शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

राजेंची अटकेपार लढाई... पण सैन्याचा शत्रूशीच तह!

By admin | Updated: October 23, 2014 00:03 IST

सातारा शहर : आघाड्यांतील खेळ्यांचे राजकारण विरोधकांच्या पथ्यावर

सातारा : परकीय प्रदेश काबीज करण्यासाठी सेनापतीने राजधानी सोडावी, तर राज्याच्या राजधानीतच सैन्याने सेनापतींच्या अनुपस्थितीत तह करून शस्त्रे खाली ठेवावीत, अशीच ऐतिहासिक परिस्थिती सातारा शहरात विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने बघायला मिळाली. ऐनवेळी शेजारच्या जावळीने साथ दिली नसती, तर विद्यमान आमदारांना राजकीय दग्याफटक्याला सामोरे जावे लागले असते. मात्र, जावळी जागली अन् त्यांच्यावरील संकटे टळली. पाच वर्षांपूर्वी मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर सातारा मतदारसंघाला जावळी तालुका जोडला गेला. सातारा तालुक्याचा काही भाग कऱ्हाड उत्तरला जोडला गेला, तर पूर्वेकडचा भाग कोरेगाव मतदारसंघाला जोडला गेला. सातारा शहर आणि आजूबाजूचा परिसर व संपूर्ण जावळी तालुका असा मतदारसंघ तयार झाल्याने अजिंक्यतारा कारखाना व इतर सहकारी संस्था तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेतील शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे प्रभुत्व राष्ट्रवादीच्या इतर उमेदवारांच्या वाट्याला गेले. सातारा शहर हा मनोमिलनाचा बालेकिल्ला आहे. याठिकाणी दोन राजे सांगतील त्याप्रमाणे राजकारण फिरते. नगरपालिका निवडणुकीला मनोमिलनाविरोधात उभे राहिलेल्यांचा निभाव लागला नाही. अनेक वर्षे पालिकेची सत्ता ही राजघराण्याच्याच ताब्यात आहे. त्यामुळे लोकसभा व विधानसभा निवडणुकीत शहरातून ७५ टक्क्यांच्या वर मते उदयनराजे किंवा शिवेंद्रसिंहराजेंना मिळतात. शहरातून आमदारांना विरोध होऊच शकत नाही, जो काही विरोध असेल तो जावळीतून तिथेच फौजफाटा कामाला लावला गेला होता, असेही काहीजण सांगतात. याउलट दीपक पवारांशी असलेल्या नातेसंबंधांना जागून काहीनी त्यांचा आतल्या अंगाने प्रचार केल्याचे सांगितले जाते. शेजारच्या शाहूपुरीतीलही राजेंच्या कार्यकर्त्यांची गटबाजी धोकादायक ठरली. अनेक ठिकाणी शिवेंद्रराजेंपेक्षा दीपक पवार यांना जास्त मते मिळाली. शिवेंद्रसिंहराजेंचे मताधिक्य गत निवडणुकीपेक्षा निम्म्याने कमी झाले. या निवडणुकीत त्यांना ४७ हजारांच्यावर मताधिक्य मिळाले. शहरातील २५३ मतदान केंद्र क्रमांक रामाचा गोट, चिमणपुरा पेठ या परिसरात येते. या परिसरावर नगरसेविका मुक्ता लेवे यांचे वर्चस्व आहे. मात्र, येथूनच शिवेंद्रसिंहराजेंना २४१ तर दीपक पवार यांना ३५५ मते मिळाली. नगरविकास आघाडीचे पक्षप्रतोद अविनाश कदम यांच्या वॉर्डमधील मंगळवार तळे व व्यंकटपुरा पेठ परिसरातील मतदान केंद्र क्र. २५४ मध्ये शिवेंद्रराजेंना १७१ तर दीपक पवार यांना ३७३ मते मिळाली. मतदार केंद्र क्र. २५५ वर शिवेंद्रराजेंना १५० तर दीपक पवारांना ३४८ मते मिळाली. नगरसेवक भाग्यवंत कुंभार यांच्या वॉर्डात येणाऱ्या करंजे पेठेतील मतदान केंद्र २६१ मधून शिवेंद्रराजेंना २२३ तर दीपक पवारांना २३६ मते मिळाली. पालिकेच्या गत निवडणुकीत लक्ष्मी टेकडी परिसरातून संदीप साखरे यांना निवडून आणण्यासाठी शिवेंद्रराजेंनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. त्याच परिसरातून त्यांना कमी मते मिळाली. फुटका तलाव परिसरातूनही शिवेंद्रसिंहराजेंपेक्षा दीपक पवारांना ज्यादा मतदान झाले. मल्हार पेठ, शनिवार पेठ, माची पेठ, भवानी पेठ, यादोगोपाळ पेठ, गुरुवार पेठ येथील मतदान केंद्रांवरही दीपक पवारांनी शिवेंद्रसिंहराजेंपेक्षा मताधिक्य जादा घेतले आहे. (प्रतिनिधी)यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मात्र मनोमिलनाची ताकद क्षीण झाल्याचेच चित्र समोर आले. पालिकेच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांकडून ऐन निवडणुकीत एकमेकांचे पाय ओढाओढीचे राजकारण खेळल्याची जोरदार चर्चा आहे. दोन वर्षांवर नगरपालिका निवडणूक येऊन ठेपली असल्याने सर्वांनी मिळून झटून शिवेंद्रसिंहराजेंचे काम करणे अपेक्षित होते. मात्र, प्रचारात कार्यकर्त्यांची जी तळमळ असायला पाहिजे, ती तळमळच कुठे तरी हरविली गेल्याने शहरातून शिवेंद्रसिंहराजेंच्या विरोधात जवळपास ५९ टक्के मतदान गेले. कुणी याला नगरसेवकांची बेफिकीरी म्हटले तर कुणी अतिआत्मविश्वास! पालिकेची निवडणूक दोन वर्षांवर येऊन ठेपली आहे. हीच बेफिकिरी पुढेही सुरुच राहिली तर दोन्ही आघाड्यांना अडचणीचे ठरणार आहे. विधानसभा निवडणुकीने मोठा धडा दिला असल्याने ‘न्यूट्रल’ राहिलेली मंडळी तसेच कामापेक्षा टक्क्यांत गुंतलेल्या मंडळींना घरचा रस्ता दाखविला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.