शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
2
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
3
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
4
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
5
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
6
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
7
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
8
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
9
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
10
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
11
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
12
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
13
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
14
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
15
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
16
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
17
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
18
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
19
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
20
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार

अंध दत्ताच्या भाळी बेघराचं जीणं !

By admin | Updated: December 26, 2016 23:53 IST

घर देता का घर : पळशीतल्या कुटुंबावर नियतीचा आसूड तर लोकांकडूनही अवहेलना

शरद देवकुळे ल्ल पळशी जन्मत:च पूर्णपणे अंध...आई-वडील व बहीण पण अंध...वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी असतानाच पितृछत्र हरपलं... सात वर्षांपूर्वी मातृछत्र पण हरपलं... बहिणीलाही दोन महिन्यांपूर्वी देवाज्ञा... तो बहिणीलाही शेवटचा निरोप देण्यासाठी येऊ शकला नाही! एखाद्या मराठी चित्रपटाचे हे स्क्रिप्ट वाटते, पण हे वास्तव पळशी, माण येथील दत्तात्रय खंडू देवकुळे या अंध तरुणाच्या बाबतीत घडलेली वास्तव कहाणी आहे. दत्तात्रय खंडू देवकुळे याचा जन्म पळशी, ता. माण येथील खंडू देवकुळे व शालन देवकुळे यांच्या पोटी झाला, त्याचे आई-वडील व तो पूर्णपणे अंधच व त्याला असलेली बहीण बाळुताई ही सुध्दा अंधच शिवाय भूमिहीन असलेले हे कुटुंबीय पळशीतील बेघरवस्तीत राहते. तो तीन वर्षांचा असतानाच नियतीने पितृत्व हिरावून घेतले हे कुटुंब पूर्णत: अंध असल्याने रोजगारही करता येत नव्हता. आई-वडिलांच्या पोटी नियतीनेही मुलाला दृष्टी दिली नाही. आई शालन यांनी त्याला कोरेगाव येथील प्रबोधन अंध शाळेत पहिलीसाठी प्रवेश घेतला. मात्र, दुसरीत असताना व तो अवघा सात वर्षांचा असताना नियतीने मातृछत्रही हिरावून घेतले. त्यानंतर त्याची शिक्षणाची घडी विस्कटली. त्यांची बहीण पण अंध खायचे कुठे हा प्रश्न बहीण भावांपुढे उभा राहिला. तेवढं वय पण नव्हतं निर्णय घेण्यासारखं. मात्र, खचून न जाता त्याने तिसरीसाठी पंढरपूर येथील लायन्स क्लब संचलित अंध विद्यालयात प्रवेश घेतला. त्यावेळी त्याची बहीण बाळुताई ही गावात घरोघरी फिरून मागून जीवन जगत होती. दारिद्र्यरेषेखालील यादीत आईचं नाव होतं. आईने सरकार दरबारी उंबरे झिजवूनही काही उपयोग झाला नाही. घराच्या प्रतीक्षेतच आई सात वर्षांपूर्वी जग सोडून गेली त्यानंतर नवीन दारिद्र्यरेषेखालील यादीत बहीण बाळुताई हिचे नाव समाविष्ट करण्यात आले. मात्र, तिनेही स्वत:ला घर असावं म्हणून ग्रामपंचायत व संबंधित कार्यालयाचे उंबरे झिजविले. मात्र, जागा नसल्याने घरकूल बांधायचे कुठे?, अशी अडचण असल्याने गावगाडा चालवणारे नेते कानाडोळा केल्याने तिचे पण स्वप्न अपुरे राहिले. त्याचे घराचे स्वप्न पूर्ण होणार का ?वडिलांच्या मृत्यूनंतर त्याची आई शालन यांचे नाव दारिद्र्यरेषेत होते. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याने बहीण बाळुताई हिचं नाव लागलं, आता तीही मयत झाली. त्या दोघींनी दहा-पंधरा वर्षे प्रयत्न करून ही ग्रामपंचायतीने जागा नाही हे कारण पुढे करून चालढकल केली. राजकारण्यांचेही जाणीवपूर्वक दुर्लक्षचपळशीत अनेक मोठे राजकारणी आहेत हेच राजकारणी एरवी मते द्या म्हणून जोगवा मागतात, मतांपुरतेच अशा अंध असो वा अपंगांना गोंजारतात एकदा मत मिळाले की त्यांच्याकडे वळूनही पाहत नाहीत, लोकांना आश्वासन देऊन सत्ता भोगतात तेच याकडे दुर्लक्ष करीत आहेत.