शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
3
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
4
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
5
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
6
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
7
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
8
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
9
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
10
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
11
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
12
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
13
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
14
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
15
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
16
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
17
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
18
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
19
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
20
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...

काळोशीचा कडा जागीच फोडा

By admin | Updated: January 9, 2016 00:38 IST

सर्वेक्षणानंतर सूचना : शिवाजी महाविद्यालयातील भूगोल विषयाच्या पथकाची भेट

प्रगती जाधव-पाटील--सातारा -जिल्ह्यात स्पष्ट दिसणारी ‘माळीण’ म्हणून उल्लेख करण्यात येत असलेल्या काळोशी या गावावरील कडा जागीच फोडावा, अशी सूचना सर्वेक्षणानंतर करण्यात आली आहे. येथील शिवाजी महाविद्यालयाच्या पथकाने या कड्याची सद्य:स्थिती जाणून घेऊन ही सूचना मांडली आहे.सातारा तालुक्यातील काळोशी हे गाव डोंगराच्या पायथ्याशी वसले आहे. या डोंगराचा काही भाग गेल्या अनेक वर्षांपासून गावावरील संकट बनून उभे राहिले आहे. याविषयी ‘लोकमत’ने वृत्तही प्रसिद्ध केले होते; पण कागदी घोडे नाचविण्याव्यतिरिक्त शासनाकडून काहीच घडले नाही. याविषयी माहिती घेऊन येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेजच्या भूगोल विभागाचे प्राध्यापक आणि विद्यार्थी काळोशी गावात पोहोचले. डोंगराच्या पायथ्याला उभे राहिल्यानंतर आ वासून उभे असलेले निसटलेले कडे पाहून विद्यार्थी, प्राध्यापक अवाक् झाले. भूगोलाचे बी. ए. भाग ३ मधील आठ विद्यार्थी, २५ विद्यार्थिनी आणि प्रा. सुभाष कारंडे व प्रा. हनुमंत सानप यांनी या डोंगरमाथ्यावर जाण्याचा निर्णय घेतला. परस्परांच्या हाताला धरून विद्यार्थ्यांनी डोंगरमाथा गाठला आणि मग तिथून सुरुवात झाली मोजमापे घेण्यास. तीव्र उतारामुळे मोजमापे घेताना तोल जाण्याचे आणि पडण्याचे प्रकारही झाले; पण ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी जखमा सोसून विद्यार्थ्यांनी पाहणी पूर्ण केली. अडीचशे ग्रामस्थांच्या जिवावर कडापरळी खोऱ्यातील काळोशी हे गाव डोंगराच्या अगदी पायथ्याशी आहे. या गावातील अनेक घरांमधील कर्ते पुरुष मुंबईला किंवा साताऱ्यात नोकरीसाठी असतात. त्यामुळे दिवसभर गावात लहान मुलं, वृद्ध आणि महिलाच असतात. सुमारे पाचशे लोकवस्ती असणाऱ्या या गावातील अनेकजण शेती करतात. जोराच्या पावसाने कडे निसटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या कड्यांमध्ये आता झाडे वाढल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे कड्याचा भाग निसटण्याची दाट शक्यता आहे. प्रथमदर्शनी हा कडा जागीच फोडावा, काही ठिकाणी संरक्षण जाळी बसवावी आणि मोठ्या बुंध्यांच्या झाडांची लागवड करावी, असे उपाय सुचविण्यात आले आहेत. भयावह कड्याची वास्तविकतायेथील कड्याची उंची आणि रुंदी दहा मीटर आहे, तर त्याची लांबी ४० मीटर आहे. जर हा कडा निसटला तर २३० मीटर उंचीच्या उतारावरून अवघ्या गावाला भुईसपाट करून मगच हा कडा विसावेल, अशी भीती अभ्यासकांनीही व्यक्त केली आहे. हा कडा अडवून ठेवायला कोणताच अडथळा येथे नसल्याने कड्याची भयावह स्थिती अंगावर शहारे आणणारी अशीच आहे.अहवाल पोहोचणार शासनदरबारी शासकीय यंत्रणांनी जबाबदारी झटकली असली तरी महाविद्यालयाच्या युवकांनी प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर आणि भूगोल विभागप्रमुख डॉ. एस. बी. झोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली कड्याची पाहणी केली. पाहणीचा सविस्तर अहवाल लवकरच जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, आपत्ती व्यवस्थापन या शासकीय विभागांसह ग्रामस्थांनाही देण्यात येणार आहे.