शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

मोठ्या राजेंचं ‘पोट’ छोट्या राजेंचं ‘वजन’

By admin | Updated: November 11, 2014 23:19 IST

सुपरहिट--साताऱ्यातलं बेकायदेशीर बांधकाम हटवलं जातंय.’

पृथ्वीतलावरील सातारानगरीत काहीतरी अघटीत घडतंय, याची कुणकूण स्वर्गलोकी लागली. तत्काळ इंद्रदरबारात नारदमुनींना बोलावून घेण्यात आलं. वीणा वाजवत मुनी दाखल होताच देवाधिराजांनी विचारलं, ‘साताऱ्यात म्हणे कसलातरी खणखणाट होतोय. काय प्रकार आहे हा मुनीजी?’ अंतचक्षूसमोर ‘बापटांच्या हातातला हातोडा’ आणत नारद उत्तरले, ‘महाराऽऽज... साताऱ्यातलं बेकायदेशीर बांधकाम हटवलं जातंय.’ आश्चर्यचकीत होऊन देवाधिराजांनी पुन्हा विचारलं, ‘पण त्यासाठी दगडांचा वापर का? तेव्हा जरा तुम्ही समक्ष तिथं जाऊन या. प्रत्यक्ष घटना पाहून नंतर आम्हाला हालहवाल सांगा.’मग काय... मुनी ‘थेट’ सातारनगरीत दाखल जाहले. इथलं राजकीय वातावरण तंग होतं. (अधूनमधून असतं म्हणे!) सर्वसामान्य सातारकरही चिडीचूप होते. (ते तर नेहमीच असतात म्हणे!) वाटेत ‘भोसल्यांचे राजू’ भेटले. त्यांच्या पुढं दोन-चार डंपर अन् मागं पाच-सहा जेसीबी. ‘एवढा लवाजमा कशासाठी?’ असा सवाल मुनींनी करताच ‘बारा-तेरा’ नंबर गाडीतून उतरत राजू उत्तरले, ‘दगडाखालचा हात काढायचा होता बाबाराजेंचा. हुश्श्ऽऽ कसातरी काढला बुवा यंदा.’‘आता नेमका कोणत्या दगडाखाली हात अडकला होता?’ हा प्रश्न विचारावा म्हणून नारदांनी ‘कदमांच्या अवी’ला गाठलं. पण ते साताऱ्यात आणलेली सर्वात पहिली ‘डस्टर’ लोकांना दाखविण्यातच दंग झालेले. जावळीतले सभापतीही ‘सुहास’वदनानं ‘सातबारा’वर बाबा गटाचं नाव चढविण्यात रमलेले. (कधीकाळी गिरींचे हेच हात म्हणे शशिकांतरावांसाठी शिक्के मारण्यात मग्न असायचे. काळाचा महिमा. दुसरं काय?) ‘साताऱ्यात सारं नवलच घडतं!’ असं मनातल्या मनात म्हणत मुनी पुढं सरकले. पुढच्या चौकात ‘गळ्यात स्टेथोस्कोप’ घातलेले ‘सुरेश’राव भेटले. ‘काय डॉक्टरसाहेब.. सिव्हिल सोडून एस.पी. आॅफीसकडं का चाललात?’ या प्रश्नावर जगदाळे नेहमीप्रमाणं खळखळून हसले; परंतु त्यांच्या नजरेत ‘मोठ्या राजें’च्या तब्येतीविषयीची काळजी स्पष्टपणे जाणवत होती. मुनींनी खोचकपणे विचारलं, ‘काय झालं? गाडी हायवेवर पुन्हा कुठं धडकली की काय?’ डॉक्टर चपापले. ‘अंधारातल्या गोष्टी साताऱ्यात एवढ्या फटाफट कशा काय कर्णोपकर्णी पसरतात?’ असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला. ‘आज महाराज उपोषणाला बसलेत नां, म्हणून तिकडं चाललोय.’ डॉक्टरांनी माहिती देताच मुनी दचकले. ‘आता हे काय नवीन खूळ?’ या प्रश्नावर डॉक्टरांनी काहीच उत्तर दिलं नाही. कारण ‘महाराजांच्या मनाचा ठाव जिथं भल्या-भल्यांना लागला नाही, तिथं आपण बापुडे कोण?’ हे त्यांना पुरतं ठावूक होतं. एवढ्यात समोरून बनकरांसोबत ‘दामले’ आले. त्यांच्या पाठीवर भलं मोठ्ठं गाठोडं होतं. त्यात वेगवेगळ्या रंगाचे ‘हेल्मेट’ दिसत होते. ‘पालिकेची नोकरी सोडून आता शिरस्त्राण विकायचा बिझनेस सुरू केलाय की काय अरविंदा?’ असं मुनींनी विचारताच दामले कसंनुसं हसले. ‘दोन्ही ठिकाणी तारेवरची कसरत’ करायची सवयच लागल्यानं त्यांनी नेहमीप्रमाणं वेळ मारून नेली. ‘सुरुचीवरनं दगडं पडली तर जलमंदिरवर सुरक्षा हवी ना!’ असं सांगून ते हळूच पुढं सरकले. ‘भलेही छोट्या राजेंनी दगडफेक करायची ठरवलं तरी त्यांना दगडं आणून देणार कोण?’ असा गहन प्रश्न नारदमुनींना पडला; कारण त्यांचे बरेच कार्यकर्ते आजकाल ‘आपापल्या कामात’ गुंतलेले. छोट्या राजेंच्याच जीवावर मोठे झालेले; पण आता स्वत:तच मश्गुल बनलेले. नारदमुनी विचार करत-करत डॉक्टर अन् बनकरांसोबत उपोषणस्थळाकडं निघाले. ‘पण काय हो डॉक्टर... एक दिवसाच्या उपोषणानं महाराजांचं वजन किती कमी होणारंय?’ डॉक्टरांऐवजी दत्तोबांनीच मिस्किलपणे उत्तर दिलं, ‘उलट वजन वाढणारंय. गेले एक महिनाभर छोट्या राजेंनी गुंडगिरीविरुध्द आवाज उठविला होता नां. तेव्हा त्यांचं ‘वजन’ कमी करण्यासाठी हा प्लॅन ठरलाय. म्हणूनच आज एक दिवस आम्ही स्वत:च्या पोटाला मारायचं ठरवलंय. आलं का लक्षात?’सचिन जवळकोटे