शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

दोघेजण सोडून बाकीचे मागे जा

By admin | Updated: October 18, 2014 23:26 IST

न्यायाधीशांचा आदेश : पावणेदोन तास न्यायालयात निरव शांतता; कार्यकर्त्यांची प्रचंड घालमेल

सातारा : महाराष्ट्र केसरी संजय पाटील यांच्या खूनप्रकरणाचा निकाल शनिवारी जाहीर होणार असल्याने न्यायालय अगदी खचाखच भरले होते. निकाल लागेपर्यंत प्रत्येकाच्या ह्दयात धकधक होत होती...न्यायाधीश केव्हा निकाल सांगणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या... तब्बल पावणेदोन तासानंतर न्यायाधीशांनी निकाल सांगण्यास सुरुवात केल्यानंतर सगळ्यांचे कान टवकारले.ठीक सकाळी अकरा वाजता न्यायाधीश आसनस्थ झाले. हॉलच्या दरवाजाजवळ दहा-बारा पोलीस उभे होते. आतमध्ये प्रवेश करणाऱ्यांना तपासून सोडत होते. उदयसिंह पाटील यांचे कार्यकर्तेही अगोदरच हॉलमध्ये येऊन बसले होते. न्यायाधीशांनी निकालपत्राचे सविस्तर डिक्टेशन सुरू केले. त्यावेळी उपस्थितांची घालमेल सुरू झाली. कोणत्याही क्षणी निकाल लागण्याची शक्यता होती. अधून-मधून कार्यकर्त्यांची आणि वकिलांचीही चुळबूळ सुरू व्हायची. न्यायाधीश आणि त्यांच्या शेजारी असणारे लिपिक निकालाचा सारांश लिहिण्यात मग्न होेते. काही आरोपी अस्वस्थ होत होते. त्यामुळे त्यांना पाण्याची बाटली द्यावी लागत होती. निकाल जाहीर होण्यास जसजसा वेळ लागत होता, तस-तशी उत्कंठा शिगेला पोहोचत होती. तब्बल पावणेदोन तासानंतर अखेर न्यायाधीशांनी ‘सर्व आरोपींना पुढे आणा,’ असे पोलिसांना सांगितले. न्यायाधीशांसमोर संशयित आरोपी उभे राहिले. त्यानंतर न्यायाधीशांनी निकाल वाचण्यास सुरुवात केली. न्यायाधीशांनी सर्व आरोपींची नावे वाचून दाखविल्यानंतर ‘आरोपी नंबर एक सागर परमार, दोन हमीद शेख हे दोषी असून, उर्वरित नऊजण निर्दोष आहेत,’ असे जाहीर केले. त्यावेळी ज्यांची सुटका झाली. त्यांच्या चेहऱ्यावरचा आंनद द्विगुणीत झाला. निर्दोष सुटका झालेल्या आरोपींना न्यायाधीशांनी पाठीमागे बसण्यास सांगितले. मात्र, आरोपी सागर परमार आणि हमीद शेखला न्यायाधीशांनी पुढे उभे राहण्यास सांगितले. या दोघांना किती शिक्षा होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले.न्यायाधीशांनी शिक्षा जाहीर करण्यास सुरुवात केली. दोघांनाही वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात येत असल्याचे न्यायाधीशांनी सांगताच शांतता पसरली. न्यायालयाच्या बाहेर उदयसिंह यांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू झाला. पोलिसांनी त्यांना अटकाव करून न्यायालयाच्या बाहेर काढले. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. (प्रतिनिधी)