शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

जिल्ह्यातील बर्ड फ्लू नियंत्रणात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:09 IST

सातारा : जिल्ह्यातील मरिआईचीवाडीवगळता इतर सर्व ठिकाणच्या मृत कोंबड्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे, तर चार दिवसांत कोठेही मृत कोंबड्यांची ...

सातारा : जिल्ह्यातील मरिआईचीवाडीवगळता इतर सर्व ठिकाणच्या मृत कोंबड्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे, तर चार दिवसांत कोठेही मृत कोंबड्यांची नोंद झाली नसल्याने जिल्ह्यातील बर्ड फ्लू नियंत्रणात आला आहे. त्याचबरोबर मरिआईचीवाडीतील बाधित क्षेत्र परिसरात पशुसंवर्धन विभागाकडून सर्वेक्षण सुरूच आहे.

बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आतापर्यंत माण तालुक्यातील दोन गावांत, तर खंडाळा आणि कऱ्हाड तालुक्यातील प्रत्येकी एका गावांत मृत कोंबड्या आढळून आल्या होत्या. यामधील खंडाळा तालुक्यातील मरिआईचीवाडीमधील कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूने झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले होते. कऱ्हाड तालुक्यातील हणबरवाडी आणि माणमधील हिंगणी व बिदालमधील मृत कोंबड्यांचा अहवाल निगेटिव्ह आला होता.

खटाव तालुक्यातील कटगुणमध्येही काही कोंबड्या मृत्युमुखी पडल्याचे दिसून आले होते तसेच त्यांच्या अंगावर व्रणही होते. त्यामुळे मुंगसाच्या हल्ल्यात या कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत होते. येथील मृत कोंबड्यांचा बर्ड फ्लूचा अहवालही निगेटिव्ह आला आहे. तसेच कुडाळमधील मृत कोंबड्यांचाही अहवाल निगेटिव्ह आला आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील शिरवळ, भिलार, मलवडी आणि तडवळेमधील मृत कावळ्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. मागील काही दिवसांपासून या अहवालांची प्रतीक्षा आहे.

चौकट :

तीन महिने सर्वेक्षण सुरू राहणार...

जिल्ह्यातील मरिआईचीवाडीवगळता इतर तालुक्यांतील मृत कोंबड्यांचा बर्ड फ्लू अहवाल निगेटिव्ह आल्याने पोल्ट्रीधारकांतील भीतीचे वातावरण कमी झालेले आहे. असे असलेतरी मरिआईचीवाडी येथे बर्ड फ्लूने कोंबड्या मृत्युमुखी पडल्या होत्या. तेथील तीन किलोमीटर परिसरात पशुसंवर्धन विभागाकडून सर्वेक्षण सुरूच आहे. दर १५ दिवसांनी अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. तीन महिने सर्वेक्षण करण्यात येणार आहे.