शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

अंध दत्ताच्या भाळी बेघराचं जीणं !

By admin | Updated: December 26, 2016 23:53 IST

घर देता का घर : पळशीतल्या कुटुंबावर नियतीचा आसूड तर लोकांकडूनही अवहेलना

शरद देवकुळे ल्ल पळशी जन्मत:च पूर्णपणे अंध...आई-वडील व बहीण पण अंध...वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी असतानाच पितृछत्र हरपलं... सात वर्षांपूर्वी मातृछत्र पण हरपलं... बहिणीलाही दोन महिन्यांपूर्वी देवाज्ञा... तो बहिणीलाही शेवटचा निरोप देण्यासाठी येऊ शकला नाही! एखाद्या मराठी चित्रपटाचे हे स्क्रिप्ट वाटते, पण हे वास्तव पळशी, माण येथील दत्तात्रय खंडू देवकुळे या अंध तरुणाच्या बाबतीत घडलेली वास्तव कहाणी आहे. दत्तात्रय खंडू देवकुळे याचा जन्म पळशी, ता. माण येथील खंडू देवकुळे व शालन देवकुळे यांच्या पोटी झाला, त्याचे आई-वडील व तो पूर्णपणे अंधच व त्याला असलेली बहीण बाळुताई ही सुध्दा अंधच शिवाय भूमिहीन असलेले हे कुटुंबीय पळशीतील बेघरवस्तीत राहते. तो तीन वर्षांचा असतानाच नियतीने पितृत्व हिरावून घेतले हे कुटुंब पूर्णत: अंध असल्याने रोजगारही करता येत नव्हता. आई-वडिलांच्या पोटी नियतीनेही मुलाला दृष्टी दिली नाही. आई शालन यांनी त्याला कोरेगाव येथील प्रबोधन अंध शाळेत पहिलीसाठी प्रवेश घेतला. मात्र, दुसरीत असताना व तो अवघा सात वर्षांचा असताना नियतीने मातृछत्रही हिरावून घेतले. त्यानंतर त्याची शिक्षणाची घडी विस्कटली. त्यांची बहीण पण अंध खायचे कुठे हा प्रश्न बहीण भावांपुढे उभा राहिला. तेवढं वय पण नव्हतं निर्णय घेण्यासारखं. मात्र, खचून न जाता त्याने तिसरीसाठी पंढरपूर येथील लायन्स क्लब संचलित अंध विद्यालयात प्रवेश घेतला. त्यावेळी त्याची बहीण बाळुताई ही गावात घरोघरी फिरून मागून जीवन जगत होती. दारिद्र्यरेषेखालील यादीत आईचं नाव होतं. आईने सरकार दरबारी उंबरे झिजवूनही काही उपयोग झाला नाही. घराच्या प्रतीक्षेतच आई सात वर्षांपूर्वी जग सोडून गेली त्यानंतर नवीन दारिद्र्यरेषेखालील यादीत बहीण बाळुताई हिचे नाव समाविष्ट करण्यात आले. मात्र, तिनेही स्वत:ला घर असावं म्हणून ग्रामपंचायत व संबंधित कार्यालयाचे उंबरे झिजविले. मात्र, जागा नसल्याने घरकूल बांधायचे कुठे?, अशी अडचण असल्याने गावगाडा चालवणारे नेते कानाडोळा केल्याने तिचे पण स्वप्न अपुरे राहिले. त्याचे घराचे स्वप्न पूर्ण होणार का ?वडिलांच्या मृत्यूनंतर त्याची आई शालन यांचे नाव दारिद्र्यरेषेत होते. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याने बहीण बाळुताई हिचं नाव लागलं, आता तीही मयत झाली. त्या दोघींनी दहा-पंधरा वर्षे प्रयत्न करून ही ग्रामपंचायतीने जागा नाही हे कारण पुढे करून चालढकल केली. राजकारण्यांचेही जाणीवपूर्वक दुर्लक्षचपळशीत अनेक मोठे राजकारणी आहेत हेच राजकारणी एरवी मते द्या म्हणून जोगवा मागतात, मतांपुरतेच अशा अंध असो वा अपंगांना गोंजारतात एकदा मत मिळाले की त्यांच्याकडे वळूनही पाहत नाहीत, लोकांना आश्वासन देऊन सत्ता भोगतात तेच याकडे दुर्लक्ष करीत आहेत.