शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
4
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
7
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
9
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
10
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
11
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
12
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
13
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
14
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
15
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
16
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
17
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
18
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
19
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
20
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली

जिल्ह्यातील बर्ड फ्लू नियंत्रणात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:09 IST

सातारा : जिल्ह्यातील मरिआईचीवाडीवगळता इतर सर्व ठिकाणच्या मृत कोंबड्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे, तर चार दिवसांत कोठेही मृत कोंबड्यांची ...

सातारा : जिल्ह्यातील मरिआईचीवाडीवगळता इतर सर्व ठिकाणच्या मृत कोंबड्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे, तर चार दिवसांत कोठेही मृत कोंबड्यांची नोंद झाली नसल्याने जिल्ह्यातील बर्ड फ्लू नियंत्रणात आला आहे. त्याचबरोबर मरिआईचीवाडीतील बाधित क्षेत्र परिसरात पशुसंवर्धन विभागाकडून सर्वेक्षण सुरूच आहे.

बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आतापर्यंत माण तालुक्यातील दोन गावांत, तर खंडाळा आणि कऱ्हाड तालुक्यातील प्रत्येकी एका गावांत मृत कोंबड्या आढळून आल्या होत्या. यामधील खंडाळा तालुक्यातील मरिआईचीवाडीमधील कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूने झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले होते. कऱ्हाड तालुक्यातील हणबरवाडी आणि माणमधील हिंगणी व बिदालमधील मृत कोंबड्यांचा अहवाल निगेटिव्ह आला होता.

खटाव तालुक्यातील कटगुणमध्येही काही कोंबड्या मृत्युमुखी पडल्याचे दिसून आले होते तसेच त्यांच्या अंगावर व्रणही होते. त्यामुळे मुंगसाच्या हल्ल्यात या कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत होते. येथील मृत कोंबड्यांचा बर्ड फ्लूचा अहवालही निगेटिव्ह आला आहे. तसेच कुडाळमधील मृत कोंबड्यांचाही अहवाल निगेटिव्ह आला आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील शिरवळ, भिलार, मलवडी आणि तडवळेमधील मृत कावळ्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. मागील काही दिवसांपासून या अहवालांची प्रतीक्षा आहे.

चौकट :

तीन महिने सर्वेक्षण सुरू राहणार...

जिल्ह्यातील मरिआईचीवाडीवगळता इतर तालुक्यांतील मृत कोंबड्यांचा बर्ड फ्लू अहवाल निगेटिव्ह आल्याने पोल्ट्रीधारकांतील भीतीचे वातावरण कमी झालेले आहे. असे असलेतरी मरिआईचीवाडी येथे बर्ड फ्लूने कोंबड्या मृत्युमुखी पडल्या होत्या. तेथील तीन किलोमीटर परिसरात पशुसंवर्धन विभागाकडून सर्वेक्षण सुरूच आहे. दर १५ दिवसांनी अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. तीन महिने सर्वेक्षण करण्यात येणार आहे.