शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

‘माझं सरकार’ म्हणणारा लाभार्थी राष्टÑवादीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 23:47 IST

खटाव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय टिष्ट्वटरवर ‘मी लाभार्थी’ म्हणून सरकारचं कौतुक करणाºया भोसरेच्या नितीन जाधवांनी प्रत्यक्षात मात्र शासनाच्या भूमिकेवर नाराजी च व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, संबंधित जाधव राष्टÑवादी पक्षाचे कार्यकर्ते असून जिल्हा परिषदेतील विद्यमान समाजकल्याण सभापती शिवाजी सर्वगौड यांचा जोरदार प्रचारही केला होता.सातारा जिल्ह्यातील दोन ग्रामस्थांची मुलाखत ...

खटाव : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय टिष्ट्वटरवर ‘मी लाभार्थी’ म्हणून सरकारचं कौतुक करणाºया भोसरेच्या नितीन जाधवांनी प्रत्यक्षात मात्र शासनाच्या भूमिकेवर नाराजीच व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, संबंधित जाधव राष्टÑवादी पक्षाचे कार्यकर्ते असून जिल्हा परिषदेतील विद्यमान समाजकल्याण सभापती शिवाजी सर्वगौड यांचा जोरदार प्रचारही केला होता.सातारा जिल्ह्यातील दोन ग्रामस्थांची मुलाखत देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सीएम महाराष्टÑ’ या अधिकृत टिष्ट्वटर अकाऊंटवर झळकू लागली आहे. खटाव तालुक्यातील भोसरेचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नितीन जाधव तसेच कोरेगाव तालुक्यातील धामणेरच्या शालिनी पवार यांच्या मुलाखती टिष्ट्वट केल्या गेल्या आहेत. भोसरेतील जलयुक्त शिवारमुळे झालेल्या फायद्याची माहिती नितीन जाधव यांनी कॅमेºयासमोर दिली आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘लोकमत टीम’ त्या गावात थडकताच वेगळीच कहाणी पुढे आली.‘लोकमत’शी बोलताना नितीन जाधव सांगत होते की, ‘काही दिवसांपूर्वी पुण्याचे काही सरकारी अधिकारी घेऊन आमच्या तालुक्याचे बीडीओ आले. गावच्या जलयुक्त शिवारबद्दल बोला म्हटल्यावर मी कौतुकच केलं, मात्र, टिष्ट्वटरवर ‘मी लाभार्थी... होय, हे माझं सरकार’ या वाक्याखाली माझी मुलाखत दिसू लागताच मी दचकलो. कारण शेतकºयांंना दिलेले शब्द आजपर्यंत सरकारने पाळले नाहीत. तसेच या गावात जलयुक्त शिवारची जी काही कामे झाली, त्यात ग्रामस्थांचाच ७० टक्के वाटा आहे.’‘अमिर खान यांच्या वॉटर कप स्पर्धेत सर्व गट-तट विसरून आम्ही सहभागी झालो, त्यामुळेच यंदाच्या स्पर्धेत राज्यात आम्ही द्वितीय आलो. अशावेळी संपूर्ण कामाचे श्रेय सरकार घेत असेल तर आश्चर्य वाटते. विशेष म्हणजे, माझे आजोबा भानुदास गुरुजी पूर्वी भाजपचे होते. त्यांनी दिलीप येळगावकर यांचा प्रचारही केला होता. नंतर ते त्या पक्षापासून दूर सरकले. आता तर मी माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्या गटाचा कार्यकर्ता म्हणून ओळखला जात असून यापूर्वीच्या अनेक निवडणुकांमध्ये मी राष्टÑवादीचेच काम केले आहे. अशावेळी ‘होय... हे माझं सरकार’ असं कसं काय मी म्हणू शकतो,’ असाही आश्चर्याचा सवाल नितीन जाधव यांनी विचारला.योगायोगाने माझी मुलाखत प्रसारितपुण्याहून आलेली टीम गावातील एका शेततळी लाभार्थ्याची मुलाखत घेणार होती. तिकडे जाण्यापूर्वी त्यांनी सहज मला बोलतं केलं, त्यानंतर ते शेततळ्यावर गेले तेव्हा प्रचंड पाऊस पडला. त्यामुळे खºया लाभार्थ्याची मुलाखतच घेता आली नाही. माझीच प्रसारित झाली.- नितीन जाधव

टॅग्स :Politicsराजकारण