासाठी जो पाणीसाठा आपल्या वाट्याला आलेला आहे, यात काहीही बदल होत नाही. धरण कृती समितीने केवळ आतापर्यंत फक्त नांदगणे येथीलच बैठकीला मला बोलावले. आमदारांना बोंडारवाडी धरण नको आहे म्हणून केटीवेअर बंधारे बांधत आहेत, असा गैरसमज यांनी समाजात पसरवला होता. असा आरोप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत कृती समितीवर केला.