शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
2
Today's Horoscope: आर्थिक लाभ होण्याचा योग; तुमची राशी काय सांगतेय?
3
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
4
बेपर्वाईने गाडी चालवणे आत्ताच थांबवा, मृत्यू झाल्यास नातेवाईकांना इन्शुरन्सचा एकही रुपया मिळणार नाही!
5
स्विमिंगपूलमध्ये पोहून घरी परतताना भीषण अपघात, चार मुलांसह पाच जण ठार!
6
‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी
7
ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल
8
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली
9
मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
10
१.३५ लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव मंजूर; १ लाख रोजगारनिर्मिती होणार
11
वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही
12
त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप
13
लिंगाची पुनर्रचना करून रुग्णाला दिले नवे आयुष्य; नागपुरात मध्य भारतातील पहिल्या शस्त्रक्रियेचा दावा
14
काेराेना लस अन् हृदयविकाराचा संबंध नाही; जीवनशैली, आनुवंशिक दाेष हेच कारणीभूत
15
गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल
16
कल्याणमधील पाणीपुरी विकणाऱ्याच्या मुलाने मारली ‘आयआयटी’पर्यंत मजल; रुरकी येथील आयआयटीत मिळाला प्रवेश
17
पदवी प्रमाणपत्रावर ‘मुंबई’चे स्पेलिंग चुकले; कंत्राटदाराला ठेक्याच्या २०% दंड; मुंबई विद्यापीठाच्या समितीच्या अहवालानंतर कारवाई
18
परिवहन मंत्र्यांनीच पकडली रॅपिडो बाइक टॅक्सी; ॲप नसल्याची परिवहन विभागाकडून खोटी माहिती
19
विदेशी विद्यापीठांचा उपयोग ‘इंडिया’ला होईल की ‘भारता’ला?
20
शशी थरूर, आप खुश तो बहोत होंगे!

कऱ्हाडात शेतकरी संघटनांचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:36 IST

गत दोन महिने दिल्ली येथे कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्याची दखल सरकार घेत नाही. उलट आंदोलकांवर अन्याय, ...

गत दोन महिने दिल्ली येथे कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्याची दखल सरकार घेत नाही. उलट आंदोलकांवर अन्याय, अत्याचार सुरू आहे, असा आरोप शेतकरी संघटनांचा आहे. म्हणूनच विविध शेतकरी संघटनांनी शनिवारी दुपारी बारा वाजता कोल्हापूर नाका येथे रास्ता रोको आंदोलन केले.

यावेळी कॉ. माणिक अवघडे, माणिकराव जाधव, अनिल घराळ, पंजाबराव पाटील, साजीद मुल्ला, अ‍ॅड. समीर देसाई आदींनी उपस्थित शेतकऱ्यांसमोर मनोगत व्यक्त करीत केंद्र सरकारचा खरपूस समाचार घेतला. सरकारने हे कायदे त्वरित मागे घ्यावेत, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला.

आंदोलनात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्वशिला चव्हाण सहभागी झाल्या होत्या. कऱ्हाड- पंढरपूर रस्त्यावर आंदोलकांनी बराच वेळ ठिय्या मांडला होता. पोलिसांनी विनंती करूनही आंदोलक रस्त्यावरून हटत नाहीत, हे लक्षात येताच त्यांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन पोलीस गाडीतून शहर पोलीस ठाण्यात आणले.

दरम्यान, कायदा व सुव्यवस्था चांगली राहावी, यासाठी कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बी. आर. पाटील यांनी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

- कोट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऊस कसा लावतात, त्याला डोळे असतात, किती महिने पीक घ्यावे लागते, शेतकऱ्यांना त्यासाठी काय त्रास होतो, त्याला पैसे किती मिळतात यातील काहीच माहीत नाही. ते कृषी कायदे बदलून चांगले असल्याचे सांगतात. ही बाब दुर्दैवी आहे. शेतकऱ्यांनी स्वत:पुरतेच अन्नधान्य पिकवले तर तुम्ही खाणार काय? त्यामुळे उद्योजकांच्या नव्हे तर शेतकऱ्यांच्या फायद्याचे कायदे आणणे गरजेचे आहे.

- सत्वशिला पृथ्वीराज चव्हाण

- कोट

केंद्र सरकारने कृषी कायद्याबरोबरच कामगार कायद्यातही बदल केले आहेत. हे कायदे शेतकऱ्यांबरोबरच कामगारांच्याही जिवावर उठणारे आहेत. त्यामुळे कामगार कायदेही सरकारने मागे घ्यावेत. अन्यथा शेतकऱ्यांबरोबर कामगारही मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत.

- अनिल घराळ

कामगार नेते

फोटो : ०६केआरडी०५

कॅप्शन : कऱ्हाडच्या कोल्हापूर नाक्यावर शनिवारी शेतकरी संघटनांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.