शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

धोमच्या डाव्या कालव्याला वाई तालुक्यातील पांडे येथे भगदाड 

By दीपक शिंदे | Updated: December 16, 2023 11:00 IST

दोन बैलांचा शोध सुरू असून बारा बैल वाचवण्यात यश आले आहे.

दीपक शिंदे, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा: वाई तालुक्यातील धोम धरणाचा डावा कालवा पांडे गावच्या हद्दीत शनिवारी मध्यरात्री तीनच्या सुमारास फुटला. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी ओझर्डे गावच्या चंद्रभागा ओढ्यात शिरले. ओढ्याला पुराचे स्वरूप आले असून यात झोपेत असलेल्या ऊसतोड मजुरांचा संसार वाहून गेला आहे. दोन बैलांचा शोध सुरू असून बारा बैल वाचवण्यात यश आले आहे. 

घटनेची माहिती मिळताच वाईचे प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, भुईंजचे सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे पहाटे चार वाजता घटनास्थळी पोहोचले. ऊसतोड मजुरांना सुरक्षित स्थळी हलवले आहे.

सातारा जिल्ह्यात यंदा पाऊस कमी झाल्याने खटाव, माणसह जिल्ह्यातील जनता पाणी पाणी करू लागली आहे. दुष्काळी भागातील जनतेची तहान भागवण्यासाठी वाई तालुक्यातील धोम धरणातून कालव्याद्वारे पाणी सोडले गेले आहे. त्याच कालव्याला पांडे गावच्या हद्दीत शनिवारी मध्यरात्री तीन वाजता भगदाड पडले. पाण्याचा प्रवाह एवढा मोठा होता की कालव्यातील पाणी शेतातून थेट चंद्रभागा ओढ्याच्या पात्रात घुसले. शेतीचे नुकसान करत हे पाणी ओढ्यात घुसले. दिवसभर ऊस तोड करून झोपलेल्या ऊसतोड मुजरांच्या दीडशे झोपडयात पाणी शिरले. त्यांचे संसार उपयोगी साहित्य वाहून गेले. दोन बैल बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर