शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
2
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
3
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
4
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
5
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
6
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
7
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
8
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
9
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
10
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
11
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
12
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
13
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
14
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
15
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
16
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
17
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
18
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
19
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
20
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका

राजेंची अटकेपार लढाई... पण सैन्याचा शत्रूशीच तह!

By admin | Updated: October 23, 2014 00:03 IST

सातारा शहर : आघाड्यांतील खेळ्यांचे राजकारण विरोधकांच्या पथ्यावर

सातारा : परकीय प्रदेश काबीज करण्यासाठी सेनापतीने राजधानी सोडावी, तर राज्याच्या राजधानीतच सैन्याने सेनापतींच्या अनुपस्थितीत तह करून शस्त्रे खाली ठेवावीत, अशीच ऐतिहासिक परिस्थिती सातारा शहरात विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने बघायला मिळाली. ऐनवेळी शेजारच्या जावळीने साथ दिली नसती, तर विद्यमान आमदारांना राजकीय दग्याफटक्याला सामोरे जावे लागले असते. मात्र, जावळी जागली अन् त्यांच्यावरील संकटे टळली. पाच वर्षांपूर्वी मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर सातारा मतदारसंघाला जावळी तालुका जोडला गेला. सातारा तालुक्याचा काही भाग कऱ्हाड उत्तरला जोडला गेला, तर पूर्वेकडचा भाग कोरेगाव मतदारसंघाला जोडला गेला. सातारा शहर आणि आजूबाजूचा परिसर व संपूर्ण जावळी तालुका असा मतदारसंघ तयार झाल्याने अजिंक्यतारा कारखाना व इतर सहकारी संस्था तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेतील शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे प्रभुत्व राष्ट्रवादीच्या इतर उमेदवारांच्या वाट्याला गेले. सातारा शहर हा मनोमिलनाचा बालेकिल्ला आहे. याठिकाणी दोन राजे सांगतील त्याप्रमाणे राजकारण फिरते. नगरपालिका निवडणुकीला मनोमिलनाविरोधात उभे राहिलेल्यांचा निभाव लागला नाही. अनेक वर्षे पालिकेची सत्ता ही राजघराण्याच्याच ताब्यात आहे. त्यामुळे लोकसभा व विधानसभा निवडणुकीत शहरातून ७५ टक्क्यांच्या वर मते उदयनराजे किंवा शिवेंद्रसिंहराजेंना मिळतात. शहरातून आमदारांना विरोध होऊच शकत नाही, जो काही विरोध असेल तो जावळीतून तिथेच फौजफाटा कामाला लावला गेला होता, असेही काहीजण सांगतात. याउलट दीपक पवारांशी असलेल्या नातेसंबंधांना जागून काहीनी त्यांचा आतल्या अंगाने प्रचार केल्याचे सांगितले जाते. शेजारच्या शाहूपुरीतीलही राजेंच्या कार्यकर्त्यांची गटबाजी धोकादायक ठरली. अनेक ठिकाणी शिवेंद्रराजेंपेक्षा दीपक पवार यांना जास्त मते मिळाली. शिवेंद्रसिंहराजेंचे मताधिक्य गत निवडणुकीपेक्षा निम्म्याने कमी झाले. या निवडणुकीत त्यांना ४७ हजारांच्यावर मताधिक्य मिळाले. शहरातील २५३ मतदान केंद्र क्रमांक रामाचा गोट, चिमणपुरा पेठ या परिसरात येते. या परिसरावर नगरसेविका मुक्ता लेवे यांचे वर्चस्व आहे. मात्र, येथूनच शिवेंद्रसिंहराजेंना २४१ तर दीपक पवार यांना ३५५ मते मिळाली. नगरविकास आघाडीचे पक्षप्रतोद अविनाश कदम यांच्या वॉर्डमधील मंगळवार तळे व व्यंकटपुरा पेठ परिसरातील मतदान केंद्र क्र. २५४ मध्ये शिवेंद्रराजेंना १७१ तर दीपक पवार यांना ३७३ मते मिळाली. मतदार केंद्र क्र. २५५ वर शिवेंद्रराजेंना १५० तर दीपक पवारांना ३४८ मते मिळाली. नगरसेवक भाग्यवंत कुंभार यांच्या वॉर्डात येणाऱ्या करंजे पेठेतील मतदान केंद्र २६१ मधून शिवेंद्रराजेंना २२३ तर दीपक पवारांना २३६ मते मिळाली. पालिकेच्या गत निवडणुकीत लक्ष्मी टेकडी परिसरातून संदीप साखरे यांना निवडून आणण्यासाठी शिवेंद्रराजेंनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. त्याच परिसरातून त्यांना कमी मते मिळाली. फुटका तलाव परिसरातूनही शिवेंद्रसिंहराजेंपेक्षा दीपक पवारांना ज्यादा मतदान झाले. मल्हार पेठ, शनिवार पेठ, माची पेठ, भवानी पेठ, यादोगोपाळ पेठ, गुरुवार पेठ येथील मतदान केंद्रांवरही दीपक पवारांनी शिवेंद्रसिंहराजेंपेक्षा मताधिक्य जादा घेतले आहे. (प्रतिनिधी)यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मात्र मनोमिलनाची ताकद क्षीण झाल्याचेच चित्र समोर आले. पालिकेच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांकडून ऐन निवडणुकीत एकमेकांचे पाय ओढाओढीचे राजकारण खेळल्याची जोरदार चर्चा आहे. दोन वर्षांवर नगरपालिका निवडणूक येऊन ठेपली असल्याने सर्वांनी मिळून झटून शिवेंद्रसिंहराजेंचे काम करणे अपेक्षित होते. मात्र, प्रचारात कार्यकर्त्यांची जी तळमळ असायला पाहिजे, ती तळमळच कुठे तरी हरविली गेल्याने शहरातून शिवेंद्रसिंहराजेंच्या विरोधात जवळपास ५९ टक्के मतदान गेले. कुणी याला नगरसेवकांची बेफिकीरी म्हटले तर कुणी अतिआत्मविश्वास! पालिकेची निवडणूक दोन वर्षांवर येऊन ठेपली आहे. हीच बेफिकिरी पुढेही सुरुच राहिली तर दोन्ही आघाड्यांना अडचणीचे ठरणार आहे. विधानसभा निवडणुकीने मोठा धडा दिला असल्याने ‘न्यूट्रल’ राहिलेली मंडळी तसेच कामापेक्षा टक्क्यांत गुंतलेल्या मंडळींना घरचा रस्ता दाखविला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.