शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रहिमतपूर बसस्थानकात वाढदिवसाची हुल्लडबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 23:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्करहितमपूर : येथील बसस्थानकात सोमवारी एसटीच्या सर्व फेºया सुरळीत सुरू होत्या. प्रवाशांची एसटीसाठी पळापळ सुरू असतानाच अचानक युवकांची आरडाओरड सुरू झाली. दुचाकीवर ठेवलेला केक कापून वाढदिवस साजरा केला गेला. अन् हा आनंद साजरा करण्यासाठी फटाकेही फोडण्यात आले. अचानक प्रकार घडल्याने प्रवाशांची एकच पळापळ झाली.रहिमतपूर येथे परिसरातील सुमारे वीस ...

लोकमत न्यूज नेटवर्करहितमपूर : येथील बसस्थानकात सोमवारी एसटीच्या सर्व फेºया सुरळीत सुरू होत्या. प्रवाशांची एसटीसाठी पळापळ सुरू असतानाच अचानक युवकांची आरडाओरड सुरू झाली. दुचाकीवर ठेवलेला केक कापून वाढदिवस साजरा केला गेला. अन् हा आनंद साजरा करण्यासाठी फटाकेही फोडण्यात आले. अचानक प्रकार घडल्याने प्रवाशांची एकच पळापळ झाली.रहिमतपूर येथे परिसरातील सुमारे वीस गावांतील युवक-युवती महाविद्यालयीन शिक्षणासाठी येतात. अकरावी, बारावीचे महाविद्यालय सुटल्यानंतर बसस्थानकात मोठी गर्दी होत असते. नेहमीप्रमाणेच सोमवारीही सकाळी साडेअकराच्या सुमारास बसस्थानकात एसटी चालक, वाहक, वाहतूक नियंत्रण कक्ष अन् प्रवाशांची धांदल सुरू होती.अशातच काही युवकांनी बसस्थानकात फलाटावर एसटी उभी राहत असलेल्या ठिकाणी व वाहतूक नियंत्रण कक्षासमोरच दुचाकी आणून उभी केली. समोरच युवतींची मोठी गर्दी होती. काही युवकांनी तत्काळ दुचाकीवर केक ठेवला. काहींनी लगेच तेथे फटाक्यांची आतषबाजी केली.जमावाने आरडाओरड करत एका युवकाच्या तोंडाला केक फासत वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी बसस्थानकात ये-जा करणाºया प्रवाशांची दैना उडाली. अचानक फटाके फुटू लागल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक प्रवासी सैरावैरा धावू लागले. परंतु, आपल्याच धुंदीत असलेल्या युवकांची सुमारे पंधरा मिनिटे हुल्लडबाजी सुरू होती. त्यामुळे प्रवाशांची एकच पळापळ सुरूझाली.बसस्थानकात एसटीची वाट पाहत थांबलेले प्रवासी हे दृष्य पाहून अस्वस्थ होत होते. काही वेळात युवकांनी तेथून पळ काढला. आपण कुठेही काहीही करू शकतो, हे दाखविण्यासाठीच तरुणांनी वाढदिवस साजरा केल्याची चर्चा बसस्थानक व महाविद्यालय परिसरात सुरू होती.दंगामस्ती अन् बसस्थानक बदनामरहिमतपूर बसस्थानकात हाणामारी, दंगामस्तीच्या घटना वारंवार घडत आहेत. आता तर वाढदिवसही साजरे होऊ लागले आहेत. हुल्लडबाजीच्या वाढत्या घटनांमुळे बसस्थानक बदनाम होत आहे. हुल्लडबाज युवकांना वेळीच रोखले नाही तर भविष्यात अनेक महाविद्यालयीन तरुणांचे वाढदिवस बसस्थानकात साजरे होतील. हा पायंडा पडू नये, प्रवाशांची सुरक्षा अबाधित राहावी, यासाठी पोलिसांनी पोलिस बंदोबस्त वाढवावा, अशी मागणी होत आहे.