शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाख मोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
3
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
4
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
5
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
6
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
7
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ
8
क्या बात! रितेश देशमुखच्या आईसाहेबांनी बल्बच्या प्रकाशात घेतलं ड्रॅगन फ्रूटचं पीक; सूनबाईंना कौतुक, शेअर केला व्हिडीओ
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
Viral Video : नवी नवरी सोबत बॉयफ्रेंडलाही घेऊन आली; सासरच्या घरात कुठे लपवला व्हिडीओ बघाच
11
...तर १ जानेवारी २०२६ पासून तुमचं पॅन बंद होईल; बँक व्यवहारांसह सर्व महत्त्वाची कामं अडकतील
12
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
13
Claudia Sheinbaum: सुरक्षा भेदून क्लाउडिया शीनबामपर्यंत पोहोचला; भररस्त्यात स्पर्श आणि चुंबनाचा प्रयत्न!
14
भाजीवाल्याने मित्राकडून पैसे उधार घेतले अन् जिंकले ११ कोटी; आता देणार मोठं 'थँक यू' गिफ्ट
15
Numerology: अंकशास्त्रानुसार आपल्यासाठी कोणत्या जन्मतारखेची व्यक्ती परफेक्ट जोडीदार असते?
16
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
17
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
18
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
19
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
20
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?

भाजपने शेतकºयांना देशोधडीला लावले : संजीवराजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 23:14 IST

फलटण : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयावर भाजप सरकार विरोधात बुधवारी येथे हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. तहसील कार्यालयाबाहेर आंदोलकांनी भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करून मनमानी कारभाराचा निषेध व्यक्त केला.राष्ट्रवादी काँग्रेस फलटण शहर व तालुक्याच्या वतीने जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर आणि आमदार दीपक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या विरोधात हल्लाबोल ...

फलटण : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयावर भाजप सरकार विरोधात बुधवारी येथे हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. तहसील कार्यालयाबाहेर आंदोलकांनी भाजप सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करून मनमानी कारभाराचा निषेध व्यक्त केला.राष्ट्रवादी काँग्रेस फलटण शहर व तालुक्याच्या वतीने जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर आणि आमदार दीपक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या विरोधात हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.‘राज्यात भाजप सरकारकडून फक्त आश्वासनाची खैरात सुरू असून, शेतकरी देशोधडीला लागलेला असून, आश्वासनाची नुसती खैरात भाजप सरकार करीत आहे. शेतकºयांना कर्जमाफीच्या नावाखाली झुलवून ठेवण्यात आले आहे.संपूर्ण कर्जमाफी न करता शेतकºयांना नियम व अटी एवढ्या लावलेत की, कोणालाही या कर्जमाफीचा फायदा होत नाही. फडणवीस सरकारने शेतकºयांची फसवणूक केल्याचा आरोप संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी केला. जनतेच्या आणि शेतकºयांच्या प्रश्नावर सरकार काहीच काम करीत नसल्याचेही त्यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले.‘शेतकºयांना नवीन कृषिपंपचे वीज कनेक्शन देणे गेल्या तीन वर्षांत भाजप सरकारला जमले नसून भरमसाठ लाईट बिलामुळे जनता अडचणीत आली आहे, असा आरोप आमदार दीपक चव्हाण यांनी केला. राज्याला कर्जाच्या खाईत लोटणाºया भाजप सरकारला सत्तेवर बसण्याचा अधिकार नसल्याचे त्यांनी स्पष्ट करून यापुढेही सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.‘भाजप सर्वच पातळीवर अपयशी ठरले असून वीज, आरोग्य, रस्ते, पाणी या मूलभूत सुविधा देणे त्यांना जमलेले नाही. शेतकºयांच्या आत्महत्या वाढल्या असून, भाजप सरकारने राजीनामा देण्याची मागणी सुभाष शिंदे यांनी केली.यावेळी विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार विजय पाटील यांना देण्यात आले.या मोर्चात नगराध्यक्षा नीता नेवसे, सभापती रेश्मा भोसले, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विलासराव नलावडे, शहराध्यक्ष मिलिंद नेवसे, श्रीराम कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, भीमदेव बुरुंगले व सर्व नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.कमी कार्यकर्ते आल्याने आंदोलन दोन तास उशिरा..या हल्लाबोल मोर्चाचे बुधवारी सकाळी नऊ वाजता आयोजन करण्यात आले होते. मात्र, हे आंदोलन कमी कार्यकर्त्यांमुळे दीड तास उशिरा झाले. तालुक्यात सर्व सत्तास्थाने राष्ट्रवादीच्या ताब्यात असूनही कार्यकर्ते कमी आल्याने भाषणात संजीवराजे नाईक-निंबाळकर आणि सुभाष शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :Strikeसंप