शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

काळोशीचा कडा जागीच फोडा

By admin | Updated: January 9, 2016 00:38 IST

सर्वेक्षणानंतर सूचना : शिवाजी महाविद्यालयातील भूगोल विषयाच्या पथकाची भेट

प्रगती जाधव-पाटील--सातारा -जिल्ह्यात स्पष्ट दिसणारी ‘माळीण’ म्हणून उल्लेख करण्यात येत असलेल्या काळोशी या गावावरील कडा जागीच फोडावा, अशी सूचना सर्वेक्षणानंतर करण्यात आली आहे. येथील शिवाजी महाविद्यालयाच्या पथकाने या कड्याची सद्य:स्थिती जाणून घेऊन ही सूचना मांडली आहे.सातारा तालुक्यातील काळोशी हे गाव डोंगराच्या पायथ्याशी वसले आहे. या डोंगराचा काही भाग गेल्या अनेक वर्षांपासून गावावरील संकट बनून उभे राहिले आहे. याविषयी ‘लोकमत’ने वृत्तही प्रसिद्ध केले होते; पण कागदी घोडे नाचविण्याव्यतिरिक्त शासनाकडून काहीच घडले नाही. याविषयी माहिती घेऊन येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेजच्या भूगोल विभागाचे प्राध्यापक आणि विद्यार्थी काळोशी गावात पोहोचले. डोंगराच्या पायथ्याला उभे राहिल्यानंतर आ वासून उभे असलेले निसटलेले कडे पाहून विद्यार्थी, प्राध्यापक अवाक् झाले. भूगोलाचे बी. ए. भाग ३ मधील आठ विद्यार्थी, २५ विद्यार्थिनी आणि प्रा. सुभाष कारंडे व प्रा. हनुमंत सानप यांनी या डोंगरमाथ्यावर जाण्याचा निर्णय घेतला. परस्परांच्या हाताला धरून विद्यार्थ्यांनी डोंगरमाथा गाठला आणि मग तिथून सुरुवात झाली मोजमापे घेण्यास. तीव्र उतारामुळे मोजमापे घेताना तोल जाण्याचे आणि पडण्याचे प्रकारही झाले; पण ग्रामस्थांच्या सुरक्षिततेसाठी जखमा सोसून विद्यार्थ्यांनी पाहणी पूर्ण केली. अडीचशे ग्रामस्थांच्या जिवावर कडापरळी खोऱ्यातील काळोशी हे गाव डोंगराच्या अगदी पायथ्याशी आहे. या गावातील अनेक घरांमधील कर्ते पुरुष मुंबईला किंवा साताऱ्यात नोकरीसाठी असतात. त्यामुळे दिवसभर गावात लहान मुलं, वृद्ध आणि महिलाच असतात. सुमारे पाचशे लोकवस्ती असणाऱ्या या गावातील अनेकजण शेती करतात. जोराच्या पावसाने कडे निसटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या कड्यांमध्ये आता झाडे वाढल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे कड्याचा भाग निसटण्याची दाट शक्यता आहे. प्रथमदर्शनी हा कडा जागीच फोडावा, काही ठिकाणी संरक्षण जाळी बसवावी आणि मोठ्या बुंध्यांच्या झाडांची लागवड करावी, असे उपाय सुचविण्यात आले आहेत. भयावह कड्याची वास्तविकतायेथील कड्याची उंची आणि रुंदी दहा मीटर आहे, तर त्याची लांबी ४० मीटर आहे. जर हा कडा निसटला तर २३० मीटर उंचीच्या उतारावरून अवघ्या गावाला भुईसपाट करून मगच हा कडा विसावेल, अशी भीती अभ्यासकांनीही व्यक्त केली आहे. हा कडा अडवून ठेवायला कोणताच अडथळा येथे नसल्याने कड्याची भयावह स्थिती अंगावर शहारे आणणारी अशीच आहे.अहवाल पोहोचणार शासनदरबारी शासकीय यंत्रणांनी जबाबदारी झटकली असली तरी महाविद्यालयाच्या युवकांनी प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर आणि भूगोल विभागप्रमुख डॉ. एस. बी. झोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली कड्याची पाहणी केली. पाहणीचा सविस्तर अहवाल लवकरच जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, आपत्ती व्यवस्थापन या शासकीय विभागांसह ग्रामस्थांनाही देण्यात येणार आहे.