शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

भाजपची वाटचाल हुकूमशाहीकडे : प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 13:32 IST

भाजपची सध्या लोकशाही संपवून हुकूमशाहीकडे वाटचाल चालू आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे केंद्र्रीय अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी केली.

ठळक मुद्देभाजपची वाटचाल हुकूमशाहीकडे : प्रकाश आंबेडकर विरोधात जाणाऱ्याच्या मागे चौकशीचा ससेमिरा

कऱ्हाड : भाजपकडून पक्षांसह त्यांच्या नेत्यांवर चौकशीची टांगती तलवार ठेवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखा माणूस तिहार जेलची क्षमता वाढवल्याचे सांगतात. याचा अर्थ आम्ही आवाज उठवला, चुका दाखवल्या, जनतेची बाजू घेऊन कोणी बोलले तर त्यांना जेलमध्ये टाकू, असाच आहे. त्यामुळे भाजपची सध्या लोकशाही संपवून हुकूमशाहीकडे वाटचाल चालू आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे केंद्र्रीय अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी केली.कऱ्हाड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष प्रमोद क्षीरसागर, उपाध्यक्ष बाळासाहेब माळी, संघटक बाळकृष्ण देसाई, महेशकुमार कचरे, भालचंद्र माळी, सचिन करांडे, अ‍ॅड. विश्वास मोहिते, पंचायत समितीचे माजी सदस्य अनिल सावंत आदी उपस्थित होते.डॉ. आंबेडकर म्हणाले, आज देशात खूप भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. देश प्रचंड मंदीतून चालला आहे. अगोदरच कापसाला भाव न मिळाल्याने शेतकरी आत्महत्या करू लागले आहेत. कापसानंतर आता सरकार ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या पाठीमागे लागला आहे. अनेक मोठ्या कंपन्या आपले कर्मचारी कामावरून कमी करू लागले आहेत.

आज देशात भाजप सरकार विरोधात सत्तेत विरोधी पक्ष उरलेला नाही. जे पक्ष विरोधात आहेत काँग्रेस व राष्ट्रवादी त्यांच्यातील लोकांपुढे भाजपने दोन पर्याय ठेवले आहेत. एक म्हणजे देशात आमची सत्ता येऊ द्या आणि दुसरा तिहार जेल तुमच्यासाठी खुले आहे.ह्णकाँग्रेसला दीड पायाचा पॅरालेसिस झालायआम्ही काँग्रेस व राष्ट्रवादीला निवडणुकीतील जागाबाबत बोलणी केली होती. मात्र ते आमच्याशी युती करायला तयार नसल्याचे दिसतात. त्यामुळे आम्ही आता या दोन्ही पक्षांबरोबर न जाण्याचा निर्णय घेतला आहे. आज काँग्रेस व राष्ट्रवादीतील काहीजण पक्ष सोडून जात आहेत. त्यामुळे सध्या काँग्रेसला दीड पायाचा पॅरालेसिस झाला असल्याची टीका डॉ. आंबेडकर यांनी केली.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरSatara areaसातारा परिसर