शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

भाजपची वाटचाल हुकूमशाहीकडे : प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 13:32 IST

भाजपची सध्या लोकशाही संपवून हुकूमशाहीकडे वाटचाल चालू आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे केंद्र्रीय अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी केली.

ठळक मुद्देभाजपची वाटचाल हुकूमशाहीकडे : प्रकाश आंबेडकर विरोधात जाणाऱ्याच्या मागे चौकशीचा ससेमिरा

कऱ्हाड : भाजपकडून पक्षांसह त्यांच्या नेत्यांवर चौकशीची टांगती तलवार ठेवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखा माणूस तिहार जेलची क्षमता वाढवल्याचे सांगतात. याचा अर्थ आम्ही आवाज उठवला, चुका दाखवल्या, जनतेची बाजू घेऊन कोणी बोलले तर त्यांना जेलमध्ये टाकू, असाच आहे. त्यामुळे भाजपची सध्या लोकशाही संपवून हुकूमशाहीकडे वाटचाल चालू आहे, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे केंद्र्रीय अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी केली.कऱ्हाड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष प्रमोद क्षीरसागर, उपाध्यक्ष बाळासाहेब माळी, संघटक बाळकृष्ण देसाई, महेशकुमार कचरे, भालचंद्र माळी, सचिन करांडे, अ‍ॅड. विश्वास मोहिते, पंचायत समितीचे माजी सदस्य अनिल सावंत आदी उपस्थित होते.डॉ. आंबेडकर म्हणाले, आज देशात खूप भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. देश प्रचंड मंदीतून चालला आहे. अगोदरच कापसाला भाव न मिळाल्याने शेतकरी आत्महत्या करू लागले आहेत. कापसानंतर आता सरकार ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या पाठीमागे लागला आहे. अनेक मोठ्या कंपन्या आपले कर्मचारी कामावरून कमी करू लागले आहेत.

आज देशात भाजप सरकार विरोधात सत्तेत विरोधी पक्ष उरलेला नाही. जे पक्ष विरोधात आहेत काँग्रेस व राष्ट्रवादी त्यांच्यातील लोकांपुढे भाजपने दोन पर्याय ठेवले आहेत. एक म्हणजे देशात आमची सत्ता येऊ द्या आणि दुसरा तिहार जेल तुमच्यासाठी खुले आहे.ह्णकाँग्रेसला दीड पायाचा पॅरालेसिस झालायआम्ही काँग्रेस व राष्ट्रवादीला निवडणुकीतील जागाबाबत बोलणी केली होती. मात्र ते आमच्याशी युती करायला तयार नसल्याचे दिसतात. त्यामुळे आम्ही आता या दोन्ही पक्षांबरोबर न जाण्याचा निर्णय घेतला आहे. आज काँग्रेस व राष्ट्रवादीतील काहीजण पक्ष सोडून जात आहेत. त्यामुळे सध्या काँग्रेसला दीड पायाचा पॅरालेसिस झाला असल्याची टीका डॉ. आंबेडकर यांनी केली.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरSatara areaसातारा परिसर