शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

कऱ्हाडात शेतकरी संघटनांचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:36 IST

गत दोन महिने दिल्ली येथे कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्याची दखल सरकार घेत नाही. उलट आंदोलकांवर अन्याय, ...

गत दोन महिने दिल्ली येथे कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्याची दखल सरकार घेत नाही. उलट आंदोलकांवर अन्याय, अत्याचार सुरू आहे, असा आरोप शेतकरी संघटनांचा आहे. म्हणूनच विविध शेतकरी संघटनांनी शनिवारी दुपारी बारा वाजता कोल्हापूर नाका येथे रास्ता रोको आंदोलन केले.

यावेळी कॉ. माणिक अवघडे, माणिकराव जाधव, अनिल घराळ, पंजाबराव पाटील, साजीद मुल्ला, अ‍ॅड. समीर देसाई आदींनी उपस्थित शेतकऱ्यांसमोर मनोगत व्यक्त करीत केंद्र सरकारचा खरपूस समाचार घेतला. सरकारने हे कायदे त्वरित मागे घ्यावेत, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला.

आंदोलनात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्वशिला चव्हाण सहभागी झाल्या होत्या. कऱ्हाड- पंढरपूर रस्त्यावर आंदोलकांनी बराच वेळ ठिय्या मांडला होता. पोलिसांनी विनंती करूनही आंदोलक रस्त्यावरून हटत नाहीत, हे लक्षात येताच त्यांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन पोलीस गाडीतून शहर पोलीस ठाण्यात आणले.

दरम्यान, कायदा व सुव्यवस्था चांगली राहावी, यासाठी कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बी. आर. पाटील यांनी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

- कोट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऊस कसा लावतात, त्याला डोळे असतात, किती महिने पीक घ्यावे लागते, शेतकऱ्यांना त्यासाठी काय त्रास होतो, त्याला पैसे किती मिळतात यातील काहीच माहीत नाही. ते कृषी कायदे बदलून चांगले असल्याचे सांगतात. ही बाब दुर्दैवी आहे. शेतकऱ्यांनी स्वत:पुरतेच अन्नधान्य पिकवले तर तुम्ही खाणार काय? त्यामुळे उद्योजकांच्या नव्हे तर शेतकऱ्यांच्या फायद्याचे कायदे आणणे गरजेचे आहे.

- सत्वशिला पृथ्वीराज चव्हाण

- कोट

केंद्र सरकारने कृषी कायद्याबरोबरच कामगार कायद्यातही बदल केले आहेत. हे कायदे शेतकऱ्यांबरोबरच कामगारांच्याही जिवावर उठणारे आहेत. त्यामुळे कामगार कायदेही सरकारने मागे घ्यावेत. अन्यथा शेतकऱ्यांबरोबर कामगारही मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत.

- अनिल घराळ

कामगार नेते

फोटो : ०६केआरडी०५

कॅप्शन : कऱ्हाडच्या कोल्हापूर नाक्यावर शनिवारी शेतकरी संघटनांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.